Month: June 2023

महानगर

मुंबई, ठाणे नवी मुंबई सह राज्यात पावसाची हजेरी

मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे वातावरणात गारवा पसरला आहे. मुंबईत पुढील 72 तासांत सलग मान्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. तर तुरळक पावसामुळे उकाड्याने हैराण झालेले नागरिक सुखावले आहेत हवामान खात्याच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस सुरु होणार आहे. बिपरजॉय […]Read More

राजकीय

विरोधकांच्या जत्रेत घुसण्याचा ठाकरेंचा केविलवाणा प्रयत्न ….

मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यात विरोधकांची ‘वज्रमूठ’ तयार करण्याचा प्रयोग सपशेल फसल्यावर उद्धव ठाकरे विरोधकांच्या राष्ट्रीय आघाडीत घुसून आपले अस्तित्व दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत, अशी टीका भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. उपाध्ये यांनी पत्रकात म्हटले आहे की,पक्ष आणि निवडणूक चिन्हदेखील गमावल्यामुळे संपुष्टात आलेल्या गटाचे अस्तित्व टिकविण्यासाठी  उद्धव ठाकरे […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

संतांच्या पालख्या येताच दमदार पावसाची हजेरी …

सोलापूर, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सोलापूर जिल्ह्यात संतांचे आणि वारकरी भक्तांचे आगमन होताच सर्वदूर पाऊस सुरू झाला. माळशिरस तालुक्यासह पंढरपूर , आणि पालखी मार्गावर दमदार पावसाने हजेरी लावली. पावसाळा सुरू झाल्यापासून प्रथमच असा पाऊस सुरू झाला. पंढरपूरच्या वाटेवर असणाऱ्या पालखी मार्गावर देखील दमदार पावसाने हजेरी लावली त्यामुळे पायी चालत चाललेले अनेक वारकरी देखील भिजत पंढरपूरची […]Read More

सांस्कृतिक

तुकाराम महाराज पालखीचे अकलूज येथे झाले गोल रिंगण…

सोलापूर, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा आज सोलापूर जिल्हयात प्रवेश झाला. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील , जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने तिचे स्वागत केले.यानंतर अकलूज येथे सदाशिवराव माने विद्यालयाच्या मैदानावर गोल रिंगण झाले. या रिंगणात अश्व धावले. नंतर विनेकरी , तुळशी घेतलेल्या महिला ….अन् वारकरी रिंगणाच्या मैदानात धावले. […]Read More

महिला

केंद्र आणि राज्य सरकारने विधवा महिलांच्या संरक्षणासाठी कठोर पावले उचलावी

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मुक्ती अभियान राष्ट्रीय आयोजित. दिल्ली येथील राष्ट्रीय विधवा महिला परिषदेत दृक श्राव्य माध्यमातून बोलताना महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या उपसभापती आणि स्त्री आधार केंद्र पुणे याच्या अध्यक्षा डॉ. नीलम ताई गोऱ्हे या म्हणाल्या, आज आपण एका विशिष्ट टप्यावर येऊन पोहोचलो आहोत. मात्र पुढे अजून काम करण्यासाठी आपल्याला एकजूट होण्याची गरज […]Read More

देश विदेश

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर

मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय क्रिकेट संघ पुढच्या महिन्यात वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. तिथे भारताला विंडीजविरुद्द एकूण १० सामने खेळायचे आहेत. यात दोन कसोटी, तीन एकदिवसीय आणि पाच टी-२० सामने अशा एकूण तीन मालिका खेळायच्या आहेत. १२ जुलैपासून उभय संघांमध्ये पहिला कसोटी सामना खेळवला जाईल. परंतु भारतीय संघ त्याच्या एक महिना […]Read More

देश विदेश

टपाल कार्यालय देणार रेल्वेचे कन्फर्म तिकीट

पणजी,दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशात सर्व क्षेत्रात खासगीकरण होत असल्याची चर्चा होत असताना केंद्र सरकारचे विविध विभाग मात्र हातात हात घालून विकसित होताना दिसत आहेत. भारतीय रेल्वे आणि पोस्ट खाते यामध्ये सर्वांत आघाडीवर असल्याचे दिसते. पणजी येथील मुख्य टपाल कार्यालयात आज रेल्वे तिकिच आरक्षण प्रणाली काऊंटरचे उद्घाटन करण्यात आले.सोमवार ते शनिवार सकाळी ८ […]Read More

साहित्य

साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर, हे आहेत पुरस्कार विजेते मराठी लेखक

मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : साहित्य क्षेत्रात मानाचे पुरस्कार समजल्या जाणाऱ्या साहित्य अकादमी आज पुरस्कार जाहीर झाले आहेत. साहित्यामध्ये रुची असणाऱ्या आणि साहित्याची आवड असणाऱ्यांना या पुरस्काराची विशेष उत्सुकता असते. यंदाच्या वर्षी मराठी साहित्याक्षेत्रातूनही युवा आणि बाल पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. मराठी भाषेसाठी विशाखा विश्वनाथ या युवा साहित्य‍िकेच्या ‘स्वत:ला स्वत:विरुद्ध उभं करताना’ […]Read More

देश विदेश

टायटन पाणबुडी अपघातात प्राण गमावलेल्या जगप्रसिद्ध व्यक्ती

न्यूयॉर्क, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेला पूर्ण आठवडाभर संपूर्ण जग एखाद्या थरारपटात शोभेल अशा भीषण अपघात घटनेचे साक्षीदार झाले होते. १९१२ साली जलसमाधी मिळालेल्या टायटॅनिक या महाकाय बोटीच्या अवशेषांची पहाणी करण्यासाठी समुद्र तळाशी गेलेल्या जगातील ५ अब्जाधिशांच्या पाणबुडीचा संपर्क तुटला आणि महासत्ता अमेरिकेसह, कॅनडा आणि जगातील अन्य तत्रप्रगत देशांचे नौदल तज्ज्ञ या दुर्दैवी […]Read More

महानगर

लोकशाही, संविधान व अन्नदात्यावरील संकट टळो आणि काँग्रेसची सत्ता येवो

तुळजापूर, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राज्यातील अनेक भागात अजून पेरण्या झालेल्या नाहीत. काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट आहे. सरकारी मदत मिळत नाही, अन्नदाता बेहाल झाला असून आत्महत्या चारपटींनी वाढल्या आहेत. बळीराजावरील हे अस्मानी, सुलतानी संकट टळू दे, भरपूर पाऊस पडो, पीक भरघोस येवू दे आणि शेतकऱ्याच्या घरी आर्थिक संपदा येऊ दे. त्याचबरोबर देशावर व […]Read More