चंद्रपूर, दि २१:–चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधेचा प्रकार उजेडात आलाय. बोरगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांची सहल गेली होती. सहल पार पडल्यावर स्थानिक इको पार्क मध्ये भोजन शिजविण्यात आले होते. याच भोजनात चिकन शिजवून विद्यार्थ्यांना देण्यात आले. याच चिकनमधून एकूण 52 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. यापैकी 12 विद्यार्थ्यांना गोंडपिपरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्वांची […]Read More
मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : या हिवाळ्यात मुंबई महानगर आणि परिसरातील शहरांतील हवेमध्ये हानिकारक असे वायू आणि अन्य प्रदुषकांचे प्रमाण वाढले आहे. तापमानातील घट आणि प्रदूषित घटकांच्या वाढत्या प्रमाणामुळे मुंबई आणि आसपासच्या शहरांतील हवा प्रदूषण अतिप्रदूषित पातळीवर पोहोचले आहे. मुंबईच्या हवेत नायट्रोजन डायऑक्साइडचे प्रमाण जास्त झाले आहे. यामुळे श्वसनाचे विकार वाढले आहे. दम्याचे […]Read More
नवी दिल्ली,दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लैंगिक शोषणाच्या आरोपामुळे अडचणीत आलेल्या खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांना मोठा दणका बसला आहे. तब्बल सात तासाच्या बैठकीनंतर अखेर ब्रिजभूषण शरण सिंह यांना भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदावरून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चौकशीपूर्ण होईपर्यंत ब्रिजभूषण सिंह यांना अध्यक्षपदावरून दूर ठेवण्यात येणार आहे. केंद्रीय […]Read More
ठाणे, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शिवसेनेतील फुटीनंतर अनेक मोठ्या नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केला असून आता ठाण्यातील राष्ट्रवादीचा एक मोठा नेता शिंदे गटात प्रवेशाच्या तयारीत असल्याची चर्चा सुरु आहे.Big blow to NCP in Thane? राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे एके काळचे सहकारी आणि ठाणे महापालिकेतील राष्ट्रवादीचे गटनेते नजीब मुल्ला शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्रातील हवामान अलीकडे थंड आहे, परंतू लवकरच ते गरम होईल, असा अंदाज राज्याच्या हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यांच्या अंदाजानुसार, राज्यातील तापमान 2 ते 3 अंशांनी वाढणार आहे, कारण वारे उत्तरेकडून कमी वाहत आहेत. यंदा थंडीचा कालावधी कमी असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे. परंतू महाराष्ट्राच्या काही भागात विशेषतः कोकण, खान्देश, […]Read More
मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र शासनाच्या विविध कार्यालयांमधील सुमारे ८ हजार पेक्षा अधिक पदांच्या भरतीसाठी आज, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहिरात प्रसिद्ध केली आहे. लोकसेवा आयोगाच्या ८५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणातील पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून फक्त एकाच अर्जाद्वारे विविध संवर्गातील या भरती प्रक्रियेत उमेदवारांना सहभागी होता येणार आहे, असे […]Read More
मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दावोस येथून महाराष्ट्रात तब्बल १ लाख ३७ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाल्याचा दावा केला आहे. परंतू यातील काही कंपन्या या महाराष्ट्रातीलच असून महाराष्ट्रात गुंतवतणूक करण्यासाठी दावोसला जाण्याची काय गरज होती असा सवाल विचारला जात आहे. महाराष्ट्रातील तीन कंपन्यांशी […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत येऊन सहा महिने झाले आहेत. या काळात सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. नुकतेच छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीवरून वाद निर्माण झाला होता. छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर की स्वराज्यरक्षक यावरुन मतमतांतरे तसेच विवाद सुरु आहे.An important decision of the Shinde-Fadnavis government regarding the birth anniversary of […]Read More
औरंगाबाद, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ऑनलाइन भारत पे ॲप द्वारे इन्स्टंट लोन दिल्यानंतर कर्जदारास शिवीगाळ करणे, धमक्या देणे, सोशल मीडियावर कर्जदारांची छायाचित्रांचे मॊर्फिंग करून वायरल करण्याच्या प्रकारामुळे झारखंड मधील डेहराडून शहरातील शेकडो नागरिक त्रस्त होते. ऑनलाइन फसवणुकीसाठी देशभर बदनाम असलेल्या झारखंड राज्यातील “जामतारा येथील मॉडेलनुसार ऑनलाईन भारत पे ॲप द्वारे इन्स्टंट लोन” घेणाऱ्यांकडून […]Read More
नाशिक, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क): नाशिक शहरात शिवजयंती साजरी करण्यासाठी शिंदे गटाने बोलावलेल्या बैठकीत मोठा राडा झाला, यावेळी वादविवाद झाल्याने एकाने आपल्याजवळ रिवाल्वर काढून हवेत गोळीबार केला. याबाबत अधिक माहिती अशी की, देवळाली गावातील सार्वजनिक पार येथे आज सायंकाळी शिंदे गटाने शिवजयंती साजरी करण्यासाठी बैठक बोलावली होती. ही बैठक सर्वपक्षीय समितीची असल्याचे निदर्शनास आले […]Read More