mmc

महानगर

राज्यातील कामगारांचा मुंबईत 21 डिसेंबरला महामोर्चा

मुंबई दि.19( एम एमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्रातील संघटित आणि असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या विविध समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 21 डिसेंबर रोजी आझाद मैदान मुंबई येथे भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चाला कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातून हजारो कामगार उपस्थित राहतील अशी माहिती भारतीय मजदूर संघ […]Read More

विदर्भ

विधिमंडळ अधिवेशन : माध्यम कक्षाचे उद्घाटन

नागपूर, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी सिव्हील लाईन्स येथील ‘सुयोग’ निवासस्थानी उभारण्यात आलेल्या माध्यम कक्षाचे उद्घाटन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या सचिव तथा महासंचालक जयश्री भोज यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भोज यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, “प्रसार माध्यमे हा लोकशाहीचा महत्त्वाचा स्तंभ असून शासनाच्या विविध योजना, निर्णय यांची माहिती लोकांपर्यंत […]Read More

Lifestyle

केशर हळदीचे दूध कसे बनवायचे

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवण्यासाठी केशर हळदीचे दूध हे एक उत्तम पेय आहे, तर ते शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास देखील मदत करते. चला जाणून घेऊया केशर हळदीचे दूध बनवण्याची सोपी पद्धत. केशर हळदीचे दूध बनवण्यासाठी साहित्य दूध – 2 ग्लास हळद – १/२ टीस्पून केशर धागे – 8-10 चिरलेले […]Read More

Featured

ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी 74 टक्के मतदान

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यभरातील 7 हजार 135 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्राथमिक अंदाजानुसार आज सरासरी सुमारे 74 टक्के मतदान झाले. यावेळी सदस्यपदांसह थेट सरपंचपदासाठीदेखील मतदान पार पडले.   राज्य निवडणूक आयोगाने 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यातील काही ठिकाणी सरपंचपदाच्या, तर काही ठिकाणी सदस्यपदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. त्यामुळे […]Read More

राजकीय

राजभवन हा एका राजकीय पक्षाच्या कट करस्थानाचा अड्डा ….

नागपूर, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्याचे राजभवन rajbhavan हे एका विशिष्ट राजकीय पक्षाच्या कट करस्थानाचे अड्डा बनले आहे , राष्ट्रपुरुष आणि थोर नेत्यांबद्दलची बेताल वक्तव्ये, सीमाप्रश्नावर बोटचेपी भूमिका, शेतकऱ्यांना न मिळालेली नुकसाभरपाई या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाने मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय जाहीर केला आहे.   विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला […]Read More

ट्रेण्डिंग

GST Council ने निश्चित केली SUV कारची व्याख्या

नवी दिल्ली,दि. 18(एमएमसी न्यूज नेटवर्क) : जीएसटी कौन्सिलच्या  बैठकीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी SUV म्हणजे काय, याची एक मानक व्याख्या तयार केली आहे. भारतात विकल्या जाणार्‍या कारच्या सर्वात लोकप्रिय प्रकारांपैकी SUV हा एक प्रकार आहे. आत्तापर्यंत, वेगवेगळ्या राज्यांमध्ये SUV कशामुळे बनते याच्या वेगवेगळ्या व्याख्या होत्या ज्यामुळे ऑटोमेकर्स आणि कार खरेदीदारांमध्ये SUV म्हणजे नेमकं काय आहे […]Read More

ट्रेण्डिंग

जाणून घ्या एसटीची ‘ Smart Card’ सुविधा

मुंबई,दि. 18(एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिवसेंदिवस अद्ययावत होणाऱ्या एसटी महामंडळाने सर्वसामान्यांसाठी ‘स्मार्ट कार्ड’ सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. महामंडळाने सामान्यांकरिता स्मार्ट कार्ड सेवा देण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. हे कार्ड घेणाऱ्यास प्रवासात दहा टक्के सवलत मिळणार आहे. त्यामुळे प्रवासी आणि उत्पन्नही वाढेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एसटीमधून दररोज ३२ ते ३३ लाख प्रवासी प्रवास […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

चित्रपट परीक्षण समितीवर विश्वास नाही, इतिहासकारांची नेमणूक करा

  कोल्हापूर, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ऐतिहासिक चित्रपटांचं पहिलं स्क्रिनिंग महाराष्ट्रात झालं पाहिजे, यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आपण पत्र लिहिणार असल्याचं संभाजीराजे छत्रपती यांनी आज कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलं. ऐतिहासिक चित्रपटासाठी इतिहासकारांची समिती नेमण्यात यावी अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली. केंद्रीय चित्रपट परीक्षण समितीवर आमचा विश्वास नाही. यासाठी अशा चित्रपटांचं पहिल्यांदा […]Read More

क्रीडा

अंध क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत सलग तिसऱ्यांदा विजयी

बंगळुरू,दि. 18(एमएमसी न्यूज नेटवर्क) :येथे झालेल्या अंध T-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल भारतीय संघाने बांग्लादेशचा पराभव करून सलग तिसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरले. भारतीय फलंदाजांनी उभी केलेली 278 धावसंख्या गाठताना बांग्लादेश ची दमछाक झाली आणि भारताने तब्बल 120 धावांनी बांग्लादेशाला पराभूत केले. कर्णधार अजय कुमार रेड्डी आणि फलंदाज सुनील रमेश यांच्या शतकी खेळीने भारताच्या विजयाला मोठा […]Read More