प्रयागराज, दि. ३ : अलाहाबाद उच्च न्यायालयाने पतंजली आयुर्वेद लिमिटेडच्या ₹२७३.५० कोटींच्या वस्तू आणि सेवा कर (GST) दंडाविरोधातील याचिका फेटाळली आहे. न्यायमूर्ती शेखर बी. सराफ आणि विपिन चंद्र दीक्षित यांच्या खंडपीठाने पतंजलीचा युक्तिवाद फेटाळला की अशा दंडात्मक कारवाया गुन्हेगारी स्वरूपाच्या असतात आणि फक्त गुन्हेगारी खटल्यानंतरच लागू करता येतात. न्यायालयाचा निर्णय आणि कायदेशीर मुद्देखंडपीठाने स्पष्ट केले […]Read More
मुंबई, दि. ३ : धारावी येथील डार्क स्टोअरमध्ये असलेल्या Zepto युनिटमध्ये अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन आणि खराब स्वच्छता व्यवस्था आढळल्यानंतर महाराष्ट्र FDA ने कडक कारवाई केली आहे. महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म Zepto ची मूळ कंपनी किरणकार्ट टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड चा अन्न व्यवसाय परवाना निलंबित केला आहे. एफडीए तपासणी अहवालात असे […]Read More
नाशिक, दि. ३ : नाशिकमध्ये झालेल्या एका जाहीर कार्यक्रमात शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी शालेय विद्यार्थ्यांना पहिलीपासून सैनिकी शिक्षण देण्यात येणार असल्याची घोषणा केली. शिक्षणमंत्री म्हणाले, ‘प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये राष्ट्रभक्तीची जाणीव निर्माण होणे गरजेचे आहे. त्यासाठी पहिलीपासून विद्यार्थ्यांना सैनिकी शिक्षणाचे धडे दिले जातील’. माजी सैनिक, क्रिडा शिक्षक, एनसीसी व स्काऊट गाईडचे शिक्षक विद्यार्थ्यांना सैनिकी शिक्षणाचे धडे देतील. […]Read More
जालना दि ३:– जालन्याच्या अंबड – घनसावंगी तालुक्यातून वाहणारी गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. उन्हाळ्यात सुमारे 27 दिवसांपूर्वी ही नदी अक्षरशः कोरडीठाक पडली होती. यामुळे गोदाकाठच्या गावांत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. गेल्या 15 दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे ही कोरडी पडलेली गोदावरी नदी आता पुन्हा दुथडी भरून वाहत […]Read More
जालना दि ३:– जालन्यात 2 एकरावरील मोसंबी बागेवर शेतकऱ्याने जेसीबी फिरवला आहे. मोसंबीतून उत्पादन खर्चही निघत नसल्याने त्रस्त शेतकऱ्याने आपली 400 मोसंबीची झाडं जेसीबीने नष्ट केली. जालन्याच्या उटवद येथील शेतकरी अविनाश गव्हाळे यांनी त्यांच्या दोन एकरावरील शेतात 400 मोसंबीची झाडं लावली होती. परंतु, मोसंबी बागेवर केला जाणारा 50 ते 60 हजारांचा खर्चही मोसंबी उत्पादनातून निघत […]Read More
ठाणे, २ : महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवून १२ जणांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई बंदी घातलेल्या स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (SIMI) च्या माजी पदाधिकाऱ्यांच्या आणि सदस्यांच्या घरांवर करण्यात आली. ATS ने साकिब नाचन, आकिब साकिब नाचन, अब्दुल लतीफ कासकर, कैफ नाचन आणि शाजिल नाचन यांच्या घरांची झडती घेतली2. […]Read More
मुंबई, दि. २ : समृद्धी महामार्गाचा बहुप्रतीक्षित शेवटचा टप्पा गुरुवार ५ जूनपासून प्रवाशांसाठी खुला होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इगतपुरी येथे या टप्प्याचे लोकार्पण होणार आहे. यानंतर इगतपुरी ते आमने हा ७६ किलोमीटर लांबीचा शेवटचा टप्पा वाहतुकीसाठी सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी […]Read More
मुंबई, दि 2सेंट जॉर्ज येथील संत गाडगे बाबा धर्मशाळेत समाज भूषण रुग्ण सेवक शीतल , शालीन तसेच विदर्भाचे महान सुपुत्र ज्यांना त्यांच्या लहानपणी संत गाडगेबाबांच्या मांडीवर खेळण्याचे भाग्य प्राप्त झाले व पुढे त्याच प्रेरणेतून महसूल खात्यात चालून आलेली चांगली नोकरी सोडून आपले उभे आयुष्य रंजले गांजलेले, दीनदलीत व रग्णसेवेत वाहून घेणाऱ्या तपस्वी व्यक्तीमत्व मा. एकनाथभाऊ […]Read More
ढाका, दि. २ : बांगलादेशच्या मध्यवर्ती बँकेने काल १ हजार ५० आणि २० टकाच्या नवीन नोटा जारी केल्या. या नोट्समधून देशाचे संस्थापक राष्ट्रपती शेख मुजीबुर्रहमान यांचे चित्र काढून टाकण्यात आले आहे. याशिवाय लवकरच ५००, २००, १०० आणि १० रुपयांच्या नवीन नोटा जारी केल्या जातील. याबद्दल बांगलादेश सेंट्रल बँकेचे प्रवक्ते आरिफ हुसेन खान म्हणाले- नवीन डिझाइनमध्ये […]Read More
मुंबई, दि. २ : वेळेआधीच १२ दिवस देशात दाखल झालेल्या मान्सूनचे राज्यासह देशात अनेक ठिकाणी थैमान घातले आहे. मराठवाड्या सारख्या दुष्काळी भागातील धरण प्रकल्पही मे महिन्यातच ओसंडून वाहू लागले आहेत. मात्र आता IMD ने जाहीर केलेल्या नवीन अंदाजाने शेतकऱ्यांना धडकी भरली आहे कारण वेळेपूर्वीच पाऊस झाल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. घाईघाईने दाखल झालेल्या मान्सूनचा राज्यातील प्रवास […]Read More