Month: January 2023

ट्रेण्डिंग

भारतीय हवाई दलाच्या दोन विमानांची भीषण टक्कर, १ वैमानिक मृत्यूमुखी

भोपाळ,दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मध्यप्रदेशमधील मोरेना येथे  आज सकाळच्या सुमारास सुखोई-३० आणि मिराज २००० ही दोन विमानं कोसळली.  या विमानांची हवेत धडक झाल्याचं सांगितलं जात आहे. अपघातात दोन वैमानिक जखमी झाले आहेत. तर, एकाचा मृत्यू झाल्याची माहिती भारतीय हवाई दलाने दिली आहे. दोन्ही विमानांनी ग्वाल्हेर येथील हवाई तळावरून उड्डाण केलं होतं. अपघातावेळी सुखोई-३० मध्ये […]Read More

ट्रेण्डिंग

रथसप्तमीनिमित्त विद्यार्थ्यांनी घातले सूर्यनमस्कार

उस्मानाबाद, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विवेकानंद संस्कार केंद्र कन्याकुमारी शाखा, उस्मानाबादच्या वतीने आज रथसप्तमीनिमित्त उस्मानाबाद शहरातील सहा शाळांतील 755 विद्यार्थ्यांनी सामूहिक सूर्यनमस्कार घातले. यानिमित्ताने सूर्यनमस्काराचे महत्त्व विशद करण्यात आलं. तसंच संक्रमण काळातील रथसप्तमी सणानिमित्त प्रकटणारे सूर्याचे तेज स्वामी विवेकानंदांच्या ज्ञानतेजाप्रमाणे विद्यार्थ्यांनी आत्मसात करावं अस आवाहन यावेळी करण्यात आलं. ML/KA/SL 28 Jan. 2023Read More

अर्थ

अर्थसंकल्पापूर्वी बाजारात 2% पेक्षा जास्त घसरण. अदानी समूहाच्या शेअर्स मध्ये

मुंबई,दि. २८ (जितेश सावंत ) :  भारतीय बाजाराने 27 जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात दोन आठवड्यांचा तेजीचा सिलसिला तोडला. सेन्सेक्स आणि निफ्टीने प्रत्येकी 2% घसरून एका महिन्यातील सर्वात मोठी साप्ताहिक घसरण नोंदवली.बँक निफ्टीत 5% पेक्षा जास्त घसरण झाली , ही 11 महिन्यांतील सर्वात मोठी साप्ताहिक घसरण ठरली. मिडकॅप निर्देशांक सलग चौथ्या आठवड्यात घसरला.निफ्टीच्या 50 पैकी 35 समभागानी […]Read More

ट्रेण्डिंग

राहूल गांधी यांना लोक आता गांभीर्याने घेऊ लागले आहेत

कोल्हापूर, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशभरात काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद लोकांनी दिला, ते आता गांधी यांना गांभीर्याने घेऊ लागले आहेत असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.ते कोल्हापुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात राज्यात लोकसभेच्या चौतीस जागा महा विकास आघाडीला मिळतील […]Read More

मनोरंजन

नाशिकमध्ये आजपासून अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन

नाशिक,दि.२८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषदेच्या वतीने आज आणि उद्या( २८ आणि २९ जानेवारी) रोजी नवव्या अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.  प्रा. फकरुद्दीन बेन्नूर नगरी दादासाहेब  गायकवाड सभागृहात हे संमेलन होत आहे.अब्दुल कादर मुकादम  हे संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषवत आहेत. ज्येष्ठ पत्रकार आरफा खानम शेरवानी […]Read More

मनोरंजन

शांघाय सहकार्य संघटनेच्या चित्रपट महोत्सवाचा शुभारंभ

मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क)  शांघाय सहकार्य संघटनेच्या चित्रपट महोत्सवाचा काल शुभारंभ झाला. हा चित्रपट महोत्सव निर्मात्यांसाठी एकत्र येण्याची आणि जागतिक चित्रपटसृष्टीचे अनुभव घेण्याच्या उत्तम संधी प्रदान करतो असे उद्घाटन प्रसंगी माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले. हा चित्रपट महोत्सव आयोजित करण्यामागचा भारताचा उद्देश चित्रपटांमधील वैविध्य आणि एससीओ प्रदेशातील चित्रपट निर्मितीच्या शैली […]Read More

Breaking News

मोदींकडून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर नाहीच

मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कडून ई डी, सीबीआय आदी कोणत्याही केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होत नाही असे ठाम मत वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे, यामुळे शिवसेना ठाकरे गटाकडून त्यावर काय प्रतिक्रिया येते ती पहावी लागेल. ज्यांच्यावर या यंत्रणा सध्या कारवाई करीत आहेत त्यांनी […]Read More

Breaking News

शरद पवारांवरील वक्तव्यावरून वंचित – सेनेत खटके

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शरद पवार हे भाजपचे समर्थक असल्याचे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड प्रकाश आंबेडकर यांनी केल्यामुळे सेना नेते आणि आंबेडकर यांच्यात चांगलेच खटके उडाले आहेत.Deprived of statements on Sharad Pawar – Sena cases प्रकाश आंबेडकर यांनी सांभाळून बोलावे आणि पवारांवर टीका करताना विचार करावा असे संजय राऊत यांनी आज म्हटले […]Read More

क्रीडा

भारत, U-19 महिला T-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत दाखल

पोचेस्ट्रूम,दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दक्षिण आफ्रिकेतील पोचेस्ट्रूम येथे सुरू असलेल्या U 19  T 20 महिला विश्वचषक स्पर्धेत आज भारतीय मुलींनी दिमाखदार कामगिरी करत न्यूझीलंडचा 8 गडी राखून पराभव केला. या विजया बरोबरच भारतीय महिला संघाने या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आज झालेल्या पहिल्या उपांत्य फेरीत भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. […]Read More

ट्रेण्डिंग

‘परीक्षा पे चर्चा’ संवादातून पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना दिले तणावमुक्तीचे धडे

नवी दिल्ली, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दहावी- बारावी  या महत्त्वाच्या वर्षांच्या परीक्षा सुरु होण्यापूर्वी दरवर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. दरवर्षी प्रमाणे आज नवी दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरातील विद्यार्थ्यांशी यावेळी संवाद साधला. यावेळी देशभरातीली विविध भागातले विद्यार्थी, पालक आणि शिक्षक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी उत्तर प्रदेशचे […]Read More