नारायण सेवा संस्थानतर्फे मुंबईत ४१९ दिव्यांगांना विनामूल्य कृत्रिम हात-पाय वितरित

मुंबई: दिव्यांग आणि मानवसेवेसाठी प्रसिद्ध असलेल्या उदयपूरच्या नारायण सेवा संस्थानतर्फे मुंबईतील दिव्यांग बांधवांसाठी रविवार, ८ जून २०२५ रोजी विनामूल्य नारायण लिम्ब आणि कॅलिपर्स फिटमेंट शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर निको हॉल, वडाळा उद्योग भवनाजवळ, दादर पूर्व, मुंबई येथे भरविण्यात आले होते. पूर्वनिवड करण्यात आलेल्या दिव्यांगांना या शिबिराचा लाभ देण्यात आला.
संस्थेच्या मुंबई शाखेचे अध्यक्ष महेश अग्रवाल यांनी सांगितले की, संस्थान मागील ४० वर्षांपासून विविध राज्यांतील दिव्यांग बांधवांना त्यांच्या घराजवळ सेवांचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्नशील आहे. याच उपक्रमांतर्गत २३ मार्च रोजी मुंबईत विनामूल्य नारायण लिम्ब मापन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात ५०० हून अधिक दिव्यांग सहभागी झाले होते. त्यापैकी ४१९ जणांना रस्ते अपघात किंवा इतर दुर्घटनांमुळे हात-पाय गमावावे लागले होते. त्यांची निवड करून त्यांचे मापन व साच्यांचे काम करण्यात आले.
या विनामूल्य कृत्रिम हात-पाय वितरण शिबिरात मुंबईतील अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी संस्थेचे संस्थापक पद्मश्री कैलाश मानव यांची नात संस्थेच्या डायरेक्टर पलक अग्रवाल आणि महर्षी अग्रवाल यांची विशेष उपस्थिती होती. कथावाचिका यति किशोरी आणि टाटा कंपनीचे प्रतिनिधी स्वयंसेवक म्हणून सहभागी झाले. महीम जैन यांनी मंच संचालन करत उपस्थितांचे मनोरंजन केले. अनेक उद्योगपतींनी उदयपूरमध्ये निर्माण होणाऱ्या हॉस्पिटलसाठी देणगी दिली. सर्व उपस्थित अतिथींना साफा, पगडी आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.
या शिबिरात दिव्यांगांना विनामूल्य कृत्रिम हात-पाय देण्यात आले, तसेच फिजिओथेरपिस्टच्या टीमकडून त्यांचा वापर कसा करावा हे बारकाईने शिकविण्यात आले. शिबिराचे यश हे उत्कृष्ट व्यवस्थापन हे मुख्य वैशिष्ट्य होते, जेणेकरून कोणत्याही दिव्यांग किंवा त्यांच्या कुटुंबीयांना गैरसोयीचा सामना करावा लागू नये.
कार्यक्रमात महेश अग्रवाल, शिबिरप्रमुख हरीप्रसाद लढ्ढा, स्थानिक आश्रम प्रमुख ललित लोहार, रमेश शर्मा, रमेश मनेरिया, आनंदसिंह सोलंकी (मुंबई इन्चार्ज), मुकेश सैन (भायंदर इन्चार्ज), महेंद्र जाटव यांच्यासह अनेक संस्थेचे सदस्य आणि उद्योगपती, समाजसेवक उपस्थित होते.
महेश अग्रवाल यांनी सांगितले की नारायण सेवा संस्थान भारतासह केनिया, युगांडा, मेरु, टांझानिया, नेपाळ यांसारख्या परदेशांमध्येही शिबिरे घेत आहे. दर महिन्याला सुमारे १५०० दिव्यांगांना कृत्रिम हात-पाय बसवले जातात. त्यांना चालण्याचे व्यवस्थित प्रशिक्षण दिले जाते. या कार्यासाठी ४० सदस्यांची विशेष टीम कार्यरत आहे.
उदयपूरमधील संस्थेच्या मुख्यालयात कृत्रिम अंगांव्यतिरिक्त मूत्रपिंड, हृदय प्रत्यारोपण यांसारख्या वैद्यकीय सेवा, गरिब मुलांसाठी इंग्रजी माध्यमातील नारायण अकॅडमिक स्कूल, तसेच सिलाई, कॉम्प्युटर अशा कौशल्य प्रशिक्षणाच्या सुविधा दिल्या जातात. त्यांना रोजगारासाठी मदत केली जाते. दरवर्षी दोन वेळा सामूहिक विवाह सोहळे, तसेच स्पोर्ट्स, फॅशन शो यांसारख्या स्पर्धांचे आयोजन केले जाते, जेणेकरून दिव्यांगांचे आत्मनिर्भर जीवन घडवता येईल.
रविवारी झालेल्या शिबिरात आधीपासून लाभ घेतलेल्या आणि नव्याने लाभ घेतलेल्या दिव्यांगांची उपस्थिती होती. त्यांचे अनुभव सर्वांसमोर मांडले गेले.
आपल्या माहितीसाठी, नारायण सेवा संस्थान १९८५ पासून ‘नर सेवा-नारायण सेवा’ या भावनेने कार्यरत आहे. संस्थापक कैलाश मानव यांना राष्ट्रपतींकडून पद्मश्री पुरस्कार देण्यात आला आहे. ३० मे २०२५ रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांना सामुदायिक सेवा आणि सामाजिक उत्थान या श्रेणीत सन्मानित केले. संस्थेचे अध्यक्ष प्रशांत अग्रवाल यांनी वैद्यकीय, शिक्षण, कौशल्यविकास आणि क्रीडा अकादमीद्वारे लाखो दिव्यांगांना मानसिक, शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करून मुख्य प्रवाहात आणले आहे.
संस्था आजवर ४०,००० हून अधिक कृत्रिम अंगांची स्थापना कर चुकी आहे. आता संस्था मुंबईतील दिव्यांगांना नवजीवन देण्यासाठी मोठ्या प्रमाणात कार्य करत आहे.