Month: April 2025

महानगर

मुंबईतील टँकर संपाबाबत मुंबई मनपाचा मोठा निर्णय

मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या नवीन नियमावलीवरून सुरू झालेल्या टँकर संपावर तोडगा निघेपर्यंत बृहन्मुंबई महानगरपालिकेने MCGM मोठा निर्णय घेतला आहे. आपत्कालीन व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत मुंबईतील विहिरी, कूपनलिका आणि खासगी पाण्याचे टँकर्स अधिग्रहित करण्याचे आदेश MCGM आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत. मुंबईत पाण्याची टंचाई जाणवू नये यासाठी, विशेषत: उन्हाळ्यात, […]Read More

देश विदेश

विधेयकावर तीन महिन्यांत निर्णय घेणे राष्ट्रपतींना बंधनकारक

नवी दिल्ली,दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तमिळनाडू सरकारने मंजूर केलेली १० विधेयके अडवून ठेवल्याची राज्यपालांची कृती बेकायदेशीर असल्याचे निरीक्षण नोंदवून त्यांना फटकारणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाने आता राष्ट्रपतींनाही विधेयकांवर निर्णय घेण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रपतीसाठी वेळेची मर्यादा निश्चित करण्याची ही पहिलीच वेळ आहे. राज्यपालांकडून राष्ट्रपतींकडे पाठवलेली विधेयके आता […]Read More

ट्रेण्डिंग

वक्फ कायद्यांतर्गत पहिली धडक कारवाई

भोपाळ, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशभर नुकताच वक्फ कायदा लागू झाल्यानंतर आता याबाबत देशभरातून पुढे आलेली प्रकरणे मार्गी लागण्याचे काम आता सुरु झाला आहे. या अंतर्गत पहिली कारवाई मध्यप्रदेशात झाली आहे. पन्ना जिल्ह्यात अनधिकृत पद्धतीने बांधण्यात आलेल्या मदरशावर हातोडा चालविण्यात आला आहे. विशेष म्हणजे मदरशा चालविणाऱ्यांनीच स्वतःहून पुढाकार घेऊन मदरशाचे पाडकाम केले. पन्ना […]Read More

विदर्भ

२०२६ अखेर शेतकऱ्यांना १२ तास मोफत वीज

वर्धा, दि.१३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : डिसेंबर २०२६ पर्यंत राज्यातील ८० टक्के शेतक-यांना वर्षभर १२ तास मोफत वीज उपलब्ध करुन देण्यात येईल तसेच येत्या पाच वर्षात राज्यात सामान्य नागरिकांचे वीज बील दरवर्षी कमी होईल असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आर्वी येथे विविध विकास कामांच्या लोकार्पण तथा भूमिपूजन प्रसंगी केले. तसेच वर्धा जिल्ह्यात लोअर […]Read More

ऍग्रो

धाराशिवमध्ये अणुऊर्जा आधारित अन्नप्रक्रिया प्रकल्प

धाराशिव, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्य सरकारच्या मित्र या संस्थेच्या माध्यमातून राज्यात वेगवेगळे मोठे प्रकल्प सुरू करण्याचा मुख्यमंत्र्यांचा संकल्प आहे, राज्यात या माध्यमातून पाच मोठे प्रकल्प सुरू करण्याचा मुख्यमंत्र्यांचा मानस असून या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अणुऊर्जेवर आधारित अन्नप्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यासंदर्भात प्रकल्प अहवाल तयार करण्यात येत आहे. कांद्याच्या दरात स्थिरता […]Read More

देश विदेश

स्वतःच्या रक्तातून बाबासाहेबांना अभिवादन

मुंबई दि.13 (एम एमसी न्यूज नेटवर्क): चित्रकलेचा उल्लेख झाला की डोळ्यासमोर रंग, कुंचला आणि कॅनव्हास उभा राहतो. पण नाशिक जिल्ह्यातील देवळाली तालुक्यातील हाडोळा गावचे डॉ. संतोष कटारे यांनी या पारंपरिक चौकटीला छेद देत एक आगळीवेगळी कला विकसित केली आहे. ब्लड आर्ट! डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर, डॉ. कटारे यांनी स्वतःच्या […]Read More

बिझनेस

ट्रम्प यांचा अनपेक्षित ९० दिवसांचा विराम,आर्थिक भूकंपानंतर दिलासा

मुंबई, दि. 13 (जितेश सावंत) : Trump’s Unexpected 90-Day Pause: A Relief After the Economic Quakeअत्यंत अस्थिर अश्या आठवड्याची सुरुवात फार मोठ्या घसरणीने झाली. डोनाल्ड ट्रम्प यांच्या शुल्काला चीनच्या प्रत्युत्तराने ,जागतिक बाजारात मोठा आर्थिक भूकंप झाला त्याचा फटका भारतीय बाजाराला देखील झाला. परंतु अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी परस्पर करांवर प्रत्युत्तर न देणाऱ्या 75 देशांना 90 दिवसांचा अनपेक्षितपणे […]Read More

ऍग्रो

कृषी विभागाच्या योजनांसाठी शेतकरी ओळख क्रमांक बंधनकारक

मुंबई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना जाहीर केल्या जातात. या योजना खऱ्या लाभार्थांपर्यंत पोहोचवण्यासाठी आता शेतकरी ओळख क्रमांक देणे आवश्यक आहे. कृषी विभागाच्या योजनांसाठी १५ एप्रिलपासून शेतकरी ओळख क्रमांक अनिवार्य असणार आहे. शेतकऱ्यांना या ओळख क्रमांकाशिवाय कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने अ ग्रीस्टॅक पोर्टलवर नोंदणी […]Read More

ट्रेण्डिंग

या राज्यात सुरु होणार ट्रान्सजेंडर शाळा

चंदीगड, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हरियाणा मानवाधिकार आयोगाने शिक्षण विभागात समानता आणि समावेशाला प्रोत्साहन देण्यासाठी एका ट्रान्सजेंडर शाळेला मान्यता दिली आहे. आयोगाने गुरुवार, ११ एप्रिल रोजी याबाबत एक निवेदनही जारी केले. त्यानुसार, आयोगाने कर्नालस्थित शाळेच्या संस्थापकाच्या बाजूने निर्णय दिला आहे. या शाळेत वंचित मुलांना शिक्षण दिले जाते. ही शाळा २०१४-१५ मध्ये ८०० चौरस […]Read More

पर्यटन

अलिबाग – समुद्रकिनाऱ्यावरील शांत आणि स्वच्छ अनुभव

मुंबई, दि. 12 एप्रिल 2025 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मुंबईच्या喧्यातून काही काळ विश्रांती घ्यायची असेल, तर अलिबाग हे उत्तम ठिकाण आहे. शांत किनारे, स्वच्छ वाळू आणि नितळ निळसर पाणी यामुळे अलिबाग पर्यटकांचे आवडते ठिकाण बनले आहे. मुंबईहून केवळ १०० किलोमीटर अंतरावर असलेलं हे ठिकाण एक दिवसीय सहलीसाठी तसेच विकेंड ट्रिपसाठी आदर्श आहे. अलिबागचे समुद्रकिनारे म्हणजेच निसर्गाचा […]Read More