Month: August 2024

पर्यटन

गणपतीसाठी चाकरमान्यांचा…एसटीला उदंड प्रतिसाद..!

मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :०७ सप्टेंबर २०२४ रोजी श्री गणरायाचे आगमन होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी मुंबई, ठाणे आणि पालघर विभागातून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनी पहिली पसंती एसटीला दिली आहे. त्यामुळे एसटीच्या १३०१ बसेस गट आरक्षणासह एकूण २०३१ जादा बसेस आतापर्यंत फुल्ल झालेले आहेत. मुंबईतील कोकणाच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा […]Read More

महानगर

राष्ट्रवादी काँग्रेसची ‘जनसन्मान यात्रा’ ८ ऑगस्टपासून

मुंबई दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  राष्ट्रवादी काँग्रेसची ‘जनसन्मान’ यात्रा येत्या ८ ऑगस्टपासून नाशिकच्या दिंडोरी येथून सुरू होणार असून त्यामध्ये उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई आणि विदर्भ असा हा पहिला टप्पा ३१ ऑगस्टला संपणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.लोकशाहीवर आमचा दृढविश्वास असल्यानेच आम्ही ‘जनसन्मान यात्रा’ हे […]Read More

खान्देश

नदीपात्रात अडकलेल्या १२ मासेमारांची हेलिकॉप्टरने सुटका…

नाशिकदि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  जिल्ह्यातील मालेगाव येथील गिरणा नदी पात्रात अडकलेल्या बारा मासेमारांची सुटका हेलिकॉप्टरने करण्यात आली. जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसत आहे. त्यामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाली आहे. नाशिकच्या सात धरणांमधून सध्या विसर्ग सुरु असल्याने नद्यांना पूर आल्याचे चित्र आहे. त्यातच रविवारी गिरणा नदीच्या पाण्यात मासे पकडायला गेलेले १२ […]Read More

बिझनेस

सेन्सेक्स जवळपास २६०० अंकांनी गडगडला, शेअर बाजार घसरण्याची कारणे काय

मुंबई दि. ५(जितेश सावंत): जागतिक अर्थव्यवस्थेतील मंदीचा फटका जगभरातील बाजारावर पडताना दिसला. आशियाई बाजार मोठ्या प्रमाणात कोसळले. भारतीय बाजार देखील मोठ्या प्रमाणात गडगडले. जागतिक बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री झाली. सेन्सेक्स जवळपास 2600 अंकांनी गडगडला आणि निफ्टी 800 अंकांची घसरण झाली. बाजारात चौफेर विक्री.होताना दिसली. आज शेअर बाजार घसरण्याचे कारण? 4 BoJ धोरण. BoJ Policyबँक ऑफ जपानने […]Read More

विदर्भ

घरटी बनविण्यासाठी सुगरणीची लगबग सुरू

वाशिम  दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सप्टेंबर पर्यंत विणीचा हंगाम असल्याने वाशीम जिल्ह्यातील रानमाळावर गवताचे पाते शोधणाऱ्या दुर्मिळ सुगरण पक्ष्यांचे होत आहे. नेहमीपावसाळ्याच्या दिवसांत सुगरण पक्ष्यांच्या विणीचा हंगाम असतो. धरतीने हिरवा शालू परिधान करताच या पक्ष्याला विणीच्या हंगामाचे वेध लागतात. त्यामुळे वाशीम जिल्ह्यातील रानमाळावर आणि ग्रामीण भागात सध्या विहिरीच्या काठावर असलेल्या झाडा झुडपावर सुगरण […]Read More

कोकण

ग्रामस्थांनी ‘देशी जुगाड’ करत उभारला पूल…

ठाणेदि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  मुरबाड तालुक्यातील फांगुळ गव्हाण हद्दीत अडीच हजार लोकसंख्या असलेली 3 महसुली गावे आणि 4 आदिवासी पाड्यात जाणाऱ्या रस्त्यावर भलामोठा ओढा असल्यानं या भागातील रुग्ण, वृद्ध, विद्यार्थ्यांसह महिलांना जीव धोक्यात घालून पाण्याच्या प्रवाहातून प्रवास करावा लागत आहे. विशेष म्हणजे गेल्या 15 वर्षांपासून या भागातील ग्रामस्थ या ओढ्यावर पूल उभारण्याची मागणी […]Read More

खान्देश

श्रावणी सोमवार निमित्त ग्राम इतिहास चित्र माध्यमातून

अकोला दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पहिल्या श्रावण सोमवाराच्या निमित्ताने अकोल्यातील सुप्रसिद्ध चित्रकार अमृता सेनाड यांनी अकोल्याचे ग्रामदैवत श्री राजराजेश्वर महात्म्यावर आधारित अकोलसिंग राजा आणि श्री राज राजेश्वर महात्मे इतिहास चित्रांच्या माध्यमातून साकारला.. चित्रातून साकारलेल्या कलाकृतीमुळे श्री राजराजेश्वर मंदिर इतिहासाला चित्रकलेचे कोंदण लाभले.. श्री राज राजेश्वर मंदिराचा इतिहास मांडणारी ही चित्रे पुढील पिढीसाठी महत्त्वाचा […]Read More

खान्देश

हतनूर धरणाचे चौदा दरवाजे उघडले…

जळगाव, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. मध्यप्रदेश, विदर्भ आणि हतनूर पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली .यामुळे हतनूर धरणाचे 41 पैकी 14 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले आहेत तापी नदी पात्रात 60 हजार 777 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची उघडझाप ; पूर संथगतीने कमी

कोल्हापूर, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात पाऊस कमी झाला असला, तरी पुराचं पाणी एकदम संथगतीनं कमी होत आहे. कृष्णेसह पंचगंगा, वारणाआणि दूधगंगा नद्यांच्या पाणी पातळीत इंचाइंचानं घट होत आहे. त्यामुळे गेल्या चौदा दिवसांपासून शिरोळ तालुक्यातील पूर परिस्थिती कायम आहे. पुरामुळे शिरोळ तालुक्यात बारा हजारांहून अधिक पूरग्रस्त स्थलांतरीत झाले आहेत. चार हजारांहून अधिक जनावरांनादेखील […]Read More

Uncategorized

गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग; गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ…

नाशिक दि ४– जिल्ह्यात आतापर्यंत दमदार पावसाची प्रतीक्षा होती. मात्र कालपासून नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण ८० टक्के भरले आहे. यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून गोदावरी नदीला देखील पूर आला आहे. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाची पाणी पातळी वाढली आहे. […]Read More