Month: July 2024

राजकीय

ती वाघनखे शिवाजी महाराजांचीच

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लंडन येथील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहातून राज्य शासनाने मागवली वाघनखे ही छञपती शिवाजी महाराज यांचीच आहेत असे आज ठामपणें सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत एका निवेदनाद्वारे स्पष्ट केले. या निवेदनसोबत त्यांनी काही फोटो आणि वर्तमानपत्रांची कत्रणेही प्रसिद्धी मध्यामांसाठी उपलब्ध करून दिली आहेत ही वाघनखे लंडन […]Read More

ट्रेण्डिंग

दिल्लीचा शिवम मिश्रा CA फायनल परीक्षेत देशात प्रथम

नवी दिल्ली, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया (ICAI) नं मे २०२४ मध्ये घेतलेल्या सीए इंटरमीडिएट आणि फायनल परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. फायनलच्या परीक्षेत दिल्लीच्या शिवम मिश्रानं ५०० गुण मिळवून संपूर्ण भारतात अव्वल स्थान पटकावलं आहे. दिल्लीच्या वर्षा अरोरा हिनं ४८० गुणांसह दुसरा तर, मुंबईच्या किरण राजेंद्र सिंग […]Read More

महानगर

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी

मुंबई, दि.११ (एमएमसी) : केंद्र आणि राज्य सरकारच्या नो गँरेंटी कारभारामुळे राज्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. निसर्गाची अवकृपा आणि सरकारकडून होणारी फसवणूक यामुळे शेतकरी पिळवटून निघाला आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्येत वाढ होत आहे. देशातील एकूण आत्महत्येपैकी 30 टक्के आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत. हे भूषणावह नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर सरकारने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देऊन […]Read More

महानगर

पान विडीच्या दुकानावर महापालिकेकडून होत असलेली कारवाई त्वरीत थांबवावी

मुंबई दि.11(एम एमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई शहरात अधिकृत व परंपरागत व्यवसाय असलेल्या पान विडीच्या दुकानात पोलीस प्रशासन व महापालिकेकडून होत असलेली अन्यायकारक कारवाई त्वरीत थांबवावी अन्यथा प्रखर आंदोलन करण्यात येईल असा इशारा मुंबई विडी तंबाखू व्यापारी संघाने आज दिला आहे. मुंबई मराठी पत्रकार संघ येथे याबाबत प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. मुंबई शहर व उपनगरात […]Read More

महानगर

राज्यात क्षयरोग निर्मूलनासाठी आता विशेष लसीकरण मोहीम

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील क्षयरोगाचे निर्मूलन करून २०२५ वर्षात क्षयमुक्त भारत करण्याच्या प्रयत्नात १८ वर्षांवरील सर्व व्यक्तींना क्षयरोगाची लस देण्याची मोहीम राबविण्यात येईल अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्री तानाजी सावंत यांनी विधानसभेत दिली. याबाबतचा प्रश्न विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला होता, त्यावर पृथ्वीराज चव्हाण, रोहित पवार, मनिषा चौधरी, राजेश टोपे […]Read More

महानगर

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रिपब्लिकन सायबर पँथर्स सज्ज

मुंबई, दि.11(एम एमसी न्यूज नेटवर्क): रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रिपब्लिकन सायबर पँथर्स सज्ज असून प्रस्थापित पक्षांच्या आयटी सेल इतकीच भरीव कामगिरी करतील असा विश्वास व्यक्त केला. त्याचबरोबर रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी नव्या दमाने विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागावे असं आवाहनही आठवले यांनी केले. मुंबई मराठी पत्रकार संघात मंगळवारी […]Read More

क्रीडा

राष्ट्रपतीं भवनमध्ये द्रौपदी मुर्मु सायना नेहवालसोबत खेळल्या बॅडमिंटन

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बॅडमिंटनपटू सायना नेहवालसोबत राष्ट्रपती भवनात बॅडमिंटन खेळण्याचा आनंद लुटला. द्रौपदी मुर्मू आणि सायना नेहवाल यांच्यातील बॅडमिंटन सामन्याचा व्हिडिओ समोर आला आहे. यात राष्ट्रपतींच्या खेळाची चांगलीच चर्चा होते आहे. Draupadi Murmu played badminton with Saina Nehwal at Rashtrapati Bhavan ML/ML/PGB11 July 2024Read More

महानगर

वरळी हिट ॲण्ड रन प्रकरण, मिहीर शहाची नशेत कार चालवण्याची

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वरळी हिट ॲण्ड रन प्रकरण सध्या चर्चेत आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी मिहीर शहाने अपघाताच्या वेळी स्वत: कार चालवत असल्याची कबुली बुधवारी पोलिसांना दिली आहे. तसेच सुरुवातीला दारूच्या नशेत गाडी चालवल्याला नकार दिलेल्या मिहीरने पोलिसांनी पुरावे समोर ठेवताच हो नशेत होतो, अशी कबुली दिली आहे. मुंबई […]Read More

ट्रेण्डिंग

जागतिक लोकसंख्या दिन : लोकसंख्या वाढ नियंत्रण कायद्याची गरज.

मुंबई, दि. 11 (राधिका अघोर) :आज जागतिक लोकसंख्या दिन आहे. याच दिवशी म्हणजे 11 जुलै 1987 साली, जगाच्या लोकसंख्येनं पाच अब्जांचा टप्पा ओलांडला होता. त्यामुळे जागतिक कीर्तीचे लोकसंख्या तज्ज्ञ डॉ के. सी. झकारिया यांनी हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून पाळला जावा, असा प्रस्ताव मांडला आणि संयुक्त राष्ट्रांकडून तो मंजूर ही करण्यात आला. त्यामुळे आजचा […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

राज्यात पहिल्यांदाच टिश्यू कल्चर ब्रिडर सिड्सपासून ऊस निर्मिती

कोल्हापूर, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोईम्बतूर येथील भारतीय कृषी अनुसंधान केंद्र ऊस संशोधन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच टिश्यू कल्चर ब्रिडर सीडसपासून तयार केलेल्या ऊस रोपांची निर्मिती करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरदवाड (ता. शिरोळ) येथे कृषिभूषण फौडेशन ऊस रोपवाटिकेत या प्रयोग यशस्वी करण्यात आला भारत सरकारच्या केंद्रीय कृषी मंत्रालय समिती आणि केंद्रीय […]Read More