Month: September 2023

राजकीय

शंकाकुशंका घेऊ नका, कुणबी प्रमाणपत्र घेणारच

जालना, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मराठा आरक्षणासाठी 45 बलिदान दिले आता एकही बलिदान देऊ देणार नाही आणि मराठा आरक्षणासाठीची ही संधी दवडायची नाही असे आज मनोज जरांगे पाटलांनी म्हटले आहे.आजपासून जरांगे पाटलांनी 13 दिवसांचा महाराष्ट्राचा दौरा सुरू केला .या दौऱ्यात त्यांनी सर्वात आधी अंबड मधील मराठा बांधवांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते. Don’t […]Read More

अर्थ

सलग 10 व्या आठवड्यात FII ची विक्री सुरूच

मुंबई, दि. 30 (जितेश सावंत):  29 सप्टेंबर रोजी संपलेल्या अत्यंत अस्थिर सप्ताहात भारतीय निर्देशांक थोड्या फरकाने बंद झाले. F&O एक्सपायरी, डॉलर,मधील वाढ , US रोखे उत्पन्नातील (बॉन्ड यील्ड) वाढ आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, नजिकच्या काळात यूएस मध्यवर्ती बँकांचे दरात कपात न करण्याचे संकेत तसेच एफआयआयच्या सततच्या विक्रीमुळेही बाजार दबावाखाली राहिला.परंतु आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी […]Read More

खान्देश

दारणा नदीवरील पुलाला भगदाड; नागरिकांचा जीव मुठीत धरून प्रवास…

नाशिक, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : घोटी सिन्नर राज्य मार्गावरील देवळे गावाजवळील दारणा नदीवरील पुलाला भलं मोठं भगदाड पडले आहे. या मार्गावरून दररोज शेकडो वाहने समृद्धी महामार्ग तसेच सिन्नर आणि भंडारदरा , एसएमबीटी रुग्णालय आणि शिर्डीकडे ये-जा करत असतात. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे पद्धतशीर पणे डोळेझाक करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. दरवर्षी […]Read More

क्रीडा

Asian Games – आजपर्यंत भारताच्या खात्यात ८ सुवर्ण, १२ रौप्य

हांगझोऊ, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चीनमधील हांगझोऊ येथे आज भारतीय नेमबाजांनी आजही चमकदार कामगिरी सुरूच ठेवली.नेमबाजांनी आज 2 सुवर्ण आणि 2 रौप्यपदक जिंकले. टेनिसमध्ये रामकुमार रामनाथन आणि साकेथ मायनेनी यांनी पुरुष दुहेरीत रौप्यपदक जिंकले.यासह भारताने 30 पदके जिंकली आहेत. ज्यामध्ये 8 सुवर्ण, 11 रौप्य आणि 11 कांस्यपदकांचा समावेश आहे. भारत पदकतालिकेत चौथ्या स्थानावर […]Read More

ट्रेण्डिंग

‘गणपत’ चित्रपटाचा टिझर रिलिज

मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या बहुचर्चीत ‘गणपत’ चित्रपटाचा टीझर अखेर रिलीज झाला आहे. या चित्रपटातील टायगरच्या लूकची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. टायगरसोबत बिग बी अमिताब आणि क्रिती सेनन यांच्या अॅक्शन रोलची चाहत्यांना जेवढी उत्सुकता होती, त्याही पेक्षा जास्त उत्सुकता आता हे ट्रेलर पाहिल्यानंतर वाढणार आहे. जबरदस्त अॅक्शनचा भंडार […]Read More

Uncategorized

मनेका गांधींना या कारणामुळे १०० कोटींची मानहानी नोटीस

नवी दिल्ली, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इस्कॉन (ISKCON) या धार्मिक संस्थेच्या कारभाराबाबत वादग्रस्त आरोप करणे भाजप खासदार मनेका गांधी यांना आता चांगलेच भोवले आहे. यावरुन इस्कॉनने गांधींविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. संस्थेकडून मनेका गांधी यांना १०० कोटींची मानहानीची नोटीस पाठवण्यात आली आहे.इस्कॉनकडून याप्रकरणी कायदेशीर खटला चालवला जाईल आणि तो शेवटपर्यंत लढला जाईल, असं […]Read More

देश विदेश

भारतीय लष्कर खरेदी करणार 400 हॉवित्झर तोफा

नवी दिल्ली, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय लष्कराने 400 हॉवित्झर तोफांच्या खरेदीचा प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाला पाठवला आहे. या तोफा संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या आहेत. ही तोफ जुन्या तोफांपेक्षा खूपच हलकी आहे.या तोफातून डागलेल्या शेलची रेंज 48 किलोमीटर आहे, तर बोफोर्स तोफ 32 किलोमीटर अंतरापर्यंत गोळीबार करू शकते. हे […]Read More

महिला

महिला आरक्षणावर उमटली मोहर! राष्ट्रपतींनी दिली मंजुरी

मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  महिला आरक्षण बिलावर आज शेवटची मोहर उमटली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महिला आरक्षण बिलावर स्वाक्षरी केली. त्यामुळे देशात नारी शक्ती वंदन अधिनियम अस्तित्वात आला. दहा दिवसांपूर्वी 20 सप्टेंबर रोजी लोकसभा आणि 21 सप्टेंबर रोजी राज्यसभेत या कायद्याला मंजुरी देण्यात आली होती. हा कायद्या बहुमताने मंजूर झाला होता. केंद्र सरकारने […]Read More

ऍग्रो

पंजाबमध्ये शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी केले ‘रेल रोको’

चंदीगड, २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंजाबमध्ये शेतकरी केंद्र सरकारविरुद्ध आक्रमक झाले आहेत. नुकसान भरपाई, एमएसपी आणि कर्जमाफीबाबत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू केले आहे. संपूर्ण पंजाबमध्ये शेतकरी रेल्वे रुळांवर बसले आहेत. ठिकठिकाणी रेल्वे ट्रॅक ठप्प झाल्याने दिल्ली ते अमृतसर,पठाणकोट ते अमृतसर आणि पंजाब ते चंदिगड, जालंधर, लुधियाना ते मोगा, फिरोजपूर, फाजिल्का आदी सर्व मार्ग पूर्णपणे ठप्प […]Read More

पर्यावरण

एस. आर. दळवी फाउंडेशनतर्फे 2 ऑक्टोबरला स्वच्छता मोहीम

मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  एस.आर. राज्यस्तरावर दळवी फाऊंडेशन ही पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी सांभाळते. 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त, फाउंडेशनने समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम आयोजित केली आहे. वायंगणी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने हा उपक्रम दुपारी २ वाजता सुरू होईल. फाउंडेशनचे संस्थापक रामचंद्र दळवी आणि सीता दळवी, जे मूळचे विलवडे गावचे आहेत, त्यांनी एक व्यापक राज्यस्तरीय […]Read More