Month: July 2024

पर्यटन

रायगडची रोपवे सेवा पुन्हा सुरु

महाड, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रायगड जिल्ह्यातील महाड येथील रायगड किल्ल्यावर रविवार ७ जुलै रोजी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून रायगडावर जाणाऱ्या पर्यटकांसाठी १० जुलै पर्यंत रोपवे बंद करण्यात आला होता, तर पायरीमार्ग २१ जुलै पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. हा रोपवे गुरुवार दिनांक ११ जुलै पासून सुरु करण्यात आला […]Read More

Lifestyle

वांगे आणि चीज

मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ:  ४५ मिनिटे लागणारे जिन्नस:  तीन मध्यम भरताची वांगी, (एक सेमीच्या चकत्या करुन ) ऑलिव्ह ऑईल, ३०० ग्रॅम मिझरेला चीज, त्यापेक्षा अर्धे पर्मेजां चीज, अर्धा कप पावाचा चुरा, बेसिल, मीठ आंइ ताजी मिरिपूड सॉससाठी : २ टेबलस्पून ऑलिव्ह ऑईल, एक मोठा कांदा बारिक चिरुन, दोन लसणीचा […]Read More

सांस्कृतिक

अकलूज येथे झाला तुकाराम महाराजांचा गोल रिंगण सोहळा

सोलापूर, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे मोठ्या उत्साहात स्वागत झाले. अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात मानाच्या अश्वाचे तिसरे रिंगण पार पडले. इंदापूर तालुक्यातील बेलवाडी येथे पहिले रिंगण पार पडले तर दुसरे रिंगण इंदापूर येथे पार पडले… https://youtu.be/bKjY7YZNHVY आज अकलूज येथे तिसरे […]Read More

देश विदेश

SC कडून केजरीवालांना अंतरिम जामिन मंजूर, मात्र तुरुंगातून सुटका नाही

नवी दिल्ली, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात तिहार जेलमध्ये अटकेत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने आज अंतरिम जामीन मंजूर केला आहे. यामुळे केजरीवाल यांना काहीसा दिलासा मिळाला असला तरीही त्यांची तुरुंगातून सुटका होणार नाही कारण केजरीवाल यांना हा अंतरिम जामीन ईडीने अटक केलेल्या प्रकरणात दिला आहे. […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

कोयना अभयारण्यात आढळला दुर्मिळ प्राणी

सातारा, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोयना वन्यजीव अभयारण्य हे विविध प्रकारच्या वनस्पती आणि प्राण्यांचे आश्रयस्थान आहे. वर्षानुवर्षे येथे वनस्पती आणि प्राण्यांच्या असंख्य दुर्मिळ प्रजातींचे निरीक्षण करण्यात आले आहे. अलीकडे, दुर्मिळ घुबड आणि फुलपाखरांच्या शोधासाठी प्रसिद्ध असलेल्या डिस्कव्हर कोयना समूहाने अभयारण्यात दुर्मिळ तपकिरी पाम सिव्हेटचे निरीक्षण केले. तपकिरी पाम सिव्हेट्स, ज्याला जर्डनचे पाम सिव्हेट्स […]Read More

राजकीय

दिशा सालियन मृत्यू प्रकणात नीतेश राणेंची होणार चौकशी

मुबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची सोशल मिडिया मॅनेजर दिशा सलियनचा महाविकास आघाड़ी सरकार काळात मृत्यू झाला होता. हा मृत्यू संशयास्पद असल्यांचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी आता भाजपाचे आमदार नितेश राणे यांची होणार आहे, मुंबईपोलिस या प्रकरणी चौकशी करणार आहेत, दिशा सालियन हिची आत्महत्या नसून हत्या असल्याचा […]Read More

राजकीय

स्पर्धा परीक्षेतील पेपरफुटी वर आता तुरुंगवास आणि दंड ही

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : स्पर्धा परिक्षांमधील पेपरफुटीसह अन्य गैरप्रकारांना आळा घालणारं महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अनुचित मार्गाला प्रतिबंध विधेयक २०२४ आज विधानपरिषदेत मंजूर करण्यात आलं. परीक्षांमधील गैरप्रकारांमध्ये सहभाग आढळल्यास ३ ते ५ वर्षांच्या कारावासाची तसंच १० लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद या विधेयकात आहे . परीक्षा संचलित करणाऱ्या सेवा पुरवठादार कंपनीचा गैरप्रकारात सहभाग आढळल्यास […]Read More

Lifestyle

मक्याचं सूप

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : साहित्य१+१/२ वाटी कॉर्न कर्नल२-३ चमचे वाटाणे१/२ टीस्पून काळी मिरी पावडर१ चमचा मक्याचं पीठ1″ आले२-३ चमचे बारीक चिरलेली गाजरचवीनुसार मीठ 2-3 चमचे मटार आणि 2-3 चमचे मक्याचे दाणे, गाजर शिजवून घ्या आणि उरलेले मक्याचे दाणे मिक्सरमध्ये थोडे पाणी घालून गाळून घ्या.आता एका भांड्यात कॉर्न मिल्क आणि थोडे पाणी घालून […]Read More

पर्यटन

नक्की भेट द्यावी अशी, दापोली

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दापोली हे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील किनारपट्टीवरील हिल स्टेशन आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई ते दापोली हे अंतर 215 किमी आहे. दापोली समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. कॅम्प दापोली अशी दापोलीची वेगळी ओळख आहे. याचे मुख्य कारण म्हणजे दापोली येथे ब्रिटिशांनी तळ ठोकला म्हणून दापोलीला कॅम्प दापोली म्हणून ओळखले जाते. गावात अनेक […]Read More

ट्रेण्डिंग

ज्येष्ठांसोबत वेळ घालवण्यासाठी या राज्यात मिळणार विशेष सुट्टी

दिसपूर, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आई-वडील व सासू-सासऱ्यांसोबत वेळ घालवण्यासाठी, त्यांच्यासोबत फिरण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना विशेष सुट्टी देण्याचा निर्णय आसाम सरकारनं घेतला आहे. कौटुंबिक संबंध दृढ करण्याचा उद्देश यामागे आहे. आसाम सरकारनं दिलेली ही रजा दोन दिवसांची विशेष प्रासंगिक रजा असेल. ही रजा नोव्हेंबर महिन्यात मिळेल. मुख्यमंत्री हिंमता बिस्व सरमा यांच्या कार्यालयानं (CMO) गुरुवारी […]Read More