Month: July 2023

महानगर

मोदी-शहा यांच्या स्क्रिप्टनुसार महाराष्ट्रात राजकीय फोडाफोडी

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  महाराष्ट्रात एक असंवैधानिक सरकार सत्तेवर असून अपात्रतेच्या मुद्द्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात पुन्हा फोडाफोडीचे राजकारण करण्यात आले आहे. भारतीय जनता पक्षाच्या ऑपरेशन कमळचा हा प्रकार जनतेला आवडलेला नाही. कर्नाटकच्या जनतेने भाजपाला घरी बसवले आहे. महाराष्ट्रात आधी उद्धव ठाकरे यांना आणि आता शरद पवार यांना काही आमदार […]Read More

बिझनेस

मत्स्यबीज, कोळंबीबीज संवर्धन केंद्रांच्या भाडेपट्टी कालावधीत वाढ

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राज्यातील मत्स्यबीज, कोळंबीबीज उत्पादन आणि संवर्धन केंद्र यांच्या भाडेपट्टी कालावधीत वाढ करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या निर्णयानुसार विभागाकडील ७ केंद्रे वगळता भाडेपट्ट्याने देण्यात आलेली तसेच नव्याने भाड्याने देण्यात येणारी मत्स्यबीज, कोळंबीबीज केंद्रांचा भाडेपट्टा कालावधी आता १५ ऐवजी २५ वर्षे […]Read More

राजकीय

फोटो बाबत शरद पवारांनी दिला सज्जड दम

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ज्यांनी माझ्या विचारांशी द्रोह केला. ज्यांच्याशी माझा आता वैचारिक मतभेद आहे त्यांनी माझा फोटो कुठेही वापरू नये असा सज्जड दं शरद पवार यांनी फुटीर गटाला दिला आहे. माझ्या जिवंतपणी माझा फोटो कुणी वापरावा हा माझा अधिकार आहे त्यामुळे ही बाब आपण स्पष्ट केली असल्याचे त्यांनी सांगितले.Regarding the photo, Sharad Pawarani […]Read More

खान्देश

धुळे – पळासनेर येथील अपघाताबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून शोक

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  धुळे जिल्ह्यातील पळासनेर येथे मुंबई- आग्रा महामार्गावर झालेल्या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. या अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबिंयाप्रति सहवेदना प्रकट करुन या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केली आहे. या अपघाताची माहिती […]Read More

खान्देश

बस थांब्यावर कंटेनर आदळून नऊ जणांचा मृत्यू

धुळे, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राजस्थान वरून मार्बल घेऊन येत असलेला कंटेनर पळासनेर तालुका शिरपूर जिल्हा धुळे येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवर अनियंत्रित झाल्याने पळासनेर जवळील बस थांब्याजवळ उभ्या असलेल्या वाहनांना धडकला यात आतापर्यंत नऊ जण मृत्युमुखी पडले असून जवळपास 25 जण जखमी आहेत. यातील गंभीर जखमींना शिरपूर व धुळे येथील शासकीय रुग्णालयात […]Read More

मराठवाडा

वेरूळ घाटात एसटी बस घसरली, 24 प्रवासी बचावले

छ. संभाजीनगर, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला असून छत्रपती संभाजी नगर ते नंदुरबार अशी प्रवाशांना घेऊन जाणारी एसटी बस अचानक मुख्य रस्ता सोडून घसरली. या बसमधून 20 ते 24 प्रवासी प्रवास करीत होते. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही. बसमधील प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या असून सर्व प्रवासी सुखरूप […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांच्या पादुकांनी घेतले विठ्ठल दर्शन….

सोलापूर, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  आज गुरु पौर्णिमेनिमित्त संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराजांच्या पादुकांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले. दोन्ही संतांच्या पादुका मंदिरात आणल्या गेल्या यावेळी मंदिरे समितीच्या वतीने पादुकांचे विधिवत पूजन झाले. यानंतर मंदिरात संतांच्या पादुकांनी विठ्ठलाच्या पादुकांचे दर्शन घेतले. एक प्रकारे आत्म्याची परमात्म्याची असणारी भेट अत्यंत भक्तीपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या सोहळ्यानंतर […]Read More

बिझनेस

अनिल अंबानी यांची ईडीकडून चौकशी

मुंबई,दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रिलायन्स एडीए समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी सोमवारी अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) हजर झाले आणि त्यांनी परकीय चलन कायद्याच्या कथित उल्लंघनाशी संबंधित तपासासंदर्भात त्यांचे म्हणणे नोंदवले, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट अॅक्ट (फेमा) च्या विविध कलमांतर्गत दाखल करण्यात आलेल्या नव्या खटल्याचा भाग म्हणून अंबानी यांचे वक्तव्य नोंदवण्यात आले आहे. येस […]Read More

महानगर

सिंचन घोटाळ्याच्या फायली अरबी समुद्रात बुडविणार

मुंबई दि.3( एम एमसी न्यूज नेटवर्क):सिंचन घोटाळा संदर्भात सबळ पुरावे तत्कालीन मुख्यमंत्री आणि विध्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देऊ नही काहीच उपयोग न झाल्याने माझ्याकडे असलेले सिंचन घोटाळ्यातीळ कपाटभर कागदपत्रे अरबी समुद्रात बुडवणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या अंजलिया दमानिया यांनी पत्रकार परिषदेत दिली. महाराष्ट्र राज्यात नेमकं चाललय तरी काय? ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप होते.ज्यांची ईडी, सीबीआय […]Read More

Uncategorized

१ कापडी पिशवी आपले जगणे सोपे करते

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर आपण वारंवार करतो. या डिस्पोजेबल प्लास्टिक पिशव्यांचे विघटन होण्यास शेकडो वर्षे लागतात. यामुळे परिसंस्थेचे दीर्घकालीन नुकसान होते. मानवाने टाकून दिलेले सुमारे 8 दशलक्ष टन प्लास्टिक दरवर्षी समुद्रात जाते. या दराने 2050 पर्यंत समुद्रात माशांपेक्षा जास्त प्लास्टिक असेल. ९० टक्के समुद्री पक्षी त्यांच्या पोटात प्लास्टिकचा कचरा वाहून […]Read More