Month: December 2022

ऍग्रो

या जिल्ह्यात वर्षभरात 138 शेतकरी आत्महत्या

मुंबई,दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कापूस, कडधान्य आणि तेलबियांच्या उत्पादनात विदर्भातील एक प्रमुख जिल्हा असलेल्या वर्धा जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षभरात शेतकरी आत्महत्यांचे सावट गडद होताना दिसत आहे. ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, हमीभावाने शेतमाल खरेदी वेळेवर न होणे, शेतीपंपांची वीज कापणी अशा अनेक कारणांनी त्रस्त असलेल्या या जिल्ह्यात यार्षी  जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत  तब्बल १३८ […]Read More

Featured

महाराष्ट्रात ७० हजार कोटी गुंतवणूकीच्या प्रकल्पांना मान्यता

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राज्यातील विदर्भ, मराठवाडा, नाशिक, पुणे या भागातील औद्योगिक विकासाला चालना देत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या चौथ्या बैठकीत ७० हजार कोटींच्या गुंतवणूक प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. यामुळे सुमारे ५५ हजार रोजगार निर्मिती होणार आहे. राज्यात औद्योगिक गुंतवणुकीस पोषक वातावरण असून उद्योगांना सवलत देण्याचं […]Read More

महानगर

मुंबई महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळणार कौशल्य प्रशिक्षण

मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना आता विविध प्रकारचे कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी आज राज्य शासनाचा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, शालेय शिक्षण विभाग आणि बृहन्मुंबई महापालिका यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री […]Read More

राजकीय

नवाब मलिकांच्या जामिनास नकार

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी वैद्यकीय जामिनासाठी केलेल्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. त्याचवेळी मलिक यांच्या वैद्यकीय स्थितीचा दोन आठवड्यांत अहवाल सादर करण्याचेही आदेश ही न्यायालयाने दिले.Nawab Malik’s bail denied मलिक हे त्यांच्या पसंतीनुसार खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. Malik is […]Read More

महानगर

शिमग्यापर्यंत मुंबई गोवा महामार्गाचे काम पूर्ण करा अन्यथा.!

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  वेळ पडली तर नागपूर ते मुंबई समृद्धी मार्गाचे उर्वरित बांधकाम थांबवा व मुंबई गोवा महामार्गाचे काम शिमग्यापर्यंत पूर्ण करा अशी मागणी मुंबई गोवा महामार्ग समितीच्या वतीने मुंबई पत्रकार संघात करण्यात आली . अन्यथा कोकणवासीयांच्या रोषाला राजकारण्यांना सामोरे जावे लागेल असाही इशारा यावेळी देण्यात आलाComplete the work of Mumbai Goa […]Read More

देश विदेश

आता या राज्यानेही केले राज्यपालांना हद्दपार

तिरुअनंतपुरम, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यामध्ये केंद्राचे प्रतिनिधीत्व करणारे आणि समन्वय साधणारे पद म्हणजे राज्यपाल. राज्यपाल हे संबंधित राज्यातील सर्व विद्यापीठांचे पदसिद्ध कुलपती (chancellor ) आणि सर्व कुलगुरुंचे प्रमुख असतात. यासाठी त्यांना कोणतेही विशेष शैक्षणिक पात्रता धारण करणे आवश्यक नसते. याच पदसिद्ध पदावर आक्षेप उपस्थित करत केरळ राज्याने विद्यापीठांच्या कुलपती पदावरून हटवण्याचा निर्णय […]Read More

महानगर

स्टार बॅक कासवांची तस्करी

मुंबई दि.13, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  दुर्मिळ स्टार बॅक कासवांची तस्करी करणाऱ्या एकाला एम एच बी पोलिसांनी बोरीवली मधून अटक केली. Trafficking in star-backed turtlesनदीम शुजाउद्दीन शेख (वय 33 ,रा,.मीरा रोड )असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्या कडून 20 स्टार बॅक कासव हस्तगत केले असून,त्याची किंमत साडेतीन लाख रुपये आहे. बोरीवलीच्या […]Read More

ट्रेण्डिंग

मंगळवार १३ डिसेंबर २०२२ रोजी मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त)

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मंगळवार १३ डिसेंबर २०२२ रोजी मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त) : • जलयुक्त शिवार अभियान २.० सुरु करण्याचा निर्णय. राज्यातील गावे पुन्हा जलसमृद्ध होणार. (मृद व जलसंधारण विभाग) • जळगांव जिल्ह्यातील कुऱ्हा-वढोदा इस्लामपूर उपसा सिंचन योजनेला गती देणार. २२२६ कोटी सुधारित खर्चास मान्यता. (जलसंपदा विभाग) * आदिवासी शासकीय आश्रमशाळेतील १५८५ […]Read More

राजकीय

राज्यातील सत्ता संघर्ष प्रकरणी सुनावणी दहा जानेवारीला

नवी दिल्ली,दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठासमोर आज शिंदे- ठाकरे गटामध्ये सुरु असलेल्या सत्तासंघर्षाची सुनावणी  झाली.  घटनापीठासमोर झालेल्या काही मिनिटांच्या युक्तिवादात  ठाकरे गटाच्या वकिलांनी सदर खटला सात न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर चालवावा, अशी मागणी केली. मात्र कोर्टाने ती फेटाळून लावली  आहे. शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे  आणि इतर आमदारांवरील अपात्रतेच्या कारवाईसंदर्भातील, यासोबतच राज्यपाल, विधानसभा अध्यक्षांच्या […]Read More

ट्रेण्डिंग

नागपूरचे अधिवेशन किमान तीन आठवडे घ्यावे

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोरोनामुळे दोन वर्षे नागपूरला हिवाळी अधिवेशन होऊ शकले नाही. नागपूर, विदर्भाच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी, विदर्भवासियांमधील दुर्लक्षाची भावना दूर करण्यासाठी नागपूरचे हिवाळी अधिवेशन किमान तीन आठवडे घेण्यात यावे, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत केली. विरोधी पक्षनेत्यांची मागणी विचारात घेऊन अधिवेशनकाळात […]Read More