या सहा पिकांच्या हमीभावात केंद्र सरकारकडून वाढ

नवी दिल्ली,दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी दिवाळीनिमित्त दिलासादायक निर्णय घेतला आहे. सरकारनं २०२५-२६ च्या रब्बी हंगामासाठी ६ पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (MSP) वाढ केली आहे. वाढीव हमीभाव मिळालेल्या पिकांमध्ये गहू, जवस, हरभरा, मसूर, मोहरी आणि केसर यांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय घेण्यात आला. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळातील निर्णयांची माहिती दिली.
पिकनिहाय वाढीव हमीभाग
- गहू : २४२५ रुपये प्रति क्विंटल (आधी २२७५ रुपये)
- जवस : १९८० रुपये प्रति क्विंटल (आधी १८५० रुपये)
- हरभरा : ५६५० रुपये प्रति क्विंटल (आधी ५४४० रुपये)
- डाळ : ६७०० रुपये प्रति क्विंटल (आधी ६४२५ रुपये)
- मोहरी: ५९५० रुपये प्रति क्विंटल (आधी ५६५० रुपये)
- केसर : ५९४० रुपये प्रति क्विंटल (आधी ५८०० रुपये)
MSP म्हणजे किमान आधारभूत किंमत. सरकार दरवर्षी विविध पिकांसाठी एमएसपी जाहीर करते आणि पिकांच्या पेरणीपूर्वी ही किंमत ठरवली जाते. पिकांचा खर्च, उत्पादन खर्च, शेतकऱ्यांना उत्पन्नाची हमी अशा विविध बाबींचा विचार करून ही आधारभूत किंमत ठरवली जाते. भारत सरकार तृणधान्ये (जसे गहू, भात), कडधान्ये, तेलबिया आणि इतर पिकांसह २३ प्रमुख पिकांसाठी एमएसपी निश्चित करते.
SL/ML/SL
16 Oct. 2024