Month: July 2023

राजकीय

महाराष्ट्रात तातडीने राष्ट्रपती राजवट लागू करा

मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील राजकीय वातावरण गढूळ झाले असून भाजपाच्या सत्तापिपासू वृत्तीने राज्यात शासन आणि प्रशासनही ठप्प आहे. जनतेला वाऱ्यावर सोडून देऊन मलाईदार खात्यासाठी साठमारी सुरु आहे. राज्यात अलिबाबा ४० चोरांसारखी परिस्थिती असून जनतेची तिजोरी लुटली जात आहे. राज्यपाल आणि राष्ट्रपती यांनी यात हस्तक्षेप करुन राज्यात तातडीने राष्ट्रपती राजवट लागू करावी, […]Read More

महानगर

पक्षांतर्गत नाराजी दूर करण्यासाठी भाजपचे शिबिर

ठाणे, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादी ऑपरेशन मुळे भाजपतील अनेकांच्या मंत्रिपदाच्या इच्छेला सुरुंग लागला आहे, त्यामुळे केवळ शिंदे गटातच नाही तर भाजपा आमदारांमध्ये ही मोठी नाराजी आहे, ती अद्याप जाहीर व्यक्त झालेली नसली तरी ती दूर करण्यासाठी आज पक्षाने प्रयत्न केले आहेत. ठाणे जिल्ह्यात भिवंडी इथे एक राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिर […]Read More

पर्यटन

भारताचा छोटा ल्हासा

धर्मशाला, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  निर्वासित तिबेटी भिक्षू दलाई लामा यांचे पवित्र निवासस्थान म्हणून ओळखले जाणारे, धर्मशाला ‘भारताचा छोटा ल्हासा’ म्हणून उद्धृत केले जाते. हे बर्फाच्छादित पर्वत, घनदाट देवदार आणि देवदार जंगले आणि भव्य दऱ्यांनी तुम्हाला मंत्रमुग्ध करेल. तिबेटी बौद्ध संस्कृतीचे अन्वेषण करा आणि शहराच्या शांत वातावरणात आराम करा. आल्हाददायक आणि सौम्य हवामानामुळे ते […]Read More

देश विदेश

कोळसा घोटाळा प्रकरणी दर्डा पिता-पुत्र दोषी

नवी दिल्ली, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : छत्तीसगडमधील कोळसा खाण वाटप घोटाळ्याप्रकरणी राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा यांच्यासह माजी कोळसा सचिव एच सी गुप्ता, के एस क्रोफा, के सी सामरिया हे दोन प्रशासकीय अधिकारी,जेएलडी यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक मनोज कुमार जैस्वाल यांना दोषी ठरवलं आहे. दिल्लीतील विशेष कोर्टाने आज […]Read More

ऍग्रो

टोमॅटो दर नियंत्रणासाठी केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली, दि. १२ (एमएमसी न्युज नेटवर्क) : टोमॅटोंच्या प्रचंड वाढत्या दरामुळे गेल्या काही दिवसात देशभर सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाला आहे. मॅकडोनाल्ड सारख्या बड्या कंपनीनेही आपल्या खाद्यपदार्थांतून टोमॅटो हदद्पार करत हात टेकले आहेत. तिथे सर्वसामान्य माणसांनी काय करावं, तरी काय अशी स्थिती आहे. यानंतर आता केंद्र सरकारने टोमॅटोचे दर नियंत्रणात आणण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. […]Read More

देश विदेश

माणूस चावल्याने कुत्रा हॉस्पीटलमध्ये दाखल

वॉशिंग्टन, दि. १२ (एमएमसी न्युज नेटवर्क) : माणसाला कुत्रा चावल्याची बातमी तुम्ही वाचली असेल, पण कुत्र्याला माणूस चावल्याचे कधी वाचले आहे का? खरोखरच अशी एक घटना अमेरिकेत घडली आहे. पोलीसांपासून आणि दंडापासून सुटका मिळवण्यासाठी एका व्यक्तीने चक्क पोलीसांच्या कुत्र्याला चावा घेतला आहे. तेही एकदा नव्हे तर खूप वेळा. यामुळे कुत्र्याला हॉस्पीटलमध्ये दाखल करावे लागले आहे. […]Read More

अर्थ

GST Council मिटींग नंतर आता हे होणार स्वस्त

नवी दिल्ली, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथे नुकत्याच पार पडलेल्या जीएसटी काऊन्सिलच्या ५० व्या बैठकीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अनेक वस्तू आणि सेवांवरील जीएसटी कमी करण्याचा किंवा त्यांना जीएसटीमधून सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ऑनलाइन गेमिंगसह अनेक वस्तूंवर जीएसटी लावण्याचा किंवा वाढवण्याचा निर्णय परिषदेने घेतला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत […]Read More

विज्ञान

AI मध्ये हजारो कोटींची गुंतवणूक करणार ही भारतीय कंपनी

मुंबई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : AI हा सध्या जगभरातील परवलीचा शब्द झाला आहे. भविष्यातील याची आवश्यकता हेरुन मोठ्या कंपन्या आता यामध्ये अधिक संशोधनासाठी प्रचंड गुंतवणूक करण्यास सज्ज झाल्या आहेत. IT क्षेत्रातील आघाडीची भारतीय कंपनी Wipro आता कृत्रिम बुद्धीमत्ता क्षेत्रात हजारो कोटींची गुंतवणूक करण्यास पुढाकार घेत आहे.पुढील 3 वर्षांत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मध्ये $1 […]Read More

राजकीय

खातेवाटप रखडलेलेच , चेंडू अखेर दिल्लीच्या कोर्टात दाखल

मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): दोन तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होऊनही अद्याप दहा दिवस उलटूनही नव्या मंत्र्यांना खातेवाटप झालेले नाही, शिंदे गटाने विरोध केल्यामुळे आता हा विषय दिल्ली दरबारी पोहोचला असून सत्तारूढ पक्षाचे तिन्ही नेते आज रात्री दिल्ली दरबारी चर्चा करतील. शिंदे गट आणि भाजपा यांच्याकडे आलेली काही खाती नव्याने सामील झालेल्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला […]Read More

करिअर

राज्यात व्यवसायाभिमुख शिक्षण देण्यावर भर

ठाणे, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  महाराष्ट्र राज्य हे क्रांतीचे राज्य आहे त्यामुळे औद्योगीकरण वाढण्यासाठी नजीकच्या काळात व्यवसायाभिमुख शिक्षण हे शालेय शिक्षणाचा अविभाज्य भाग होणार आहे. येत्या काळात जागतिक कपन्यांशी टायअप होणार असून हे सरकार आल्यापासून परकीय गुंतवणूक भारतात आणणारे महाराष्ट्र राज्य हे प्रथम क्रमांकाचे राज्य ठरले आहे असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक […]Read More