Month: April 2025

महानगर

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ता कर संकलनात विक्रमी वाढ

मुंबई दि.1(एम एमसी न्यूज नेटवर्क):बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या करनिर्धारण आणि संकलन विभागाने सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात मालमत्ता कर संकलनात विक्रमी वाढ नोंदवली आहे. महापालिकेने निर्धारित ६,२०० कोटी रुपयांच्या उद्दिष्टाच्या जवळपास पोहोचत ६,१९८ कोटी ५ लाख रुपये कर संकलन केले असून, अतिरिक्त दंडाच्या स्वरूपात आणखी १७८ कोटी ५० लाख रुपये गोळा करण्यात आले आहेत. महानगरपालिकेच्या प्रशासकीय विभागांपैकी […]Read More

राजकीय

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त)

✅ मार्वल – महाराष्ट्र रिसर्च अँण्ड व्हिजीलन्स फॉर एनहान्स्ड लॉ एन्फोसर्मेंट लि.: शक्ति प्रदत्त समितीच्या अधिपत्याखाली, कृत्रिम बुद्धिमत्ता वापराची कामे प्राथम्याने देणार.(गृह विभाग) ✅ गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख खनिज व विशिष्ट औद्योगिक गौण खनिजाच्या व्यवस्थापनासाठी गडचिरोली जिल्हा खनिकर्म प्राधिकरण स्थापन करणार, यासाठीच्या प्रारूप अधिनियमास मान्यता(उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग) ✅ नोंदणीकृत वाहन निष्कासन केंद्रामध्ये स्वेच्छेने […]Read More

राजकीय

चोर सोडून संन्याशाला फाशी हे महायुती सरकारचे धोरण

मुंबई, दि. १ : काँग्रेस सरकार असताना महाराष्ट्रात पोलिसांचा धाक होता, मुंबई पोलिसांची तर स्कॉटलंड यार्डशी तुलना केली जात असे पण देवेंद्र फडणवीसांकडे गृहखात्याचा कारभार गेल्यापासून राज्यातील कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी केलेल्या विडंबन काव्याने सरकार बिथरले असून आता कामराचा कार्यक्रम पाहिलेल्या प्रेक्षकांनाही नोटीस बजावण्यात आल्याचे समजते. प्रेक्षकांना नोटीस […]Read More

राजकीय

कोण होणार भाजपचा नवा अध्यक्ष?

नवी दिल्ली, दि. 1 : भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार? ही चर्चा सध्या राजधानीत चांगलीच रंगली आहे. मोदी नागपूरला जाऊन आल्यानंतर तर येत्या आठवडा भरात नवीन अध्यक्ष जाहीर करण्यात येईल असे सांगितलं जातंय.भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे नड्डा यांचा कार्यकाळही संपला आहे. पक्षाच्या स्थापना दिनाआधी भाजपच्या राष्ट्रीय […]Read More

महानगर

मुंबईत कोसळणार पावसाच्या हलक्या सरी, ४ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

महाराष्ट्रातील वातावरणात पुन्हा एकदा बदल झाला आहे. अलीकडेच काही भागात अवकाळी पाऊस पडला होता. त्यानंतर भारतीय हवामान खात्याने राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचा इशारा दिला आहे. जळगाव, पुणे, अहिल्यानगर, नाशिक जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे तर मुंबईत पुढील ४८ तासांत पावसाच्या हलक्या सरी कोसळणार आहेत. मागील काही दिवसांपासून शहरातील नागरिक उकाड्याने हैराण झाले होते […]Read More

ट्रेण्डिंग

आता कागदपत्रांशिवाय पीपीएफमधून काढता येतील ५ लाख रूपये

तुमच्या पगारातून दर महिन्याला पीएफ फंडात पैसे जमा होत असतील तर ही बातमी महत्त्वाची आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) देशातील ७.५ कोटी सदस्यांना मोठा दिलासा दिला आहे. आपात्कालीन परिस्थितीत पीएफ काढण्यासाठी अनेक कागपत्रे जमा करावी लागत होती. मात्र, ही सुविधा सोपी करण्यासाठी ईपीएफओने नियमात बदल केले आहे. आता पीएफ काढण्यासाठी ऑटो सेटलमेंट मर्यादा […]Read More

देश विदेश

गुजरातमधल्या फटाका फॅक्ट्रीत भीषण आग लागून स्फोट

गुजरात येथील बनासकांठा येथे असलेल्या फटाका फॅक्ट्रीत मंगळवारी १ एप्रिलला भीषण आग लागली. या घटनेत १७ कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. काही वेळापूर्वीच ही घटना घडली आहे. या घटनेनंतर मदत आणि बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. या घटनेत मृतांची संख्या वाढण्याचीही शक्यता आहे.सुरूवातीला फटाका फॅक्ट्रीला आग लागली आणि त्यानंतर स्फोट झाले आणि आगीचा […]Read More

राजकीय

भारताची आर्थिक प्रगती संचलित करणारी भारतीय रिझर्व्ह बँक!

मुंबई दि १ — राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 90 वा वर्धापन दिन समारोप कार्यक्रम’ एनसीपीए, मुंबई येथे संपन्न झाला. या विशेष प्रसंगी त्यांनी रिझर्व्ह बँकेच्या अविस्मरणीय प्रवासाचे प्रतीक म्हणून एका विशेष कस्टमाईज्ड ‘माय स्टॅम्प’चे प्रकाशन केले. मानवी संस्कृतीच्या उत्क्रांतीला बँकिंग प्रणालीने दिलेली गती इतर कोणत्याही […]Read More

गॅलरी

रत्नागिरीमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी…

रत्नागिरी दि १:– सोमवारी मध्यरात्री रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. चिपळूण, संगमेश्वर, गुहागर, रत्नागिरी तालुक्यातील भागांमध्ये पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या. विजेच्या कडकडाटासह, वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे काही काळ वीजपुरवठा खंडित झाला होता. अवकाळी पावसामुळे आंबा, काजू, पोफळी बागायतदार शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दरम्यान आज सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण पहायला मिळत […]Read More

कोकण

अलीबागच्या कुंडलिक खाडीत भरल्या शिडाच्या होडींच्या स्पर्धा

अलिबाग दि १ —रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील आग्राव इथल्या कुंडलिका खाडीत शिडाच्या होड्यांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत पन्नासहून अधिक होड्या सहभागी झाल्या होत्या. शिडाच्या होड्या कालबाह्य झाल्या असल्या तरी आजही इथल्या कोळी बांधवांनी ही परंपरा गेली १०० वर्षापासून जपली आहे. कुंडलिका खाडीत शिडाच्या होड्यांच्या स्पर्धेचा थरार अनुभवायला हजारो नागरिकांनी गर्दी केली होती. […]Read More