Month: December 2023

ऍग्रो

लाल कांद्याला मिळाला विक्रमी भाव

बीड, दि. ३(एमएमसी न्यूज नेटवर्क): जिल्ह्यातील  कडा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये  कांद्याच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात भाव वाढ दिसली असून कांद्याच्या भावाने अर्धशतकी मजल मारली आहे. प्रतिक्विंटल कांद्याला पाच हजारापर्यंचा भाव मिळाला आहे. या हंगामातील ग्रामीण भागातील बाजार समितीत मिळालेला हा विक्रमी भाव आहे. मराठवाड्यातील सर्वात मोठी कांदा बाजार समिती म्हणून कडा  कृषी उत्पन्न बाजार समिती […]Read More

ट्रेण्डिंग

कासवाने साजरा केला १९१ वा वाढदिवस

सेंट हेलेना, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कासव हा पृथ्वीवरील सर्वांत जास्त जगणारा प्राणी म्हणून ओळखला जातो. अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण जीवनशैली असलेल्या कासवांबाबत सर्वांनाच कुतुहल असते. जोनाथन असे नाव असणाऱ्या कासवाने, सेंट हेलेना नावाच्या बेटावर [island of St. Helena] आपला १९१ वा वाढदिवस साजरा केल्याचे गिनीज बुकच्या एका व्हिडीओमधून आपल्याला समजते. परंतु, त्यांच्याच एका विधानामध्ये […]Read More

देश विदेश

२० लाख रूपयांची लाच घेताना ईडी अधिकाऱ्याला अटक

चेन्नई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशभर ईडीच्या धाडींची दहशत असताना आता कुंपणानेच शेत खाल्ल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. राजस्थानमध्ये ईडीच्या अधिकाऱ्याने लाच घेतल्याची घटना ताजी असतानाच आता तमिळनाडूमधुनही एका ईडीमध्ये कार्यरत अधिकाऱ्याला लाच घेतल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. तामिळनाडूच्या लाचलुचपत प्रतिबंधक आणि दक्षता पथकाने (DVAC)) शुक्रवारी ईडी (अंमलबजावणी संचालनालय) अधिकाऱ्याला लाच घेताना […]Read More

देश विदेश

मराठा आणि धनगर आरक्षण प्रकरणी केंद्र सरकारने सहकार्य करावे

नवी दिल्ली, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्य सरकारला सर्वतोपरी सहकार्य करावे, अशी मागणी सर्वपक्षीय बैठकीत शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल शेवाळे यांनी केली. संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक बोलावली होती. या बैठकीला […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

राज्यातील दुष्काळ निवारण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा

पुणे, दि.२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दुष्काळाच्या प्रश्नावर कार्यशाळा आयोजित करावी लागणे हे नक्कीच खेदजनक आहे. यावर्षी तालुका स्तरावर तसेच मंडळ स्तरावर दुष्काळ जाहीर करण्याची परिस्थिती ओढवली आहे. कोविड काळात सरकारसह सामाजिक संस्थांनी खूप चांगली कामगिरी केली. आज ज्या भागात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याभागात सामाजिक संस्थांनी दुष्काळ निवारण्यासाठी पुढाकार घ्यावा. शासनाच्या रोजगार हमी […]Read More

ट्रेण्डिंग

नमो महारोजगार मेळाव्यातून 10 हजार नोकऱ्या, जाणून घ्या तपशिल

नागपूर, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी आहे. नमो महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून 10 हजारहून अधिक पदे भरली जाणार आहेत. कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्यावतीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी https://www.mahaswayam.gov.in/index_inner या अधिकृत वेबसाइटवर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून पदासाठी लागणारी एकूण रिक्त जागा, शैक्षणिक अर्हता, […]Read More

देश विदेश

“वंदे भारत’ एक्सप्रेस खरेदी करण्यासाठी जगभरातील देश उत्सुक

मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशभर सुरु झालेल्या ३४ वंदे भारत एक्सप्रेसनी देशवासियांना सुखद आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव दिला आहे. अल्पावधितच लोकप्रिय ठरलेल्या या एक्सप्रेसच्या जलग प्रवासामुळे अनेक विमान प्रवासी वंदे भारतकडे वळाले आहेत. स्लीपर वंदे भारतचे काम पण अंतिम टप्प्यात आले आहे. देशात पण अनेक राज्यांनी या ट्रेनची संख्या वाढविण्यावर आणि अंतरराज्यीय […]Read More

अर्थ

GST संकलनात १५% वाढ

नवी दिल्ली, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : GST मुळे भारतीय अर्थव्यवस्थेला चांगलीच उभारी प्राप्त होत आहे. नोव्हेंबर 2023 हा महिना GST संकलनासाठी उत्तम महिना ठरला आहे. सलग नवव्या महिन्यात मासिक जीएसटी संकलन 1.5 लाख कोटी रुपयांच्या वर पोहोचलेवित्त मंत्रालयाने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, नोव्हेंबरमध्ये जीएसटी संकलन 1.68 लाख कोटी रुपये राहिले आहे. हा आकडा […]Read More

राजकीय

जितेंद्र आव्हाड यांना आनंद परांजपे यांनी दिले हे आव्हान

ठाणे, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सूरज परमार आत्महत्या प्रकरणी कोणाच्या दरवाजावर डोके टेकवायला जात होतात ? अनंत करमुसे यांना पोलीस संरक्षणात मारहाण करण्याचा बालिशपणा का केलात ? वैभव कदम च्या आत्महत्येस जबाबदार कोण?…डॉ. जितेंद्र आव्हाड साहेब या तीन प्रश्नांची उत्तरे द्या, असे जाहीर आव्हान राष्ट्र्वादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी आज […]Read More

महानगर

आता घनकचऱ्यावर प्रक्रिया होणार कचऱ्याच्या गाडीतच

ठाणे, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई , ठाणे यासारख्या मोठ्या महानगरातील कचऱ्याच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी आजवर अनेक प्रयत्न झाले मात्र समस्या जागेवरच आहे. मोठ्या रहिवासी संकुलानी त्यांचा ओला कचरा त्यांच्याच जागेत प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावावी असा सरकारचा प्रयत्न आहे. मात्र अनेक संकुलामध्ये जागाच मिळत नाही अथवा हे काम करणार कोण असा प्रश्न […]Read More