भिवंडीतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी खासदार बाळ्या मामा पुन्हा उतरले रस्त्यावर…

 भिवंडीतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी खासदार बाळ्या मामा पुन्हा उतरले रस्त्यावर…

भिवंडी: भिवंडीतील वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली असून नेहमीच्या वाहतूक कोंडीत प्रवाशांचं वाहन चालकांना तासंतास अटकावे अडकून पडावे लागत असल्याने वाहतूक पोलीस यंत्रणे विरोधात नागरिकांचा रोष वाढला आहे. भिवंडीतील वाहतूक कोंडीची दखल भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार बाळ्या मामा यांनी घेतली असून शुक्रवारी खासदार बाळ्या मामा यांनी पुन्हा मुंबई नाशिक महामार्गावरील मानकोली नाक्यावर उतरून वाहतूक पोलिसांना वाहतूक सुरळीत करण्यासंदर्भात सूचना दिल्या.
नेहमीच्या वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका करण्यासाठी खासदार बाळ्या मामा यांच्या नेतृत्वाखाली मानकोली येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकी प्रसंगी वाहतूक पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांबरोबरच सार्वजनिक बांधकाम विभाग व राज्य महामार्गाचे अधिकारी उपस्थित होते.
भिवंडी शहर व ग्रामीण भागात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या मोठ्या वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर आज भिवंडी मानकोली येथे महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले.या बैठकीत सध्याच्या स्थितीत निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीचा आढावा घेण्यात आला, तसेच उपाययोजना सुचविण्यात आल्या असून वाहतूक कोंडी सोडविणे व रस्त्याची अर्धवट कामे मार्गी लावण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत अशी प्रतिक्रिया खासदार बाळ्या मामा यांनी दिली आहे.

AG/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *