झोपडपट्ट्यांमधून एक नवीन सुरुवात – आता स्वतःच्या पक्क्या घरांमध्ये

मुंबई प्रतिनिधी,
उत्तर मुंबईतील जे झोपडपट्टीवासी अलीकडेच नव्याने पुनर्विकसित फ्लॅट्समध्ये स्थलांतरित झाले आहेत, ते यावर्षीच्या पहिल्या पावसाळ्यात आपले अनुभव सांगत आहेत की त्यांच्या जीवनात कसा मोठा बदल घडून आला आहे. झोपडपट्ट्यांमध्ये दरवर्षी पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या अडचणी – जसे की घरात पाणी शिरणे, छतांमधून गळती, चिखल आणि संसर्ग – आता भूतकाळात जमा झाल्या आहेत.
नवीन पक्क्या घरांमध्ये राहण्यामुळे त्यांना केवळ सुरक्षितता आणि स्थैर्य मिळालेले नाही, तर सन्मान आणि आत्मविश्वासाचा नवा अनुभव मिळाला आहे. बाथरूम, स्वयंपाकघर, स्वच्छ पाणी यांसारख्या मूलभूत सुविधा या घरांमध्ये मिळाल्या आहेत, ज्यामुळे त्यांचा जीवनमान लक्षणीयरीत्या उंचावला आहे.
हे सर्व शक्य झाले आहे उत्तर मुंबईचे लोकसभा खासदार आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, स्थानिक भाजप नेतृत्व, आमदार आणि एसआरए (स्लम पुनर्विकास प्राधिकरण), बीएमसी इत्यादी प्रशासनिक संस्थांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे. अनेक वर्षांपासून रखडलेले स्लम पुनर्विकास प्रकल्प गोयल यांच्या पुढाकारामुळे वेगाने पूर्णत्वास जाऊ लागले आहेत, जेणेकरून उत्तर मुंबईचे ‘उत्तम मुंबई’मध्ये रूपांतर करता येईल.
ही संपूर्ण योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या त्या व्यापक दृष्टिकोनाचा भाग आहे ज्यात प्रत्येक भारतीय कुटुंबाला मूलभूत सुविधा असलेले एक कायमस्वरूपी निवासस्थान देण्याचे उद्दिष्ट आहे – ज्यात स्वच्छता, जलपुरवठा आणि वीज यांसारख्या सुविधा स्वच्छ आणि स्थिर वातावरणात उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

…………………………………………………………
उत्तर मुंबईतील लाभार्थ्यांचे मत:
आता पावसाचा आनंद घेतो!
“आम्ही पूर्वी नदीच्या जवळ राहत होतो, जिथे प्रत्येक पावसाळ्यात पूर यायचा आणि आमच्या घरात पाणी भरायचे. प्रत्येक वर्षी पावसाची भीती वाटायची. पण केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि आमदार योगेश सागर यांच्या प्रयत्नांमुळे आता आम्हाला मुंबईत एक सुरक्षित आणि पक्कं घर मिळालं आहे. आता पाणी आमच्या घरात येत नाही. ही परिस्थिती पूर्वीच्या तुलनेत खूपच चांगली आहे, विशेषतः झोपडपट्ट्यांमध्ये पावसामुळे होणाऱ्या त्रासाच्या तुलनेत.”
— किशोर केणी, रहिवासी, शिवशक्ती एसआरए, कांदिवली (पश्चिम)
झोपडपट्टीतून पक्क्या घरात!
मी लहानपणापासून इथल्या झोपडपट्टीत राहत आलो आहे. परिस्थिती कठीण होती, पण आता आम्हाला एसआरए प्रकल्पातून चांगली, सुरक्षित आणि पक्की घरे मिळाली आहेत. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि आमदार योगेश सागर यांच्या अथक प्रयत्नांमुळे हे शक्य झालं. आज आमच्या घरात प्रशस्त खोल्या आहेत. लहान मुलांसाठी खेळायला भरपूर जागा आहे. आता आमच्याकडे नातेवाईकही आनंदाने भेट देतात. इतकंच नव्हे, तर आमच्या मुलांची लग्नंही ठरू लागली आहेत – कारण आता आमचं स्वतःचं पक्कं घर आहे. यासाठी मी मनापासून पीयूष गोयल आणि योगेश सागर यांचे आभार मानतो. त्यांनी आमचं आयुष्य खरंच बदलून टाकलं आहे.”
— केशन दावनपल्ली, रहिवासी, जय संतोषी माँ एसआरए सोसायटी, कांदिवली (पश्चिम)
वनवास संपला – आता आमचेही पक्के घर आहे!
आधी आम्ही एका छोट्याशा खोलीत राहत होतो. माझे पती आणि तीन मुलांसह इतक्या कमी जागेत राहणं खूप कठीण होतं. चाळीत राहत असताना प्रत्येक पावसाळा आमच्यासाठी संकटासारखा असायचा — घरात पावसाचं पाणी शिरायचं, आणि अनेक रात्री आम्हाला जागून काढाव्या लागायच्या.पण आता आम्हाला जे नवीन घर मिळालं आहे, त्यामुळं असं वाटतं की आमचा ‘वनवास’ संपला आहे. नव्या घरात आम्हाला मोठा हॉल आणि एक सुंदर बेडरूम मिळाली आहे. त्यासोबतच इतर अनेक सुख-सुविधाही उपलब्ध झाल्या आहेत, ज्या पूर्वी केवळ स्वप्न वाटायच्या. हे सगळं शक्य झालं केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि योगेश सागर यांच्या प्रयत्नांमुळे. त्यांच्या मुळे आमचं आयुष्य खरंच बदलून गेलं आहे. यासाठी मी त्यांची मनःपूर्वक आभारी आहे.
— जमुना मथुलापुरम, रहिवासी, जय संतोषी माँ एसआरए सोसायटी, कांदिवली (पश्चिम)
झोपडपट्टीतून सुरक्षिततेकडे – एक नवीन सुरुवात!
“आम्ही झोपडपट्टीत राहत होतो जिथे छत कायमस्वरूपी नव्हतं. पावसाळ्यात पाणी साचायचं आणि संपूर्ण परिसर चिखलात बुडायचा. स्वच्छ पाणी आणि शौचालय यांसारख्या मूलभूत सुविधा नव्हत्याच. पण केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि स्थानिक आमदार मनीषा चौधरी यांच्या प्रयत्नांमुळे आता आम्हाला सुरक्षित आणि पक्क्या घरात जीवन मिळत आहे. आता आम्ही एसआरए योजनेअंतर्गत बांधलेल्या चांगल्या घरात राहतो.”
— अशोक गुप्ता, रहिवासी, जनकल्याण हाउसिंग सोसायटी, एसआरए शांतिनगर, दहिसर (पूर्व). KK/ML/MS