कापड निर्यातदारांचे अडकले चार हजार कोटी रुपये

 कापड निर्यातदारांचे अडकले चार हजार कोटी रुपये

नवी दिल्ली, दि.7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वीस वर्षांनंतर तालिबानने पुन्हा अफगाणिस्तानवर (Afghanistan) कब्जा केल्यामुळे दहशतीचे वातावरण आहे. याचा थेट परिणाम भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील व्यापारावर झाला आहे. दोन्ही देशांमधील व्यापारी संबंध शतकानुशतके जुने आहेत. यामुळे सुरतचे कापड व्यापारीही (textile merchants) खूपच त्रस्त झाले आहेत. याचे कारण अफगाणिस्तानात त्यांची सुमारे 4,000 कोटी रुपयांची देयके अडकली आहेत.
फेडरेशन ऑफ सूरत टेक्सटाईल ट्रेडर्स असोसिएशनचे सरचिटणीस चंपालाल बोथरा यांनी सांगितले की, ते आधी दुबईमार्गे अफगाणिस्तानला (Afghanistan) कपडे पाठवायचे. परंतू नंतर असे दिसले की बांगलादेशातून निर्यात स्वस्त आहे, म्हणून त्यांनी बांगलादेशमार्गे त्याठिकाणी माल पाठवायला सुरुवात केली. तूर्तास निर्यात थांबली आहे. कापड व्यापार्‍यांचे (textile merchants) 4,000 कोटी रुपये अडकले आहेत आणि देयकाबद्दलही काहीही माहिती नाही.

वाट पहाण्यास सांगण्यात आले आहे
Has been told to wait

भारतातून अफगाणिस्तानात (Afghanistan) कपड्यांव्यतिरिक्त, पगडीसाठी रेशमी आणि स्कार्फ, ड्रेस आणि कफ्तान सारखे तयार कपडे पाठवले जातात. आयात आणि निर्यातदारांना फेडरेशन ऑफ इंडिया एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनने वाट पहाण्यास सांगितले आहे. सूरतच्या कापड व्यवसायाची (Textile business) स्थिती साथीच्या आजारामुळे आधीच खराब आहे. उत्पादन कमी झाल्यामुळे मागणी पूर्णपणे स्थिरावलेली नाही. अफगाणिस्तानच्या सेंट्रल बँकेने व्यापारी बँकांना बँक खातेदारांना पैसे काढणे किंवा देशात आणि देशाबाहेर इलेक्ट्रॉनिक व्यवहार करण्याची परवानगी देऊ नये असे सांगितले आहे.

2020-21 मध्ये दोन्ही देशांमध्ये 10,387 कोटी रुपयांचा व्यापार झाला
In 2020-21, trade between the two countries stood at Rs 10,387 crore

भारत अफगाणिस्तानमधून (Afghanistan) मनुका, अक्रोड, बदाम, अंजीर, पिस्ता, सुके जर्दाळू सारख्या सुक्यामेव्याची आयात (Import) करतो. याव्यतिरिक्त त्याठिकाणाहून डाळिंब, सफरचंद, चेरी, टरबूज, हिंग, जिरे आणि केशर देखील आयात केले जाते. 2020-21 या आर्थिक वर्षात दोन्ही देशांमध्ये 1.4 अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे 10,387 कोटी रुपयांचा व्यापार झाला होता. त्याआधी, 2019-20 या आर्थिक वर्षात दोन्ही देशांमध्ये 1.5 अब्ज डॉलर्सचा म्हणजेच सुमारे 11,131 कोटी रुपयांचा व्यापार झाला होता. 2020-21 मध्ये भारताने अफगाणिस्तानला सुमारे 6,129 कोटी रुपयांची उत्पादने निर्यात केली, तर भारताने 3783 कोटी रुपयांची उत्पादने आयात केली.
 
There is an atmosphere of terror as the Taliban retake Afghanistan after 20 years. This has had a direct impact on trade between India and Afghanistan. Trade relations between the two countries are centuries old. This has also affected the textile traders of Surat. This is because their payments in Afghanistan are stuck at around Rs 4,000 crore.
PL/KA/PL/07 SEPT 2021
 

mmc

Related post