चंद्रपूर, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पाच दिवसांच्या विश्रांती नंतर चंद्रपूर जिल्हाला पुन्हा मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे, ओसरलेल्या पुराने पुन्हा धडक दिली त्यामुळे जिल्ह्यातील काही मार्ग बंद करण्यात आले आहेत. पुरामुळे बंद असलेले मार्ग.. चंद्रपूर-मूल-गड़चिरोली मार्ग बंद, अंधारी नदीला अजयपूर जवळ पूर गडचांदूर ते चंद्रपूर मार्गावरील भोयेगाव- धानोरा पुलावर पाणी आले असल्यामुळे वाहतूक […]Read More
ठाणे, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या शहापूर तालुक्यातील तानसा धरण 24 जुलै रोजी संध्याकाळी 4.15 मिनिटांनी तर मोडकसागर धरण काल रात्री ओव्हरफ्लो होऊन वाहू लागल्याने मुंबई करांचे पाण्याचे टेन्शन दूर झाले आहे. मोडकसागर धरण काल रात्री 10.52 वाजता दुथडी भरून वाहू लागल्याने त्याचे दोन स्वयंचलित दरवाजे उघडले असून, 6 हजार क्यूसेसने […]Read More
बीड, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात तीन दिवसापासून पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे हलक्या जमिनीवरील पिके जोमात आली असून काळ्या जमिनीवरील सोयाबीन पिवळी पडत आहेत. जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अंबाजोगाई येथील काळवटी तलाव ओव्हर फ्लो झाला आहे. तर बीड ,लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या काही गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या धनेगाव धरण आणखी ही मोठया […]Read More
कोल्हापूर, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. राधानगरी धरण 100 टक्के भरले असून आज सकाळी 10.05 वाजता धरणाचा 6 क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा उघडला आहे. पावसाचा जोर राहिला तर धरणाचे अन्य स्वयंचलित दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्याची शक्यता आहे.त्यामुळे धरणातून 2928 क्युसेक्स इतका विसर्ग […]Read More
गडचिरोली, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सलग चार दिवसांपासून सुरू असलेली पावसाची रिपरिप बुधवारी थांबेल असा अंदाज खोटा ठरवत पावसाने पाचव्याही दिवशी पुन्हा जोरदार एन्ट्री केली. बुधवारी गडचिरोली शहरात दुपारी सुरू झालेला जोरदार पाऊस सायंकाळपर्यंत बरसत होता. त्यानंतरही रिमझिम वर्षाव सुरूच होता. त्यामुळे आधीच गोसीखुर्दच्या पाण्याने निर्माण झालेल्या पुरात भर पडली. एवढेच नाही तर […]Read More
अलिबाग, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील कोलाड परिसरातील रात्री जोरदार पावसाने थैमान घातल्याने कुंडलीका नदीने तसेच महिसदरा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळें अचानक गोवे गावात तर आंबेवाडी समर्थ नगर संभे येथील गौरी नगर मध्ये घराघरात शिरले. उडदवणे मार्गावर पाणी आले असून पालदाड पुल वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. धाटाव […]Read More
मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र विधानपरिषद शतक महोत्सवानिमित्त भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि त्याच्या हस्ते सोमवार, दिनांक २९ जुलै, २०२४ रोजी “वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्व” या ग्रंथाचे प्रकाशन मध्यवर्ती सभागृह, विधान भवन, मुंबई येथे करण्यात येणार आहे. दुपारी ३.३० ते ५.०० यावेळेत हा समारंभ आयोजित करण्यात आला असून […]Read More
मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील पहिले हळद संशोधन केंद्र वसमत येथे होत आहे देश आणि जागतिक पातळीवरून हळदीला असलेली मागणी लक्षात घेऊन राज्यातील शेतकऱ्यांना हळद लागवडीसाठी प्रोत्साहीत करून त्याचे क्लस्टर करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मराठवाडा, विदर्भ सारख्या दुष्काळग्रस्त भागात हळदीच्या उत्पादनाने सुवर्णक्रांती होईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त […]Read More
नवी दिल्ली, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काल सादर झालेल्या अर्थसंकल्पानंतर सीमाशुल्कात मोठी कपात करण्यात आल्यामुळे देशभरातील बाजारपेठांमध्ये सोन्याचे भाव गडगडले आहेत. त्यानंतर आता केंद्र सरकारकडून लवकरच सोन्याचा देश देशभरात एकच रहावा यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. ‘वन नेशन, वन रेट’ पॉलिसी लागू झाल्यानंतर विविध शहरांतील ज्वेलर्सच्या मनमानी कारभाराला चाप बसणार […]Read More
नवी दिल्ली, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल मोदी सरकार 3.0 चा पहिला अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये विविध सामाजिक घटकांसाठी तसेच कृषी, उद्योग आणि रोजगारासाठी विशेष तरतूदी जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र अर्थसंकल्पीय भाषणात रेल्वेबाबत कोणतीही मोठी घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र रेल्वेला 2,62,200 कोटी रुपयांचा विक्रमी भांडवली खर्च (capex) […]Read More