Month: March 2025

देश विदेश

काँग्रेस आणि उबाठा आघाडी म्हणजे, औरंगजेब फॅन क्लब,खासदार म्हस्के यांची संसदेत

नवी दिल्ली, 27- स्वातंत्र्यापासून भ्रष्टाचाराला शिष्टाचार मानणारी काँग्रेस आणि उबाठा पक्षाची अभद्र आघाडी इंडीया ' नसूनऔरंगजेब फॅन क्लब’ असल्याची घाणाघाती टीका ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी आज संसदेत केली. ते म्हणाले की,सहकाराच्या नावाखाली काँग्रेसने 50 वर्ष फक्त भ्रष्टाचारच केला आहे. केंद्रातील युतीच्या सरकारने नवसंशोधन व पारदर्शकता आणून सहकार क्षेत्राला समृद्धीच्या दिशेने नेले आहे. सहकारी […]Read More

पर्यटन

एसटी कडून उन्हाळी गर्दीच्या हंगामासाठी ७६४ नवीन फेऱ्या

मुंबई: दि.२७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये प्रवाशांच्या सेवेसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत दरवर्षीप्रमाणे जादा वाहतूक करण्यात येणार आहे. यंदा देखील उन्हाळी जादा वाहतूकीसाठी दररोज लांब पल्ल्याच्या ७६४ फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले असून या सर्व फेऱ्या आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.दर वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत १५ एप्रिल, ते १५ जून पर्यंत एसटी […]Read More

ट्रेण्डिंग

जागतिक रंगभूमी दिन : रंगभूमीत काळानुरूप बदल करत ती लोकप्रिय

राधिका अघोर २७ मार्च हा दिवस दरवर्षी ‘जागतिक रंगभूमी दिन’ म्हणून साजरा केला जातो. १९६१मध्ये ‘युनेस्को’च्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिटय़ूटने या दिवसाची सुरुवात केली होती. पहिला जागतिक रंगभूमी दिन १९६२ मध्ये साजरा झाला. त्यानंतर दरवर्षी या दिवशी विविध कार्यक्रम आणि उपक्रमांद्वारे जागतिक रंगभूमी दिन उत्साहाने साजरा होतो. यानिमित्ताने जगभरातील नाट्य जगतातील महत्त्वाची एक व्यक्ती संदेश देते. […]Read More

देश विदेश

संसदेत बोलू देत नसल्याचा राहुल गांधी यांचा आरोप, लोकसभा अध्यक्षानी

नवी दिल्ली, 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आपल्याला विरोधी पक्ष नेता असून देखील संसदेच्या सभागृहात बोलू देत नसल्याचा गंभीर आरोप खासदार राहुल गांधी यांनी आज केला. तर विरोधी पक्ष नेत्यांनी संसदेची मर्यादा राखावी, या शब्दात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी देखील राहुल गांधी यांना खडे बोल सुनावले.गांधी म्हणाले की,मी सभागृहात बोलत असताना ओम बिर्ला यांनी […]Read More

महानगर

फनेल झोनमधील पुनर्विकासासाठी नियमात आता स्वतंत्र तरतूद

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मुंबईतील सांताक्रूझ, पार्ले आणि कुर्ला या भागात विमानतळाच्या फनेल झोनमधील उंचीच्या निर्बधांमुळे बाधित इमारतींचा पुनर्विकासास चालना मिळावी यासाठी बृहन्मुंबई विकास नियंत्रण तथा प्रोत्साहन नियमावली-२०३४ मध्ये स्वतंत्र तरतूद करण्यात आल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात केली. यामुळे निर्बंध असलेल्या बृहन्मुंबई क्षेत्रातील बाधित क्षेत्रातील जुन्या इमारतींचा पुनर्विकास […]Read More

आरोग्य

उल्हासनगरमधुन २६ बोगस डॉक्टरांवर आरोग्य विभागाकडून कारवाई

उल्हासनगर, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ठाणे जिल्ह्यातील दाट लोकवस्तीचे शहर असलेल्या उल्हासनगरमध्ये बोगस डॉक्टरांचा मोठा सुळसुळाट झाला आहे. आरोग्य विभागाने याबाबत आज कडक कारवाई करत शहरातील २६ बोगस डॉक्टरांचे बिंग फोडले आहे. उल्हासनगर शहरात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट असल्याच्या अनेक तक्रारी जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी कार्यालयात तक्रारदारांनी केल्या होत्या प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने प्राथमिक कार्यवाही करणेकरीता […]Read More

राजकीय

अधिवेशनाच्या शेवटचा दिवस मुख्यमंत्र्यांनी पुन्हा गाजवला

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईत सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे आज सूप वाजले, आजच्या शेताच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी संविधानावर अभ्यासपूर्ण भाषण करत आजचा दिवस तर गाजवलाच पण सभागृहाची पातळी अत्युच्च उंचीवर नेली.भारताचे संविधान हे जगात सगळ्यात चांगलं संविधान आहे, या संविधानाने सामाजिक, आर्थिक अशी रक्तविहिन क्रांती आणली असं वर्णन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी […]Read More

विज्ञान

देशातील पहिली कार्बन डेटिंग कालमापन सुविधा मुंबई विद्यापीठात सुरू

मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशात कार्बन डेटिंगसाठी पहिले एक्सलरेटर सेंटर सुरु करण्याचा बहुमान मुंबई विद्यापीठास मिळाला आहे. आज पासून एक्सलरेटर मास स्पेक्ट्रोमेट्री, एएमएस मुंबई विद्यापीठात पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाली आहे. यासाठी सुमारे २० कोटी रुपये निधी खर्च करण्यात आला आहे. या प्रगत तंत्रज्ञान सुविधेची पहिली चाचणी आज मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र […]Read More

पर्यटन

राज्यातील ४५ रोपवे प्रस्तावांना तत्त्वतः मान्यता

मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पर्वतमाला ‘ योजनेत राज्यातील ज्या ४५ रोपवे प्रकल्पांना राज्य शासनाने तत्वतः मान्यता दिली आहे . विशेष म्हणजे राज्यातील सर्वात दुर्गम समजल्या जाणाऱ्या अकोले तालुक्यातील कळसुबाई शिखर आणि हरिश्चंद्रगड या दोन रोपवे योजनांचा समावेश आहे. कळसुबाई आणि दुर्गराज हरिश्चंद्रगड ही दोन्ही ठिकाणे दुर्ग प्रेमींची, पर्यटकांची आवडती ठिकाणे असून या […]Read More

राजकीय

ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश

मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील प्रमुख कृषी आधारित उद्योग असलेला साखर उद्योग हा मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागणारा उद्योग आहे. गाळप हंगामात ऊस तोडणीसाठी दरवर्षी हजारो मजूर आपले घरदार सोडून शेतांवरच वास्तव्य करतात. या दरम्यान या कामरागांमधील स्त्रीयांच्या आरोग्याची मोठी हेळसांड होते. याबाबत उपाययोजना शोधण्यासाठी राज्य शासनाने एक समिती स्थापन केली होती. महाराष्ट्र […]Read More