Month: June 2025

महिला

Womens Asia Cup ला स्थगिती

आशियाई क्रिकेट परिषदने वूमन्स एमर्जिंग आशिया कप स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेला येत्या 6 जूनपासून सुरुवात होणार होती. चिकनगुनिया या विषाणूजन्य आजाराच्या प्रसारामुळे आणि हवामानामुळे स्पर्धा स्थगित करण्यात येत असल्याची माहिती एसीसीने सोशल मीडियावरुन दिली आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शम्मी सिल्वा यांनी एसीसीचे प्रमुख मोहसिन नक्वी यांना पत्राद्वारे स्पर्धा स्थगित करण्याची […]Read More

महाराष्ट्र

श्री साईबाबा रुग्णालयात अवघड हृदय शस्त्रक्रिया यशस्वी

मुंबई, दि 2शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानच्या रुग्णालयात एक अत्यंत गुंतागुंतीची हृदय शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली असून, रुग्ण पूर्णपणे बरा होऊन सुखरूप घरी परतला आहे.नांदेड जिल्ह्यातील चांडोळा गावचे ६५ वर्षीय प्रल्हाद महाजन साखरे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांच्या हृदयाच्या वॉलमध्ये छिद्र (Ventricular Septal Rupture) निर्माण झाले होते. या गुंतागुंतीच्या स्थितीत अनेक नामांकित रुग्णालयांमध्ये प्रयत्न […]Read More

राजकीय

गुरांचा बाजार बंद ठेवण्याचे गोसेवा आयोगाचे पत्र मागे , रईस

मुंबई दि २:– बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर ३ जून ते ८ जून दरम्यान राज्यातील गुरांचे बाजार बंद ठेवण्यासंदर्भात राज्य गोसेवा आयोगाने कृषी उत्पन्न बाजार समित्यांना पाठवलेले वादग्रस्त पत्र मागे घेण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सांगितले.यासंदर्भात समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. सह्याद्री अतिथीगृह येथे बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कायदा […]Read More

सांस्कृतिक

३५२ व्या श्री शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी होणार रेकॉर्ड ब्रेक गर्दी

महाड दि २–(मिलिंद माने)येत्या ६ जून रोजी किल्ले रायगडावर प्रतिवर्षाप्रमाणे ३५२ वा श्री शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत असून यावर्षी रेकॉर्ड ब्रेक गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सोहळ्याकरता राज्याच्या कानाकोपऱ्यासह देशभरातून लाखो शिवभक्त दाखल होत असतात. या शिवभक्तांच्या सोयी सुविधांसाठी रायगडावर प्रशासनामार्फत जय्यत तयारी चालू केली गेली आहे.शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी किल्ले रायगडावर साजरा […]Read More

राजकीय

पंचनाम्याचे सोपस्कर कशाला ? हेक्टरी ५० हजारांची मदत तातडीने करा

मुंबई, दि. २ —महाराष्ट्राला मान्सूनपूर्व पावसाने झोडपले असून सलग तीन आठवडे पाऊस पडत होता. शेतकऱ्यांचे मालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्याला अवकाळी पावसाने पुन्हा संकटात टाकले आहे. शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. या संकटात त्याच्या पाठीशी सरकारने उभे राहिले पाहिजे म्हणून पंचनाम्याचे सोपस्कार बाजूला ठेवून तातडीने […]Read More

साहित्य

मुंबई मराठी पत्रकार संघ राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा २०२४ चे

मुंबई, दि 2 :मुंबई मराठी पत्रकार संघ आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २४ व्या राज्यस्तरीय आणि रायगड जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे.२०२४ साठी घेण्यात आलेल्या या स्पर्धेत एक लाख रुपये रकमेचा सर्वोत्कृष्ट दिवाळी अंकाचा पुरस्काराचा मानकरी ‘हंस’ दिवाळी अंक ठरला आहे. अंतरीचे प्रतिबिंब आणि अक्षर […]Read More

महानगर

डॉकयार्ड रोड येथे पिण्याचे पाण्याची टंचाई

मुंबई, दि 2डोक्याजवळ येथील माजगाव आणि नवानगर आसपासचे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. तर दोन दोन तीन दिवसांनी पाणी येत असून त्यामुळे येथील रहिवासी फार त्रस्त झाले आहेत. याबाबत त्यांनी महापालिका प्रशासनाकडे तसेच स्थानिक आमदार मनोज जामसूतकर यांच्याकडे नियमित पाणीपुरवठा व यासाठी तक्रारी केल्या […]Read More

महानगर

कनिष्क विमान अपघातापासून दहशतवादाचा चेहरा साकिब नाचन

मिलिंद लिमयेमुंबई दि २– कनिष्क विमान अपघातापासून मुंबई घाटकोपर स्फोट आणि गोरक्षा समितीच्या कार्यकर्त्यांवरील हल्ले अशी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या साकीब नाचन च्या घराची आज झडती घेण्यात आली.या विमान अपघातापासून भारतीय दहशतवादाचा प्रमुख चेहरा म्हणून नाचण कुख्यात झालेला आहे. साकीब नाचन सध्या तिहारच्या तुरुंगात आहे. 9 डिसेंबर 2023 रोजी एन आय ए ने छापा घालून भिवंडी […]Read More

राजकीय

शेतकरी कर्जमाफीचा भाजपा युती सरकारला विसर, केवळ कोरड्या घोषणा नको,

मुंबई, दि 2 महाराष्ट्राला मन्सूनपूर्व पावसाने झोडपले असून सलग तीन आठवडे पाऊस पडत होता. शेतकऱ्यांचे मालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्याला अवकाळी पावसाने पुन्हा संकटात टाकले आहे. शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. या संकटात त्याच्या पाठीशी सरकारने उभे राहिले पाहिजे म्हणून पंचनाम्याचे सोपस्कार बाजूला ठेवून तातडीने […]Read More

राजकीय

देवनार कत्तलखाना अव्यवस्था व भ्रष्टाचाराचे आगार..

मुंबई, दि 2देवनार कत्तलखान्यात सुरू असलेल्या भ्रष्टाचार आणि गैरव्यवस्थेबाबत नागरिकांकडून बऱ्याच तक्रारी येत असल्याने खासदार वर्षा गायकवाड यांनी आमदार अमिन पटेल, आमदार डॉ. ज्योती गायकवाड यांच्यासह भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली व अधिकाऱ्यांशी चर्चा केली. कत्तलखान्यात सर्वत्र अस्वच्छता पसरलेली आहे. कसलेही नियोजन नाही, मनुष्यबळ अपुरे आहे. दरवर्षी तात्पुरते शेड उभे केले जाते त्यासाठी दरवर्षी एकाच […]Read More