पुणे, दि २४:काही वर्षांपूर्वी डीएसके साम्राज्याबरोबरच उध्वस्त झालेला तळेगावातील डीएसके पलाश सदाफुली गृहप्रकल्प अखेर पूर्णत्वास जाऊन २७९ कुटुंबांचे घराचे स्वप्न साकार झाले आहे. ‘महारेरा’ने वेळेवर केलेल्या हस्तक्षेपामुळे आणि कायद्याच्या बळावर हा प्रकल्प पूर्णत्वास गेला. महाराष्ट्रात अशा प्रकारे महारेराच्या मध्यस्थीने नवीन बिल्डर नेमून प्रकल्प पूर्ण होण्याची ही पहिलीच यशस्वी घटना आहे. एकेकाळचे नामवंत बांधकाम व्यवसायिक डी. […]Read More
अलिबाग दि २४– रायगड जिल्ह्यातील उरण जवळच्या समुद्रात प्रवासी बोटीला पुन्हा एकदा नेव्हीच्या स्पीड बोटीने धडक दिल्याची घटना घडली.सुदैवाने या अपघातात कोणतीही मोठी दुर्घटना किंवा जीवीत हानी झाली नाही.मोरा ते भाऊचा धक्का या सागरी मार्गावर अनेक वर्षांपासून प्रवासी लॉन्च सेवा सुरू आहे. मोरा येथून शुक्रवारी रात्री आठ वाजता संत ज्ञानेश्वर ही प्रवासी बोट प्रवाशांना घेऊन […]Read More
मुंबई, दि २४मुंबईहून मालवणच्या दिशेने गणेशभक्तांना घेऊन जाणाऱ्या एका लक्झरी बसला रविवारी 24 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 2:10 वाजता कशेडी बोगद्याच्या सुरुवातीस असणाऱ्या पुलावर अचानक आग लागली.गाडीचा टायर फुटल्याने ही आग लागली. या घटनेनंतर क्षणातच ज्वाळांनी संपूर्ण बसला वेढा घातला आणि आगीचा भडका उडाला. चालकाने प्रसंगसंवधानता राखून सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.घटनेची […]Read More
मुंबई दि २३ — भाजपातर्फे ‘माझा भाऊ देवाभाऊ’ अभियानांतर्गत राखी प्रदान सोहळा जल्लोषात संपन्न झाला. लखपती दीदींसाठी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्नशील आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली महाराष्ट्रात येत्या काळात एक कोटी बहीणींना लखपती दीदी केल्याशिवाय राहणार नाही. महिलांना सक्षम करून त्यांना त्यांच्या पायावर उभे करायचे आहे. यासाठी केंद्रातील एनडीए सरकार आणि राज्यातील महायुती सरकार विविध योजना […]Read More
नवी दिल्ली, दि. २३ : निवडणूक सुधारणांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थे असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) आणि नॅशनल इलेक्शन वॉच (NEW) यांनी देशातील सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सांपत्तीक स्थितीचा आढावा घेत एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या मध्ये आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याकडे ९३१ कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे. […]Read More
पाच वर्षांच्या प्रदीर्घ बंदीनंतर TikTok ची वेबसाइट भारतात पुन्हा सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे, ज्यामुळे सोशल मीडिया विश्वात एकच खळबळ उडाली आहे. जून २०२० मध्ये भारत सरकारने TikTok सह ५९ चिनी अॅप्सवर राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव बंदी घातली होती. या बंदीनंतर TikTok भारतात पूर्णपणे अनुपलब्ध होता—अॅप स्टोअरवरून हटवण्यात आला होता आणि वेबसाइटही अॅक्सेस करता येत […]Read More
मुंबई, दि. २३ : अदानी इलेक्ट्रिसिटीने गणेशोत्सव मंडपामध्ये निवासी दरात तात्पुरत्या वीज जोडण्या देण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे साऱ्या मुंबई शहरात गणेशोत्सवादरम्यान गणेशोत्सव मंडळांना सातत्यपूर्ण वीज पुरवठा मिळेल. यासाठी गणेशोत्सव मंडळांनी अर्ज केल्यानंतर 48 तासांच्या आत त्यांना तात्पुरती वीज जोडणी मिळेल. यासाठी गणेशोत्सव मंडळांना अदाणी इलेक्ट्रिसिटीच्या वेबसाईटवर जाऊन न्यू कनेक्शन विभागात तात्पुरत्या वीज जोडणीसाठी अर्ज […]Read More
मुंबई, दि. २३ : भारतातील पर्यटन क्षेत्रात महाराष्ट्र राज्याने आपले स्थान सिद्ध केले आहे. देशभरातील आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रने विदेशी पर्यटकांच्या बाबतीत पहिलं स्थान पटकावलं असून एकूण पर्यटक संख्येनुसारही राज्य चौथ्या क्रमांकावर आहे. २०२३–२०२४ या कालावधीत महाराष्ट्रात ७० लाख विदेशी पर्यटकांनी भेट दिली, ज्यामुळे राज्याने दिल्ली, केरळ, गोवा आणि तामिळनाडूसारख्या पारंपरिक पर्यटन स्थळांना मागे […]Read More
मुंबई, दि. २३ : उद्या प्रदर्शित होणाऱ्या खालीद का शिवाजी या चित्रपटामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची धर्मनिरपेक्ष अशी प्रतिमा तयार होत असल्याचा आरोप करत काही उजव्या विचाराच्या लोकांनी या चित्रपटाबाबत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची तातडीने दखल घेत सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी एक दिवस असताना या चित्रपटाचे सेन्सॉर प्रमाणपत्र रद्द केले. या प्रकरणी न्याय मिळावा […]Read More
नवी दिल्ली, दि. २३ : भारत सरकारच्या टपाल विभागाने अमेरिकेसाठी टपाल सेवा तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे, जो २५ ऑगस्ट २०२५ पासून लागू होईल. हा निर्णय अमेरिकेच्या नव्या आयात धोरणाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे, ज्याअंतर्गत $८०० पर्यंतच्या आयात वस्तूंवरील शुल्कमुक्त सवलत रद्द करण्यात आली आहे. अमेरिकेच्या कार्यकारी आदेश क्रमांक १४३२४ नुसार, २९ ऑगस्टपासून भारतातून […]Read More