कोल्हापूर, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 4.21 टीएमसी पाणीसाठा आहे. राधानगरी धरणातून 1300 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड आणि रुकडी, ताम्रपर्णी नदीवरील- कुर्तनवाडी, चंदगड तसेच हल्लारवाडी, वेदगंगा नदीवरील- कुरणी, बस्तवडे तसेच चिखली, हिरण्यकेशी नदीवरील – साळगांव, दुधगंगा नदीवरील- दत्तवाड, कासारी नदीवरील- येवलूज, पुनाळ […]Read More
रत्नागिरी, दि १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोकण रेल्वे मार्गावर खेड दिवाणखवटी नातुवाडी बोगद्या नजिक माती आणि दगड रेल्वे रुळांवर आल्यामुळे मागील दीड तासांपासून येथील वाहतूक थांबवण्यात आली आहे. येथील वाहतूक पूर्ववत करण्यासाठी दोन ते तीन तासांचा कालावधी लागू शकतो. अशी माहिती कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी दिली आहे. मुंबई कडे जाणारी मांडवी […]Read More
मुंबई, दि. 14 (जितेश सावंत) : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बाजाराने नवा विक्रमी स्तर गाठला. शुक्रवारी आयटी शेअर्सच्या भक्कम जोरावर शेअर बाजारात तेजी दिसून आली. दिवसभरात बाजाराने विक्रमी उच्चांक गाठला. सेन्सेक्स 80900 च्या जवळ तर निफ्टी 24600 च्या जवळ पोहोचला. BSE सेन्सेक्सने 1.24 टक्क्यांनी वाढ घेऊन 80,893.51 चा विक्रमी उच्चांक गाठला, तर निफ्टीने 1.13 टक्क्यांनी वाढ […]Read More
सोलापूर, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज पंढरपूर तालुक्यात दाखल झाला. वेळापूर च्या पुढे ठाकूरबुवांच्या समाधी जवळ माऊलींचे गोल रिंगण झाले. त्या गोल रिंगणात टाळाचे आणि भजनाच्या निनादात सारेच वारकरी तल्लीन झाले होते. पंढरपूर जवळ येत असल्याने फुगड्या खेळत वारकऱ्यांनी टाळांच्या जयघोषणात आनंद व्यक्त केला. https://youtu.be/FEx3jFJ60eE आज ज्ञानेश्वर महाराजांचा […]Read More
रत्नागिरी, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सलग तिसऱ्या दिवशी रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्यात सर्वदूर कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. खेड येथील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर जिल्ह्यातील इतर नद्या देखील इशारा पातळीवर वाढत आहे. सर्वाच नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. धोक्याच्या पातळीवर वहात असलेल्या जगबुडी […]Read More
आषाढी एकादशीची वारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. लक्षावधी वारकरी शेकडो मैल चालत पंढरीच्या वेशीवर दाखल झाले आहेत. ज्ञानोबा- तुकारामाच्या गजरात पंढरपूरचा आसमंत भरून गेला आहे. महाराष्ट्राचे धार्मिक आणि अध्यात्मिक संचित समृद्ध करणाऱ्या संत कवींनी विपुल काव्य निर्मिती करून आपल्या मायबोली मराठीचे दालनही समृद्ध केले आहे. सर्वसामान्यांना अगदी सोप्या शब्दांमध्ये जीवनरहस्य सांगणाऱ्या सर्वसमावेशक अशा संतसाहित्याने […]Read More
मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर आज प्रथमच मुंबई दौऱ्यावर आले होते. मुंबईतील विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी मुंबईला जागतिक स्तरावर थिंक टँक बनवण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही ते म्हणाले. राजधानी मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव-मुलुंड जोड […]Read More
मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई उच्च न्यायालयाने आज पुढील शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या मुलाची पाठवणी करण्याकरीता खुनाच्या आरोपांतील दोषसिद्ध आरोपीला १० दिवसांचा पॅरोल मंजूर केला.दोषसिद्ध आरोपीला वैद्यकीय कारणास्तव किंवा आकस्मिक परिस्थितीत कुटुबीयांच्या दुःखात सहभागी होता यावे यासाठी पॅरोल मंजूर केला जाऊ शकतो. तर आनंदाचा क्षण द्विगुणित करण्यासाठी पॅरोल का मंजूर केला जाऊ नाही […]Read More
मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘कल्की : २८९८ एडी’ ( Kalki: 2898AD ) चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे. या चित्रपटाने जागतिक स्तरावर १ हजार कोटी कमाईचा टप्पा पार करत विशेष कामगिरी केली आहे. प्रदर्शित झाल्याच्या १६ व्या दिवशीदेखील या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरचा आपला दबदबा कायम ठेवला आहे. महत्त्वाचे म्हणजे भारताच्या […]Read More
नवी दिल्ली, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जम्मू-काश्मिर राज्यासाठी असलेलं राज्यघटनेतील ३७० कलम काढून टाकण्यात आल्यानंतर मोदी सरकार तेथील प्रशासकीय रचनेतही मोठे बदल करत आहे. केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत जम्मू-काश्मीरच्या नायब राज्यपालांच्या अधिकारात वाढ केली आहे. त्यानुसार आता जम्मू-काश्मीरच्या नायब राज्यपालांना पोलीस आणि प्रशासकीय सेवेसंदर्भातील काही अधिकार प्राप्त झाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे जम्मू-काश्मीरमध्ये […]Read More