Month: June 2025

कोकण

कुंभार्ली घाट वाहतुकीसाठी बंद….

रत्नागिरी दि १६:– चिपळूण मधील कुंभार्ली घाट वाहतूकीसाठी बंद करण्यात आलाय. चिपळूण- कराड महामार्गावरील पाटण तालुक्यातील पूल वाहून गेल्याने कुंभार्ली घाटातील वाहतूक थांबवण्यात आलीय. या मार्गावरील वाहतूक देवरुख साखरपा – आंबा घाटमार्गे वळवण्यात आलीय तर पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांनी भोर किंवा इतर मार्गाचा वापर करावा.वाहन धारकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलय.ML/ML/MSRead More

अर्थ

SBI कडून सर्व FD आणि बचत खात्यांवरील व्याजदरात कपात

मुंबई, दि. १६ : SBI ने आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. बँकेने त्यांच्या सर्व एफडीवरील व्याजदर ०.१५ टक्के ते ०.२५ टक्के कमी केला आहे. हे व्याजदर ३ कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या एफडीवर आहे. एसबीआय बँकेचे नवीन दर १५ जूनपासून लागू झाले आहेत. आरबीआयने पुन्हा रेपो दर कमी केल्यानंतर बहुतेक बँका एफडीवरील व्याज कमी करत […]Read More

सांस्कृतिक

तुळजाभवानी देवीच्या ऐतिहासिक शिल्पावरून वाद

तुळजापूर, दि. १६ : महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या ऐतिहासिक शिल्पावरून आता मतभेद निर्माण होत आहेत. देवी तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देतानाचं 108 फूट उंच भव्य ऐतिहासिक शिल्प तुळजापुरात उभारलं जाणार आहे मात्र हे शिल्प नेमकं कसं असावं यावरून हा वाद निर्माण झाला आहे. आई तुळजाभवानी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं हे शिल्प आता वादाच्या […]Read More

गॅलरी

फ़ेरबंदर येथील रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई, दि १६महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे व माजी आमदार बाळा नांदगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त नुकतेच फेरबंदर येथे मनसे सरचिटणीस संजय नाईक यांच्या मार्गदर्शना खाली भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या रक्तदान शिबिरामध्ये विभागातील नागरिकांनी आणि मनसे च्या महाराष्ट्र सैनिक यांनी रक्तदान करून सहभाग घेतला. या शिबिरांमधून तब्बल 250 पेक्षा जास्त बाटल्या […]Read More

कोकण

रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागात पूरस्थिती…

रत्नागिरी दि १६:– गेल्या चार दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. अनेक भागांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. राजापूरमधील अर्जुना-कोदवली तर खेड तालुक्यातील जगबुडी, संगमेश्वर तालुक्यातील शास्त्री नदीने रविवारी रात्रीच इशारा पातळी ओलांडली आहे. दरम्यान आज सकाळपासून राजापूरच्या कोदवली नदीचे पाणी राजापूर बाजारपेठेत शिरण्यास सुरुवात झाली. काही वेळातच संपूर्ण बाजारपेठेला […]Read More

महानगर

स्वयंपुनर्विकास प्रस्तावांसाठी प्रीमियमवरील व्याज माफ

मुंबई दि १६– स्वयंपुनर्विकास हाच आत्मनिर्भर विकास असून यातून आत्मनिर्भर मुंबईकर उभा करू असा संकल्प व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वयंपुनर्विकास प्रस्तावांसाठी प्रीमियमवरील तीन वर्षापर्यंतचे व्याज माफ करू, असे आश्वासन चारकोप श्वेतांबरा सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या स्वयंपुनर्विकसित प्रकल्पाचे उद्घाटन व चावी वाटप कार्यक्रमात मुंबईकरांना दिले होते. त्या आश्वासनाची पूर्तता त्यांनी केली असून तसा शासन निर्णयही […]Read More

राजकीय

मुख्यमंत्र्यांनी पालघरमध्ये केले विद्यार्थ्यांचे स्वागत….

पालघर दि १६– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जिल्हा परिषद, केंद्रीय प्राथमिक शाळा दुर्वेस, पालघर येथे ‘शाळा प्रवेशोत्सव 2025-26’ कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांचे स्वागत केले आणि वृक्षारोपण देखील केले. यामाध्यमातून त्यांनी पर्यावरणाची कास धरत हरित महाराष्ट्राच्या निर्मितीचा संदेश दिला. नव्या शैक्षणिक वर्षातमुख्यमंत्री फडणवीस यांनी आज जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा दुर्वेस, पालघर येथे विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाबाचे फूल […]Read More

शिक्षण

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले चिमुकल्या विद्यार्थ्यांचे स्वागत

सातारा दि. १६:– शाळा ही संस्कार घडविणारे मंदिर असून या मंदिरात शिक्षक हे देशाची उज्वल भावी पिढी घडवित असतात. विद्यार्थ्यांनीही कला, क्रीडा, साहित्य , संस्कृती यासह सर्व विषयांमध्ये संपूर्ण ज्ञानक्षम होण्यासाठी शिक्षकांना प्रतिसाद द्यावा. भरपूर अभ्यास करुन मोठे व्हावे व देशाचा तसेच राज्याचा नावलौकीक वाढावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.सातारा तालुक्यातील कोडोली जिल्हा […]Read More

कोकण

एसटी महामंडळाचा अनागोंदी कारभार? चालत्या गाडीमध्ये टायर बाहेर आले…

महाड दि १६( मिलिंद माने)– रायगड जिल्ह्यातील एसटी महामंडळाचा कारभार अनागोंदी असल्याचे पुन्हा एकदा आज स्पष्ट झाले आहे बोरिवली मुरुड एसटी बस टायर धावत्या बस मध्ये बाहेर बाहेर आला, मात्र ड्रायव्हरच्या प्रसंगावधानामुळे अपघात टाळण्याची घटना आज मुरुड तालुक्यातील विहुर गावामध्ये घडली. महाड तालुक्यात महाड दापोली रोडवर एसटी महामंडळाच्या बसेसचा निसरड्या रस्त्यामुळे अपघात होण्याच्या घटना घडल्या […]Read More

ऍग्रो

या दिवशी राज्यात साजरा होणार ‘देशी गोवंश जतन-संवर्धन दिन’

महाराष्ट्र सरकारने 22 जुलै हा दिवस ‘शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन’ साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या शिफारशीवरून पशुसंवर्धन विभागाने हा निर्णय लागू केला आहे. महाराष्ट्र गोसेवा आयोगाने पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय विभागाला पत्र लिहून देशी गाईंच्या संवर्धनासाठी हा दिवस साजरा करण्याची मागणी केली होती. आयोगाने नमूद केले की, संकरित गाईंच्या […]Read More