कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर विधानसभेत गोंधळ

 कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर विधानसभेत गोंधळ

मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात कांदा , हरभरा , सोयाबीन , कापूस, द्राक्ष याचे उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत , सरकारने तातडीने दखल घेतली पाहिजे, नाफेड ला कांदा खरेदी करायला सांगा अशी मागणी अजित पवार यांनी नियम ५७ अन्वये सर्व कामकाज बाजूला ठेऊन यावर चर्चा केली पाहिजे असा स्थगन प्रस्ताव त्यांनी मांडला.

भाजपाच्या राहूल कुल यांनी कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी केंद्राला विनंती करण्याची मागणी केली, छगन भुजबळ यांनी स्थगन ला पाठिंबा दिला , कांदा तुटवडा असणाऱ्या देशात निर्यात करायला परवानगी द्या अशी मागणी केली.

राहूल आहेर यांची प्रती क्विंटल पाचशे रुपये मदत कांदा उत्पादकांना करावी मागणी केली, डबल इंजिन सरकारने तातडीने मदत केली पाहिजे , हरभरा, तूर उत्पादक शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला, सरकार पोलिसांचा दुरुपयोग करीत आहे असा आरोप नाना पटोले यांनी यावेळी केला.

हे शेतकऱ्यांचे सरकार आहे , नाफेड ने कांदा खरेदी सुरू केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. विरोधक यावर असहमत होते , त्यांनी घोषणाबाजी सुरू केली, त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला, मुख्यमंत्री बोलतात ते खरेच आहे, हवे तर हक्कभंग आणा असं आव्हान त्यांनी दिलं.

निर्यातीवर बंदी नाही , सरकार पूर्ण सहकार्य करेल असं मुख्यमंत्री म्हणाले.मात्र विरोधक आक्रमक , जागा सोडून पुढे आले. अध्यक्षांनी या दरम्यान प्रश्नोत्तरे पुकारली, विरोधक आक्रमक झाले , जागा सोडून पुढे आले, गदारोळ झाला, यातच सभागृहात प्रश्नोत्तरे सुरू झाली.

ML/KA/SL

28 Feb. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *