राज्य सरकारचा निर्णय: पंढरपूर वारीसाठी वारकऱ्यांना टोल माफी

 राज्य सरकारचा निर्णय: पंढरपूर वारीसाठी वारकऱ्यांना टोल माफी

पंढरपूरच्या विठोबा मंदिरात जाणाऱ्या वारकऱ्यांना राज्य सरकारने मोठी सवलत दिली आहे. वारकऱ्यांना आणि त्यांच्या वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हा निर्णय वारकऱ्यांच्या सुविधेसाठी आणि त्यांचा प्रवास सुलभ करण्यासाठी घेतला आहे. वारी दरम्यान लाखो भाविक पंढरपूरला जातात, ज्यामुळे रस्त्यांवर मोठी गर्दी होते.

वारकऱ्यांना टोलनाक्यावर आरटीओने दिलेला पास, स्टीकर दाखवावा लागणार आहे. यानंतरच वाहन सोडले जाणार आहे. या पास, स्टीकरशिवाय वारकऱ्यांना टोलमाफी मिळणार नाही. टोल माफीमुळे त्यांच्या आर्थिक भारात कमी होईल आणि वारीचा आनंद द्विगुणीत होईल. सरकारच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे. वारकऱ्यांची सुरक्षा आणि सोयीसुविधांची देखभाल करण्यासाठीही अतिरिक्त उपाययोजना करण्यात येणार आहेत. वारकऱ्यांचा उत्साह आणि भक्तीभाव वारी दरम्यान ओसंडून वाहणार आहे. पंढरपूरची वारी ही महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक परंपरा आहे आणि ती यापुढेही अशीच कायम राहावी हीच सदिच्छा.१७ जुलै रोजी आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरातून लाखो भाविक पंढपूरला जात असतात. या सर्व वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *