महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची सुनावणी आता होळीनंतरच

 महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची सुनावणी आता होळीनंतरच

नवी दिल्ली, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विविध कारणांनी लांबत चाललेल्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीला आता आणखी एक निमित्त मिळाले आहे. शनिवार, रविवार आणि होळी या लागून आलेल्या सुट्ट्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी आता होळी नंतरच होणार आहे.

सत्तासंघर्षाची सुनावणी या आठवड्यातच संपवा असं आदेश न्या. चंद्रचूड यांनी आधीच्या सुनावणीत दिला होता. मात्र, शिंदे गटाचे वकील हरीश साळवी यांच्या या सुनावणीत अचानकपणे एन्ट्रीमुळे सरन्यायाधीशांच्या निर्णयात मोठा बदल झाला आहे. आजची सुनावणी केवळ २ तासांच उरकली.

हरीश साळवे यांचा युक्तिवाद आधीच्या वेळापत्रकात नव्हता. अचानक त्यांनी एन्ट्री केली. आज दोन तासातच कामकाज संपवले कारण आज दिवसभरामध्ये सुनावणी पूर्ण होऊ शकत नव्हती. होळीच्या सुट्टीनंतर आता १६ मार्चला पुन्हा सुनावणी होणार आहे.

SL/KA/SL

2 March 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *