Month: June 2025

महानगर

प्रश्न मार्गी लावल्याबद्दल मुल्लाबाग रहिवाशांनी मानले आभार

ठाणे दि १५– ठाणे- बोरिवली मार्गावरील नवीन बोगदा मुल्लाबाग ऐवजी सत्यशंकरच्या भिंतीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याने येथील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. वाहतूक कोंडी, धूळ आणि ध्वनी प्रदूषणाचा त्रास या निर्णयामुळे कमी होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांनी हा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल आज 15 जून रोजी खासदार नरेश म्हस्के यांचे मुल्लाबाग येथील  […]Read More

महानगर

बोरिवली ते ठाणे दुहेरी भुयारी रस्ता प्रकल्प बाधित पुनर्वसन प्रक्रियेला

मुंबई दि १५ – मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) ठाणे (टिकुजिनीवाडी) ते मागाठाणे–बोरिवली दरम्यान प्रस्तावित दुहेरी भुयारी रस्ता प्रकल्पाची कामे प्रगतीपथावर आहेत. या प्रकल्पासाठी मागाठाणे परिसरातील रूपवते नगर, मिलिंद नगर, फरलेवाडी, एस.आर.ए. प्रकल्पातील तसेच रस्त्यालगतच्या फूटपाथवरील अंदाजे ५७२ झोपड्या बाधित होत आहेत. प्रकल्पाचे काम पूर्ण होण्याच्या दृष्टीने प्रकल्पग्रस्तांचे तात्काळ पुनर्वसन होणे गरजेचे आहे. त्यासाठी […]Read More

राजकीय

रेशिमबाग भवनात झालीराष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप समन्वय बैठक …..

नागपूर दि १५– राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यंदा आपले शताब्दी वर्ष साजरे करणार असून या शताब्दी वर्षात पंच परिवर्तन तसेच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत घर चलो अभियानातून राज्य व केंद्र सरकारच्या योजना जनतेपर्यंत अधिकाधिक कशा पोहोचतील यासंदर्भात चर्चा करण्यासाठी नागपुरात आज रेशिमबाग येथील संघाचा स्मृती भवनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप मध्ये समन्वय बैठकीचे आयोजन […]Read More

अर्थ

मिडल ईस्ट संकट व ‘Friday the 13th’ ने बाजाराला धक्का;

जितेश सावंत Markets Rattled by Middle East Crisis and ‘Friday the 13th’; Crude Oil and Gold Prices Surge. इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर निर्माण झालेल्या भू-राजकीय तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली. यासोबतच अमेरिका-चीन व्यापार वाटाघाटींवरील अनिश्चिततेमुळे १३ जून रोजी संपलेल्या आठवड्यात भारतीय शेअर बाजार निर्देशांक सुमारे १ टक्क्यांनी घसरले. The geopolitical Read More

मराठवाडा

संतश्रेष्ठ मुक्ताबाई यांच्या पालखीचे मराठवाडा हद्दीत आगमन….

जालना दि १५:– मानाच्या सात पालख्यांपैकी एक असलेली आदीशक्ती संतश्रेष्ठ मुक्ताबाईंच्या पालखीचे आज विदर्भातून मराठवाड्यात आगमन झाले. मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात मुक्ताबाईंची पालखी दाखल झाली आहे. उद्या या पालखीचे जालना शहरात आगमन होणार आहे. दीड हजार महिला व पुरुष वारकरी असलेली ही पालखी सर्व पालख्यांमधील सर्वात जास्त पायी प्रवास करणारी पालखी आहे. मुक्ताबाईंच्या पालखी सोहळ्याचे यंदाचे […]Read More

राजकीय

एक डेपो, चार मेट्रो मार्गिका, मोघरपाडा येथील जमीन हस्तांतरित

मुंबई दि १५ – मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ठाणे जिल्ह्यातील मोघरपाडा येथे एकूण १७४.०१ हेक्टर क्षेत्रफळ जमीन अधिकृतपणे ताब्यात घेतली आहे. या जागेवर जागतिक दर्जाचा, एकात्मिक मेट्रो कार डेपो उभारण्यात येणार आहे. हा डेपो मेट्रो ४, ४ए, १० आणि ११ या मार्गिकांसाठी एक केंद्रीय संचालन व देखभाल केंद्र असून, सीएसएमटी ते मीरा रोड […]Read More

शिक्षण

विद्यार्थ्यांना शाळेतच मिळणार ST चे पास

मुंबई, दि. 15: शालेय विद्यार्थ्यांना एसटीचे पास शाळेतच मिळणार आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली आहे. विद्यार्थ्यांना पास काढण्यासाठी एसटी डेपोत जाण्याची गरज नाही. नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 16 जून 2025 पासून याची अंमलबजावणी होणार आहे. मंत्री सरनाईक म्हणाले, “नवीन शैक्षणिक वर्षातील शाळा 16 जूनपासून […]Read More

क्रीडा

ISSF विश्वचषकात 10 मीटर एअर रायफलमध्ये भारतीय जोडीने जिंकले सुवर्णपदक

बर्लिन येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ (इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट्स फेडरेशन) विश्वचषकात काल आर्य बोरसे आणि अर्जुन बाबुता या भारतीय जोडीने भारताला दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले.त्यांनी १० मीटर एअर रायफल मिश्र स्पर्धेत चीनच्या झिफेई वांग आणि लिहाओ शेंग यांना १७-७ असे हरवून सुवर्णपदक जिंकले. नॉर्वेच्या जीनेट हेग ड्युस्टॅड आणि जॉन-हर्मन हेग यांनी अमेरिकेच्या सेगेन मॅडलेना आणि पीटर […]Read More

देश विदेश

केदारनाथमध्ये हेलिकॉप्टरच्या भीषण अपघातात ७ जणांचा मृत्यू

केदारनाथमध्ये आज सकाळी गौरीकुंड परिसरात एक भीषण हेलिकॉप्टर अपघात झाला आहे. या अपघातामध्ये हेलिकॉप्टरमधील सर्व ७ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये महाराष्ट्रातील तिघांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. हे हेलिकॉप्टर आर्यन एव्हिएशन कंपनीचे होते आणि गुप्तकाशीहून केदारनाथकडे जात असताना त्रिजुगी नारायणजवळ जंगलात कोसळले. खराब हवामान, विशेषतः दाट धुके आणि अवकाळी पाऊस, अपघाताचे मुख्य […]Read More

ट्रेण्डिंग

*गिरणी कामगारांना मुंबईतच घरे मिळाली पाहिजेत

मुंबई, दि १५गिरणी कामगारांना मुंबईतच घरे मिळाली पाहिजेत,यासाठी राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर यांच्या नेतृत्वाखाली लढा उभा करण्याचा एकमुखी ठरावा द्वारे निर्णय आज राष्ट्रीय राष्ट्रीय मजूर संघाच्या कार्यालयात पार पडलेल्या सर्व संघटनांच्या बैठकीत घेण्यात आला आहे.गिरणी कामगार घराच्या प्रश्नावर आता सर्वच कामगार संघटनांनी एकत्र यावे, यासाठी राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव […]Read More