मुंबई, दि 2 एमएमआरडीए, मेट्रोची सर्व प्राधिकरणे यांनी आपापसात समन्वय तर ठेवावाच सोबत मुंबई महापालिकेशी ही सतत संपर्क आणि समन्वय ठेवा, कुणीही कुठल्याही परिस्थितीत दोषारोप न करता एक टीम म्हणून सगळ्यांनी एकत्रितपणे कामे करा,असे स्पष्ट निर्देश मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज दिले. मुंबईतील मान्सून पुर्व कामांच्या आढाव्यासाठी आज एमएमआरडीए कार्यालयात जाऊन पालकमंत्री […]Read More
मुंबई, दि 2 – विदर्भातील सिकल सेल आणि थायलेमिया ग्रस्त रुग्णांना नजीकच उपचारांची सोय व्हावी आणि त्यांचे उपचारांसाठी मुंबईवर असलेले अवलंबित्व कमी व्हावे यासाठी एम्स नागपूर येथे बोन मॅरो ट्रान्सप्लांट युनिट सुरू करण्याची संकल्पना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. या संकल्पनेस सकारात्मक प्रतिसाद देत एसटीपीसीने या युनिटसाठी अर्थसहाय्य दिले आहे. याबाबतच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात […]Read More
चिपळूण, दि. २ : महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांच्या विकासामध्ये महत्त्वाचे योगदान असलेल्या कोयना धरणाच्या जलविद्युत प्रकल्पातून ३२६९.०६ मेगावॅट अवर्स इतकी विक्रमी वीजनिर्मिती करण्यात आली आहे. यातून राज्य शासनाला सुमारे १४४ कोटी रुपयांचा आर्थिक फायदा झाला आहे. ३१ मे रोजी संपलेल्या तांत्रिक वर्षात सादर केलेल्या अहवालानुसार ही माहिती समोर आली आहे. कोयना धरणातील वीजनिर्मिती पश्चिमेकडील जलविद्युत टप्प्यांमधील […]Read More
छत्रपती शिवरायांची राजधानी असलेल्या दुर्गराज रायगडावर सुरू असलेल्या उत्खननात एक ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा पुरावा सापडला आहे. भारतीय पुरातत्त्व विभाग आणि रायगड विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या उत्खननात ‘यंत्रराज’ (Yantraraj) म्हणजेच सौम्ययंत्र (Astrolabe) नावाचे प्राचीन खगोलशास्त्रीय उपकरण आढळून आले आहे. रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी फेसबुक पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. संभाजीराजे छत्रपती […]Read More
नंदुरबार दि. २ :- महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नूतन राज्य कार्यकारिणीची घोषणा विस्तारित राज्य कार्यकारिणी बैठकीत शनिवारी दि. ३१ मे रोजी दुपारी करण्यात आली असून अध्यक्षपदी लातूरचे ज्येष्ठ कार्यकर्ते माधव बावगे यांची तर राज्य कार्याध्यक्षपदी संजय बनसोडे यांची एकमताने निवड करण्यात आली. यासह ५ प्रधान सचिव आणि ७ राज्य सरचिटणीस आता पुढील तीन वर्षात प्रभावी […]Read More
मुंबई, दि 2चिंचपोकळी येथील सर्वसामान्य नागरिकांचे हक्काचे महपालिकेचे रुग्णालय म्हणून ख्याती असलेले साथीच्या आजारचे कस्तुरबा रुग्णालयात रुग्णांच्या रक्त तपासण्या होत नाही. गेल्या पाच ते सहा महिन्यापासून या सर्व रक्त तपासण्या बंद आहेत. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना बाहेरील रक्त तपासणी लॅब वर अवलंबून राहावे लागत आहे. तसेच ही बाहेरील रक्त तपासणी लॅब आवाच्या सव्वा दर […]Read More
चंद्रपूर दि २:– चंद्रपूर जिल्ह्यात दाखल झालेल्या रानटी हत्तींवर नजर ठेवण्यासाठी आणि मानव–वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी वनविभागाने त्रिस्तरीय पथकांची निर्मिती केली आहे. या रानटी हत्तींनी ताडोबा पर्यंत धडक मारल्याने वनविभाग ऍक्शन मोड वर आलं असून याबाबत काल उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. या बैठकीत गाव, रेंज आणि जिल्हास्तरीय पथक गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. हत्ती दाखल होण्याची […]Read More
बुलडाणा दि २– विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथील संत गजानन महाराजांची पालखी आज विठ्ठल विठू नामाचा गजर करत पंढरपूरच्या दिशेने विठ्ठल दर्शनासाठी मार्गस्थ झाली आहे . टाळकरी वारकरी पताकाधारीटाळ मृदंग घेऊन अश्व आणि गजासह 700 जण पायदळवारीमध्ये सहभागी झाले आहेत. पालखीचे हे 56 वे वर्ष आहे. संत गजानन महाराजांची पालखी 725 […]Read More
अहिल्यानगर, दि. २ : पुण्यातील वैष्णवी हगवणे हुंडाबळी घटनेनंतर लग्नातील हुंडा, मानपान आणि शाही सोहळ्यांच्या कुप्रथांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर अहिल्यानगरमधील मराठा समाजाने एक अत्यंत स्वागतार्ह आणि पुरोगामी पाऊल उचलत मोठा निर्णय घेत समाजातून हुंडा हद्दपार करण्याच्या दृष्टीने एक सकारात्मक पाऊल उचलले आहे. अहिल्यानगरमध्ये नुकतीच मराठा समाजाच्या विचारमंचाची बैठक पार पडली. […]Read More
मुंबई, दि. ३१ मे २०२५ : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मत्रिशताब्दीनिमित्त चर्चगेट, मुंबई येथे अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.या प्रसंगी माजी आमदार आणि समाजसेवक प्रकाश शेडगे, बालहक्क आयोगाच्या माजी अध्यक्ष सुशीबेन शहा, शिवसेना […]Read More