Milind

कोकण

नवयान बौद्ध युवा संघाच्या वतीने ९९ वा सत्याग्रह दिन उत्साहात

महाड, दि ३०भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ रोजी महाडच्या ऐतिहासिक क्रांतीभूमीत मानवमुक्तीचा निशस्त्र लढा उभारला. या सत्याग्रहातून समाजातील विषमतेला सुरुंग लावून समतेचा पाया रचला गेला. या ऐतिहासिक घटनेला २० मार्च २०२६ रोजी ९९ वर्षे पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे देशभरातून भीम अनुयायी मोठ्या संख्येने महाड येथे दाखल झाले होते. […]Read More

महानगर

ठाणे जिल्ह्याचा ‘डिजिटल कायापालट’:

भिवंडी, दि ३०महाराष्ट्रातील सर्वाधिक वेगाने नागरीकरण होणारा आणि औद्योगिकदृष्ट्या प्रगत जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्याने आता डिजिटल प्रशासनाच्या क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण केला आहे. जिल्ह्याचा विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता, शासकीय सेवा शेवटच्या घटकापर्यंत पारदर्शकपणे पोहोचविण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर होते. हे आव्हान स्वीकारून जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘ई-गव्हर्नन्स सुधारणा अभियानांतर्गत […]Read More

शिक्षण

अष्टपैलू शिक्षक नितिन आहेर जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित !!!

मोखाडा, दि ३०अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले प्राथमिक शिक्षक नितीन आहेर यांना जिल्हा परिषद पालघर च्या वतीने मोखाडा तालुक्यातुन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाचा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे व शिक्षणाधिकारी सोनाली मातेर,जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष चौधरी याच्या हस्ते गोवर्धन इको व्हिलेज गालतरे वाडा येथे […]Read More

पर्यावरण

नांदूरमध्यमेश्वरमध्ये ‘ग्रेट व्हाईट पेलिकन’चे आगमन

नाशिक दि ३० : नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील नांदूर मध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्य येथे प्रथमच ‘ग्रेट व्हाईट पेलिकन’ (रोजी पेलिकन) या दुर्मिळ पक्ष्यांचे आगमन झाल्याने निसर्गप्रेमी आणि पक्षी अभ्यासकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. २८ मार्च २०२६ रोजी या पक्ष्याची अधिकृत नोंद करण्यात आली असून, महाराष्ट्रासाठी ही एक ऐतिहासिक घटना मानली जात आहे. अभयारण्याच्या नोंदींनुसार, यापूर्वी […]Read More

कोकण

महामार्गाच्या खड्ड्यात मगरींचे ‘घर’.

अलिबाग दि ३० – रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील नानोरे येथे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ च्या विस्तारीकरणाच्या कामादरम्यान एक अनोखी आणि थरारक घटना उघडकीस आली. महामार्गावरील एका मोठ्या खड्ड्यात चक्क मगरींची दोन पिल्ले आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. मात्र, कामगारांच्या समय सूचकतेमुळे आणि वन विभाग आणि रेस्क्यू टीमच्या तत्परतेमुळे या पिल्लांना सुरक्षित नवजीवन मिळाले. माणगाव बायपास […]Read More

क्रीडा

श्री गणेश आखाड्याच्या डॉली गुप्ता हिला कांस्यपदक…

सोलापूर दि २९ : हरिभाई देवाकरण प्रशाला , सिध्देश्वर पेठ , सोलापूर या ठिकाणी महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२६ संपन्न झाली.या स्पर्धेत मिरा भाईंदर महानगर पालिकेच्या सौजन्याने सुरू असलेल्या मिरा भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाड्यातील महिला पैलवान कुमारी डॉली गुप्ता हिने कांस्य 🥉 पदकाची कमाई केली. या स्पर्धेत तिचा पहिला सामना कोल्हापूरच्या […]Read More

राजकीय

जमीन मोजणी होणार आता सुपरफास्ट !, प्रत्येक जिल्ह्यात खाजगी भूमापकांची

मुंबई, दि. २९ : जमीन मोजणी प्रकरणांचा निपटारा अचूक, जलद, गुणवत्तापूर्ण व पारदर्शी पद्धतीने व्हावा यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात प्रशिक्षित परवानाधारक भूमापक आणि भूमापन एजन्सी नियुक्ती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला. याबद्दलची कार्यपद्धती निश्चित करून शासनाने आदेश जारी केला आहे. मोजणी प्रकरणांचे निश्चित वेळापत्रक ठरवून […]Read More

साहित्य

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय शाखांच्या अनुदानासाठी कटिबद्ध – महापौर श्रीमती रितू

मुंबई, दि २९“वाचन संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी आणि ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रंथालयांची भूमिका अत्यंत मोलाची आहे. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाद्वारे चालवल्या जाणाऱ्या महानगरपालिका शाखांच्या प्रलंबित अनुदान वाढीसाठी मी पूर्णपणे सकारात्मक आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी कटिबद्ध आहे,” अशी ग्वाही मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी दिली. दादर (पूर्व) स्थित मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात आयोजित ‘मुंबई शहर […]Read More

महानगर

उखडलेल्या पेव्हर ब्लॉकमुळे पादचारी त्रस्त

मुंबई, दि २९सीएसटी येथील रेल्वे मुख्यालयासमोर पदपथावरील पेव्हर ब्लॉक उखडल्यामुळे पादचारी आणि नागरिक पाय अडकून पडत आहेत. या पदपथावर मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये – जा सुरु असते. तसेच या परिसरात या परिसरात मोठ्या प्रमाणात सरकारी आणि खाजगी कंपन्यांची कार्यालये असल्यामुळे या पदपथावरून रोज हजारो चाकरमानी ये – जा करत असतात. तसेच महापालिका मुख्य कार्यालय देखील […]Read More

महानगर

बेस्ट कामगारांच्या प्रश्नांवर लवकर तोडगा निघेल, कामगार नेते गजानन नागे

मुंबई, दि २९ मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या ‘बेस्ट’ उपक्रमातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात नुकतीच मुंबई महानगरपालिका मुख्यालय येथे निर्णायक बैठक संपन्न झाली.या बैठकीचे आयोजन माननीय महापौर रितू तावडे आणि सभागृह नेते गणेश खणकर यांनी केले होते.भाजपा बेस्ट कामगार संघाने सन २०२१ पासून ते आतापर्यंत केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आज खऱ्या अर्थाने यश मिळाले आहे. बैठकीदरम्यान संघाने गेल्या ५ […]Read More