राज्यभरात स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव रथयात्रा

 राज्यभरात स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव रथयात्रा

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी राहुल गांधी यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर भाजप शिवसेना युती सरकारने संपूर्ण राज्यात स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार असल्याचे जाहीर केले त्यानुसार आज संपूर्ण राज्यभरात या गौरव यात्रेला सुरुवात झाली.

ठाणे येथे आज मुख्य एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली तर नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे देशासाठी योगदान मोठे असून त्यांचे विचार व कार्य सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवावे, स्वातंत्र्यवीर सावरकर हे प्रखर राष्ट्राभिमानी होते. सावरकर हे घराघरात पोहचण्यासाठी हा प्रयत्न असून नव्या पिढीला सावरकर समजावे, समाजा पर्यंत सावरकर पोहचावा या उद्देशाने या रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.Independence hero Savarkar Gaurav Rath Yatra across the state

राज्यातील सहा प्रमुख महसूल विभागांसह, प्रत्येक जिल्ह्यात आणि विधानसभा मतदारसंघात ही गौरव यात्रा विविध भागातून काढण्यात आली. ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेत नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. खासदार राहुल गांधी यांनी सावरकरांविषयी केलेल्या वक्तव्याचा आम्ही निषेध करीत असल्याची प्रतिक्रिया नेत्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

ML/KA/PGB
2 Apr. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *