Month: January 2023

मनोरंजन

अमृता फडणवीस म्हणताहेत, मैंने मुड बना लिया!

मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रसिद्ध गायिका आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच आपल्या  हटक्या स्टाईलमुळे चर्चेत असतात. आता त्यांचे  मैंने मुड बना लिया! हे पंजाबी  भाषेतील नवीन गाणे प्रदर्शित झाले आहे. ते व्हायरल होताच त्यावर मोठ्या प्रमाणात नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या कमेंटस करणं सुरु केले आहे. काही नेटकऱ्यांनी आणि चाहत्यांनी […]Read More

ट्रेण्डिंग

आता KYC साठी बँकेत जायची गरज नाही

मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय रिझर्व्ह बॅंकेने बॅंक ग्राहकांचे काम सोपे करणारी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केवायसीचे नियम आता आणखी सोपे केले आहेत. आता केवायसी करण्यासाठी बँक ग्राहकांना बँकेच्या शाखेत जाण्याची गरज नाही. आता नवीन KYC प्रक्रिया घरबसल्या किंवा कुठेही व्हिडिओ आधारित ग्राहक ओळख प्रक्रियेद्वारे पूर्ण केली […]Read More

विज्ञान

DRDO ने सैनिकांसाठी तयार केले अधिक टिकणारे खाद्यपदार्थ

नागपूर, दि.6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्राण पणाला लावून सीमेवर ऊन, वारा,थंडी, पाऊस यांची तमा न बाळगता अहोरात्र तैनात असणाऱ्या भारतीय सैनिकांसाठी दोन वेळचे जेवण मिळणेही अनेकदा दुरापास्त होते. अशाच दुर्गम आणि विपरीत परिस्थितीत अडकलेल्या सैन्यातील जवानांसाठी संरक्षण, संशोधन आणि विकास या संघटनेच्या वतीने  एक वर्षाहून अधिक काळ टिकू शकेल असे खाद्य पदार्थ तयार करण्यात आले […]Read More

Breaking News

संजय राऊतांविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

मुंबई दि.6( एम एमसी न्यूज नेटवर्क): भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यास शिवसेना(ठाकरे गट) खासदार संजय राऊत वारंवार गैरहजर राहिल्याने शिवडी न्यायालयाने त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. याबाबतची सुनावणी 24 जानेवारी रोजी होणार आहे. शंभर कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी मेघा सोमय्या यांच्यावर केला […]Read More

ट्रेण्डिंग

अति साखर खाल्ल्याने हे होतात दुष्परिणाम

मुंबई, दि. 06 (एमएमसी न्यूज नेटवर्क): निरोगी राहण्यासाठी, आपण प्रथिने, जीवनसत्त्वे, कार्ब्स, चरबी आणि खनिजे यांसारख्या सर्व पोषक घटकांचे (nutrition) सेवन करणे महत्त्वाचे आहे. मात्र, आपल्या रोजच्या जेवणात अशा काही गोष्टी असतात, ज्याचा शरीराला फायदा होत नाही, तरीही आपण त्यांचे सेवन करतो. त्यापैकी एक पदार्थ म्हणजे साखर. साखर खाल्ल्याने (sugar) आपल्या शरीराला फायदा होत नाही. जास्त […]Read More

Breaking News

नवाब मलिकांच्या कोठडीत आणखी वाढ …

मुंबई, दि. 06 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या जामिनावर सुनावणी झाली. मात्र त्यांना कोणताही दिलासा मिळू शकलेला नाहीये. मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत आणखी 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे.Further increase in Nawab Malik’s custody… त्यामुळे मलिक यांचा न्यायालयीन कोठडीतील मुक्काम वाढला आहे. कुर्ला येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणात नवाब मलिक […]Read More

करिअर

परदेशी विद्यापीठांसाठी आता भारतीय बाजारात

दिल्ली, दि. 06 (एमएमसी न्यूज नेटवर्क): परदेशी विद्यापीठांना आता भारतातील बाजारपेठ खुली झाली असून विद्यापीठ अनुदान आयोगाच्या पूर्व मान्यतेने भारतात त्यांच्या शाखा उघडता येणार आहेत. यामुळे परदेशी विद्यापीठे असा एक विद्यापीठांचा एक प्रकार वाढणार आहे. भारतातील केंद्रीय, शासकीय, अभिमत, खासगी, समूह विद्यापीठे यांच्या जोडीला हा एक नवा प्रकार असेल. गेली पंचवीसहून अधिक वर्षे परदेशी विद्यापीठांना भारतात […]Read More

Breaking News

मुंबई विमानतळावर 47 कोटीचे ड्रग्ज जप्त

मुंबई, दि. 06 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये केलेल्या कारवाईत 32 कोटीचे कोकेन व 31.29 कोटी रुपये किमतीचे हेरॉईन असे 47 कोटी रुपये किंमतीचे अमली पदार्थ हस्तगत केले आहे.Drugs worth 47 crore seized at Mumbai airport सीमा शुल्क अधिकाऱ्याने सांगितले की, 31.29 कोटी रुपये किमतीचे 4.47 […]Read More

विज्ञान

आता गर्भातील बाळाच्या जनुकीय आजारांचे निदान शक्य

नागपूर, दि. 06 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जनुकीय वैद्यकशास्त्रात गेल्या काही दशकात खूप प्रगती झाली आहे, त्यामुळे गर्भावस्थेत चाचण्यांद्वारे जन्माला येणाऱ्या बाळांमध्ये असणाऱ्या जनुकीय आजारांचे निदान ही शक्य आहे. जगभरात सुमारे 6000 प्रकारचे जेनेटिक आजार आहेत आणि यावर या आजारांवर निदान करून उपचार शक्य आहे असे मत लखनऊ येथील संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस […]Read More

Featured

वातावरणातील बदलामुळे तुरीच्या पिकावर परिणाम

बुलडाणा, दि. 05 (एमएमसी न्यूज नेटवर्क): बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा नैसर्गिक संकट ओढवले आहे. वातावरणातील बदलाचा तूर पिकावर मोठा परिणाम झाला आहे. सोबतच मर या रोगानेही तुरीवर आक्रमण केल आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात उभं असलेलं तुरीचे पीक जळून गेल आहे.Effects of Climate Change on Turmi Crop नगदी पीक म्हणून ओळख असलेल्या तुरीच्या पिकाची बुलडाणा जिल्ह्यात […]Read More