Month: December 2022

राजकीय

बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही :

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संयुक्त महाराष्ट्राचा लढा संपूर्ण देशाने पहिला आहे.अजूनही बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालेला नाही. तो घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे udhav Thakrey  यांनी दिला. कुणीही यायचं आणि डिवचून जायचं. आज सर्व पक्षांचे झेंडे इथे दिसतायत, ही महाराष्ट्राची ताकद आहे. फक्त महाराष्ट्रद्रोही इथे नाहीत. […]Read More

Featured

महापुरुषांची टिंगल-टवाळी करणाऱ्या राज्यपालाना पदावर राहण्याचा अधिकार नाही – शरद

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :महापुरुषांविषयी करण्यात आलेली वादग्रस्त विधानं, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न आणि राज्यातून बाहेर चाललेले उद्योग या सगळ्याचा निषेध करण्यासाठी आज मुंबईत महाविकास आघाडीकडून महामोर्चा काढण्यात आला.या मोर्चात लाखो लोक सहभागी झाले होते. या मोर्चाला संबोधित करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार sharad pawar यांनी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या वर सडकून टिका केली. […]Read More

Featured

विविध देशातील मध्यवर्ती बँकांच्या आक्रमक व्याजदर वाढीने बाजार गडगडला.

मुंबई, दि. 17 (जितेश सावंत) :16 डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात बाजारात घसरण दिसून आली.रुपयातील कमजोरी आणि एफआयआयच्या विक्रीमुळे बाजार सलग दुसऱ्या आठवड्यात घसरला. आठवड्यात जाहीर झालेली देशांतर्गत घाऊक महागाई 21 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचली तसेच युनायटेड स्टेट्स आणि ब्रिटन या देशातील महागाईत देखील घट होताना दिसली तरीसुद्धा यूएस फेडरल रिझर्व्ह (फेड), युरोपियन सेंट्रल बँक (ईसीबी) […]Read More

आरोग्य

महापालिकेतर्फे लवकरच पाच हजार स्वच्छतादूत रस्त्यावर

मुंबई दि.16( एम एमसी न्यूज नेटवर्क): संपूर्ण मुंबईसाठी महापालिकेतर्फे पाच हजार स्वच्छतादूत नेमले जाणार असून त्या माध्यमातून संपूर्ण स्वच्छतेत आमूलाग्र बदल करण्याची पालिकेची योजना आहे . यामध्ये हे स्वच्छतादूत कोणतीही दंडात्मक कारवाई करणार नाहीत, तर महानगरपालिकेचे डोळे व कान स्वरुपात प्रत्यक्ष कार्यरत राहणार आहेत तसेच मुंबई सुशोभीकरण प्रकल्पातील कामांची प्रगती व गुणवत्तेवर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक […]Read More

बिझनेस

सोन्याच्या दरात काहीशी घसरण

मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने तेजीत असलेल्या सोन्याच्या दरात आज काहीशी घसरण झाल्याने लग्नघरांना दिलासा मिळाला. जवळपास 55 हजार रुपयांपर्यंत पोहोचलेल्या सोन्याच्या किमतीत काल 800 रुपयांनी घट झाली.  १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ४९९९० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ५०,३०० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर […]Read More

Lifestyle

हा आहे भारतीयांनी सर्वाधिक Online Order केलेला पदार्थ

मुंबई,दि.16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आपल्या आवडत्या हॉटेल्समधुन आपण ऑर्डर केलेला पदार्थ घरपोच देणाऱ्या  SWIGGY या फुड डिलिव्हरी कंपनीने भारतीय खवय्यानी 2022 या वर्षांत सर्वाधिक मागवलेल्या पदार्थांचे नाव जाहीर केले आहे. यामध्ये बिर्याणी चा पहिला क्रमांक लागला आहे. SWIGGY Order@2022 SWIGGY ने जाहीर केलेल्या माहितीनुसार भारतीयांना या वर्षांत प्रतिसेकंद 2.28 बिर्याणी ऑर्डर करून विक्रम केला […]Read More

महानगर

उद्याच्या मोर्चाला अखेर पोलिसांची परवानगी

मुंबई दि.16( एम एमसी न्यूज नेटवर्क): महापुरुषांचा अवमान, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद, बेरोजगारी, महागाईसह इतर मुद्द्यांवरुन राज्य आणि केंद्र सरकारला घेरण्यासाठी महाविकास आघाडीतर्फे उद्या महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.या महामोर्चाला पोलिसांची परवानगी मिळाली असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकडून चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या महामोर्चाला २ ते अडीच हजार पोलिसांचा […]Read More

ट्रेण्डिंग

आगरी समाजाला मायभूमीतूनच बेदखल करण्याचे षडयंत्र

मुंबई दि.16( एम एमसी न्यूज नेटवर्क): रोहा, मुरुड, अलिबाग, श्रीवर्धन परिसरातील ४० गावांच्या हद्दीत सिडकोमार्फत स्वप्ननगरी उभी केली जात आहे. एवढं करून भागलं नाही म्हणून आता ठाणे, रायगड, पालघर या तीन जिल्ह्यांतील हजार गावांतील स्थानिक नागरिकांच्या मानगुटीवर नैनाचे भूत बसविले जात आहे.मूळनिवासी असलेल्या आगरी समाजाला आपल्या मायभूमीतूनच बेदखल करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे, असा आरोप […]Read More

विदर्भ

यांच्या घरामधुन जाते महाराष्ट्र- तेलंगणा ची सीमा

मुंबई,दि.16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्राला गुजरात,मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक आणि गोवा तसेच दादरा-नगर हवेली हा संघराज्य प्रदेश यांच्या सीमा  लागून आहेत. या सीमावर्ती भागातील असलेल्या गावांतील नागरीकांना दोन्ही राज्यांशी जुळवून घ्यावे लागते. मात्र काही वेळा या सीमाप्रश्नामुळे काही अजब गोष्टी समोर येतात. एका व्यक्तीचे अर्धे घर तेलंगणामध्ये तर अर्धे घर महाराष्ट्रात असल्याची अनोखी बाब […]Read More

Breaking News

कोकणाच्या सर्वांगीण विकासाठी नियोजन प्राधिकरण …

रत्नागिरी, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क)) : कोकणातील सर्व जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या धर्तीवर कोकण क्षेत्र विकास व नियोजन प्राधिकरण स्थापन करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केले. Planning Authority for Comprehensive Development of Konkan… रत्नागिरी जिल्ह्याच्या विकास कामांचा आढावा आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी घेतला त्यानंतर ते […]Read More