Month: April 2025

देश विदेश

UPSC परीक्षेतमहाराष्ट्राचे 90 हून अधिक यशस्वी

नवी दिल्‍ली, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा 2024 चा अंतिम निकाल आज जाहीर झाला असून देशभरातून एकूण 1009 उमेदवार यशस्वी झाले आहेत. यापैकी राज्यातून 90 हून अधिक उमदेवारांनी घवघवीत यश मिळविले आहे. अर्चित पराग डोंगरे राज्यातून प्रथम आले असून देशात 3 रा क्रमांक पटकाविला आहे. तर शिवांश सुभाष जगदाळे […]Read More

राजकीय

काँग्रेस पक्षाची राज्यात ‘संविधान बचाव’ आणि ‘सद्भावना यात्रा’

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार राज्यात संविधान बचाव यात्रा तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आयोजित सद्भावना यात्रा काढण्यात येणार आहेत. २९ एप्रिलला नाशिक येथे सद्भावना यात्रेचे आयोजन केले असून १ मे रोजी सद्भावना सत्याग्रह तर ४ आणि ५ मे रोजी परभणी येथे सद्भावना यात्रा तथा संविधान बचाव यात्रेचे आयोजन […]Read More

राजकीय

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकासाठी १४२ कोटींची तरतूद

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : स्त्री शिक्षणाची मशाल पेटवणाऱ्या आद्य क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी मौजे नायगाव (ता. खंडाळा, जि. सातारा) येथे भव्य स्मारक आणि महिला प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. मौजे नायगाव येथील या स्मारकासाठी 142 कोटी 60 लाख रुपये तर […]Read More

राजकीय

मत्स्यव्यवसायाला आजपासून मिळाला कृषीचा दर्जा

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :- मत्स्यव्यवसायाला आजपासून राज्यात कृषीचा दर्जा देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. या ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्व मंत्रिमंडळाचे आभार मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी मानले. ते मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी […]Read More

ऍग्रो

शेतीला त्रासदायक वानर, माकडांचे निर्बीजीकरण करण्याचा वन विभागाचा निर्णय

मुंबई दि २२ — राज्यातील शेतीला त्रासदायक ठरणाऱ्या आणि फळबागा उध्वस्त करणाऱ्या कोकणातील माकड , वानर यांची संख्या मर्यादित करण्यासाठी त्यांची नसबंदी करण्याची दोन केंद्रे कोकणात सुरू करण्यात येतील असा निर्णय वनमंत्री गणेश नाईक यांनी आज यासंदर्भातील एका बैठकीत घेतला आहे. दापोली आणि मंडणगड तालुक्यातील शेतकऱ्यांनी दापोली ग्रामोदय शेतकरी कंपनीच्या वतीने वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या त्रासाबाबत […]Read More

पर्यटन

भारतातील सर्वोच्च पर्यटन स्थळांपैकी, खजुराहो

खजुराहो, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  प्रसिद्ध युनेस्को-सूचीबद्ध मंदिरांचे घर, खजुराहो हे भारतातील सर्वोच्च पर्यटन स्थळांपैकी एक आहे. उष्ण आणि दमट उन्हाळ्याच्या महिन्यांनंतर, खजुराहो ऑगस्ट महिन्यात आल्हाददायक हवामानाचा आनंद घेते जे येथे एक लहान सुट्टी घालवण्याचा एक आदर्श वेळ आहे. हीच ती वेळ आहे, जेव्हा तुम्हाला येथे पर्यटकांची संख्या कमी आढळेल आणि त्यामुळे तुम्ही खाली […]Read More

Uncategorized

पिठलं भाकरी रेसिपी

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पिठलं भाकरी रेसिपी 1 टीस्पून जिरे 8 पाकळ्या लसूण 1 कप बेसन (बेसन) २ इंच आले 8 तुकडे हिरव्या मिरच्या आवश्यकतेनुसार मीठ 6 कप पाणी 1/2 टीस्पून हिंग 1 टीस्पून हळद 1 टीस्पून मोहरी २ टेबलस्पून रिफाइंड तेल PGB/ML/PGB22 April 2024Read More

देश विदेश

जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जम्मू आणि काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे हाहाकार माजला आहे. पावसाची संततधार आणि ढगफुटीच्या घटनेने भीषण स्थिती निर्माण झाली आहे. अशातच आता रियासी जिल्ह्यात चिनाब नदीच्या पाण्याचा प्रवाह लक्षात घेता, खबरदारीचा उपाय म्हणून सलाल धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत.जम्मू आणि काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे हाहाकार माजला आहे. पावसाची संततधार आणि ढगफुटीच्या घटनेने […]Read More

शिक्षण

UPSC चा निकाल लागला! मुलींची बाजी, मात्र, पुण्याच्या आर्चित डोंगरे

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या युपीएससी (UPSC) परीक्षेचा निकाल मंगळवार २२ एप्रिलला जाहीर झाला. शक्ती दुबे या महिला उमेदवाराने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे.तर, तर, हर्षिता गोयल देशात दुसरी आली असून अर्चित डोंगरेने देशात तिसरा क्रमांक पटकावत बाजी मारली आहे. अर्चित हा पुण्याचा असून तो देशात तिसरा तर, […]Read More

पर्यावरण

जागतिक वसुंधरा दिन : भारतीय संस्कृतीत वसुंधरेचे महत्त्व

राधिका अघोर आज जागतिक वसुंधरा दिन आहे. 1970 पासून दरवर्षी 22 एप्रिल हा दिवस जागतिक वसुंधरा दिन म्हणून साजरा केला जातो. सुरुवातीला काही पर्यावरण स्नेही संघटनांनी हा दिवस साजरा करण्यास, त्यानिमित्त पृथ्वी संरक्षणासाठी जनजागृती करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आज अनेक देशांत जागतिक पृथ्वी दिन साजरा केला जातो. भारतात पृथ्वीला माता म्हणतात,समुद्र वसने देवी पर्वत स्तन […]Read More