मुंबई, दि. १३– संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरातील झोपडपट्टीधारकांच्या घरांचा लढा आम्ही अखेर पर्यंत लढू, अशी ग्वाही मुंबई उपनगर पालकमंत्री अॅड आशिष शेलार यांनी आज दिली. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातील केतकी पाडा, जानू पाडा, पिंपरी पाडा या भागातील रहिवासी प्राथमिक सुविधां पासून वंचित असून आज उपनगर पालकमंत्री शेलार यांनी पाहणी करुन रहिवाशांशी संवाद साधला. […]Read More
ठाणे दि १३– ठाणेकरांचा प्रवास सुखकर व्हावा, त्यांच्या वेळेची बचत व्हावी यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांनी ठाणे अंतर्गत रिंग रेल्वे मेट्रो’च्या (वर्तुळाकार मेट्रो) कामाला केंद्र आणि राज्य शासनाने मंजूरी दिली आहे. मेट्रो प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र शासनाकडे पाठपुरावा करत आहेत. […]Read More
पुणे प्रतिनिधी : कला म्हणजे उर्जा निर्मिती आहे. ती सूक्ष्म, संवेदनशील असून तिच्यापर्यंत जाण्यासाठी कलाकाराकडे समर्पण भाव असण्याची नितांत आवश्यकता आहे. कलेतील मूल्ये शिकवली जात नाही तर ती संस्कारित केली जातात. शास्त्र समजावले जाते, विद्या दिली जाते, तंत्र शिकविले जाते तर कला-सौंदर्य संस्कारित केले जाते. कला आत्मसात करण्यासाठी भावना शुद्ध हवी. ज्या देशात कलेला स्थान […]Read More
अहमदाबादमधील दुर्दैवी विमान अपघाताच्या घटनेनंतर विमान अपघात तपास विभागाने औपचारिक चौकशी सुरू केली आहे, असे नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेने ठरवून दिलेल्या आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉलनुसार ही चौकशी केली जाईल. मंत्र्यांनी माहिती दिली की सरकार या प्रकरणाची सविस्तर तपासणी करण्यासाठी विविध विषयांच्या तज्ञांचा समावेश असलेली एक उच्चस्तरीय समिती […]Read More
नाशिक दि १३– चौथे विश्व मराठी संमेलन 26 , 27 आणि 28 डिसेंबर रोजी नाशिकमध्ये घेण्याचे ठरले असल्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी नाशिक येथे पत्रकार परिषदेत जाहीर केले. विश्व मराठी संमेलना बाबत नाशिकच्या साहित्य क्षेत्रातील दिग्गजांबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत त्यांनी हा निर्णय घोषित केला .मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या […]Read More
यवतमाळ दि १३ —मोझरी येथे जनतेच्या विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री बच्चूभाऊ कडू यांनी सुरु केलेल्या अन्नत्याग उपोषणाला आज महत्त्वपूर्ण वळण मिळाले. राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी मोझरी येथे भेट देत बच्चूभाऊंची सविस्तर भेट घेतली आणि त्यांच्या मागण्यांबाबत सरकारसोबत सकारात्मक चर्चा करण्यात येईल, असा विश्वास दिला. मंत्री संजय […]Read More
अहमदाबाद विमान दुर्घटनेत 241 प्रवाशांचा मृत्यू झाला असून, यामध्ये महाराष्ट्रातील एकूण सहा जणांनी जीव गमावला आहे. हे सहा जण अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या विमानातून प्रवास करत होते. यामध्ये तीन क्रू मेम्बर आणि एक पायलट तसंच एक दाम्पत्य आहे. त्यांची नावं दीपक पाठक (बदलापूर), अपर्णा महाडिक (गोरेगाव), सुमित सभरवाल (पवई), महादेव पवार (सोलापूर), आशा पवार (सोलापूर), रोशनी […]Read More
पुणे, दि १३: पद्मश्री महर्षी डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ (माई) संस्थापित ‘सप्तसिंधू’ महिला आधार, बालसंगोपन व शिक्षण संस्था, संचलित ‘सन्मती बाल निकेतन”, मांजरी (बु.), पुणे येथे ‘झेप’ (वर्ष ३ रे ) उपक्रमाचा समारोप कार्यक्रम उत्साहात पार पडला. विलू पूनावाला फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जसविंदर नारंग सर यांची समारोप समारंभात प्रमुख पाहुणे आणि अध्यक्षीय स्वरूपात […]Read More
फुकेत, दि. १३ : आज थायलंडमधील फुकेतहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमान एआय ३७९ ला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्यानंतर थायलंडमध्ये विमानाचे आपात्कालीन लँडिंग करावे लागले. एअर इंडियाच्या या विमानातील १५६ प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. हे विमान अंदमान समुद्रावरून फुकेत विमानतळावर परत आले. धमकी देणाऱ्या व्यक्तीबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. काल अहमदाबाद […]Read More
आज सकाळी इस्रायलने इराणच्या अणुऊर्जा आणि इतर लष्करी तळांवर मोठा हल्ला केला आहे. यामध्ये २ उच्च इराणी लष्करी अधिकारी आणि २ अणुशास्त्रज्ञ ठार झाले आहेत. एका वरिष्ठ इराणी अधिकाऱ्याने न्यू यॉर्क टाइम्सला सांगितले की, राजधानी तेहरानमधील शहराक शाहिद महालती नावाच्या ठिकाणी हा हल्ला झाला. येथे उच्चपदस्थ इराणी लष्करी अधिकारी राहतात. हल्ल्यात ३ इमारती उद्ध्वस्त झाल्या […]Read More