येथे होणार ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
पुणे, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क): वर्धा येथे झालेले ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य होऊन आटोपून जेमतेम दोन महिने उलटले असताना आता ९७ व्या संमेलनाचे स्थळही ठरले आहे. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे होणार आहे. अमळनेर हे ठिकीण साने गुरुजींची कर्मभूमी म्हणून प्रसिद्ध आहे.
साहित्य महामंडळाच्या पुण्यातील बैठकीत आज अमेळनेर हे संमेलनाचे स्थळ निश्चित करण्यात आले आहे. या संमेलनासाठी पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि औदुंबर (जि. सांगली) खानदेशातील जळगाव जिल्ह्यात अमळनेर, तर मराठवाड्यातून जालना जिल्ह्यातील प्रस्ताव होता. यातून अखेर अमळनेरची निवड करण्यात आली.
साने गुरुजींनी शाळेत शिकवत असताना “विद्यार्थी” नावाचे एक मासिक प्रकाशित केले जे विद्यार्थ्यांमध्ये खूप लोकप्रिय झाले. त्यांच्या वाङ्मयीन कर्मभूमीत हे संमेलन ५०च्या दशकानंतर पाहिल्यांदा होत आहे. अमळनेर तालुक्याला साहित्य, संस्कृती, इतिहास, औद्योगिक विकास आणि सामर्थ्य अशी मोठी परंपरा आहे. त्यामुळे साऱ्यांच्या साक्षीने व सहकार्याने अमळनेर मराठी वाङ्मय मंडळ ९७ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची जबाबदारी पेलायला सक्षम आहे. संमेलन नक्कीच यशवी होईल, असा विश्वास अमळनेर, मराठी वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी यांनी व्यक्त केला आहे.
SL/KA/SL
23 April 2023