Month: February 2025

खान्देश

त्र्यंबकेश्वर मंदिरातील सांस्कृतिक कार्यक्रमांवर पुरातत्व विभागाकडून आक्षेप

नाशिक, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशभरातील बारा ज्योर्तिलिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वरमध्ये महाशिवरात्री निमित्त अनेक कार्यक्रमांचं आयोजन दरवर्षी केलं जातं. अशातच यंदा महाशिवरात्रीनिमित्त मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्या ‘शिवस्तुती नृत्याविष्कार’ कार्यक्रम देवस्थान ट्रस्टनं आयोजित केला आहे. पण, या कार्यक्रमावर आधीच माजी विश्वस्तांनी नारीज व्यक्त केलीय. अशातच, आता पुरातत्व विभागानं आक्षेप व्यक्त केल्यामुळे एकंदरीतच कार्यक्रम […]Read More

कोकण

तब्बल १४ महिन्यानंतर गगनबावडा घाटातून वाहतूक सुरू

सिंधुदुर्ग दि २५–जिल्ह्याला कोल्हापूरला जोडणारा वैभववाडी गगनबावडा घाट तब्बल 14 महिने बंद होता. या गटात दुरुस्ती काम हाती घेण्यात आले होते .या घाटात आता एकेरी वाहतूक तब्बल 14 महिन्यानंतर सुरू करण्यात आली आहे. नूतनीकरणासाठी हा घाट 22 जानेवारी 2024 पासून पूर्णपणे बंद करण्यात आला होता. घाट बंद असल्याने या मार्गावरून नियमित येजा करणाऱ्या वाहनधारकांना अनेक […]Read More

पर्यावरण

ओडिशाच्या समुद्रकिनाऱ्यावर झाली लाखो कासवांची गर्दी

ओडिशाच्या समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात कासवांनी गर्दी केली आहे. ओडिशा राज्यातील रुशिकुल्य रुकरी हे एक प्रसिद्ध ठिकाण आहे, जे भारतातील कासवांच्या (ऑलिव्ह रिडली कासव) सर्वात मोठ्या सामूहिक घरट्यांसाठी ओळखले जाते. येथे हजारो कासवे प्रत्येक वर्षी अंडी घालण्यासाठी येतात. यंदा येथे कासवांनी विक्रम केला आहे. पोदामपेटा ते बटेश्वरपर्यंतच्या समुद्रकिनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले या प्रजातीच्या तब्बल 6.41 लाखांहून अधिक […]Read More

राजकीय

कॉंग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांना जन्मठेपेची शिक्षा

काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुणार यांना दिल्लीच्या राउज अॅव्हेन्यू न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. १९८४ मध्ये ज्या शीख विरोधी दंगली दिल्लीत उसळल्या त्या प्रकरणी ते दोषी ठरले असून मंगळवारी (दि. 25 फेब्रुवारी) न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. महत्त्वाचं म्हणजे, सज्जन कुमार आधीच दिल्ली कँट प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत.Read More

करिअर

फ्रीलान्सिंगद्वारे करिअर – स्वयंपूर्णतेसाठी सर्वोत्तम पर्याय

मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नोकरीच्या ठरावीक वेळा आणि ऑफिसमध्ये बसून काम करण्याचा कंटाळा आला आहे का? फ्रीलान्सिंग हे आधुनिक जगातील एक स्वयंपूर्ण आणि लवचिक करिअर आहे. फ्रीलान्सिंग म्हणजे काय? फ्रीलान्सिंग म्हणजे कोणत्याही कंपनीशी कायमस्वरूपी नोकरी न करता स्वतंत्ररित्या विविध प्रोजेक्ट्सवर काम करणे. यामध्ये लेखन, ग्राफिक डिझाइन, वेब डेव्हलपमेंट, डिजिटल मार्केटिंग आणि अनेक […]Read More

ट्रेण्डिंग

पंतप्रधान मोदींनी सुरु केली लठ्ठपणाविरुद्ध मोहीम

नवी दिल्ली, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या भारतीय लोकांना होत असलेल्या जीवनशेैलीबाबतच्या आजारांमध्ये वाढते वजन ही गंभीर समस्या होत चालली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लठ्ठपणाविरुद्ध मोहीम सुरू केली. यासाठी त्यांनी विविध क्षेत्रातील 10 प्रमुख व्यक्तींना नामांकित केले. यामध्ये जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, उद्योगपती आनंद महिंद्रा आणि मनु भाकर यांसारख्या […]Read More

महानगर

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा अर्ध्यावर

मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीसच तापमानाचा पारा वाढू लागला आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी पाण्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. महानगरी मुंबईमध्ये देखील गेल्या आठवड्यापासून तापमान झपाट्याने वाढत आहे. यावर्षी मुंबईला पिण्याच्या पाण्याचा तुटवडा सहन करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा अर्ध्यावर म्हणजेच ७ लाख ४७ […]Read More

महानगर

जनता दरबार एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी नव्हे …

ठाणे दि २४:– शिवसेना (शिंदे गट) पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहरात जनता दरबाराचे आयोजन करून वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शह दिल्याची चर्चा रंगली असतानाच, त्यावर आता नाईक यांनी सोमवारी स्पष्टीकरण दिले. जनता दरबार एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी नव्हे तर जनतेला दिलेला शब्द पाळण्यासाठी महायुती म्हणून तिन्ही पक्ष प्रयत्न करीत असून […]Read More

महानगर

येत्या नवीन शैक्षणिक वर्षापासून ” स्कूल बसेस ” साठी नियमावली.

मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या खाजगी स्कूल बसेस साठी येत्या नवीन शैक्षणिक वर्षापासून नियमावली निश्चित करण्यात येणार आहे . त्यासाठी निवृत्त परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्य समिती नेमण्यात आली असून त्यांना पुढील एक महिन्यांमध्ये या संदर्भातला अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अशी माहिती परिवहन […]Read More

राजकीय

साहित्य संमेलन राजकीय नाही मात्र नीलम गोऱ्हे यांचे वक्तव्य अनावश्यक

मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिल्लीत पार पडलेले 98 वे मराठी साहित्य संमेलन म्हणजे राजकीय व्यासपीठ होते अशा पद्धतीचा आरोप मला अमान्य आहे, तरीही उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी एका परिसंवादात व्यक्त केलेले वक्तव्य अनावश्यक होते असे मत संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. मुंबईत घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. […]Read More