मुंब्रा-दिवा स्टेशन दरम्यान भीषण अपघात, ८ प्रवाशांचा मृत्यू

 मुंब्रा-दिवा स्टेशन दरम्यान भीषण अपघात, ८ प्रवाशांचा मृत्यू

मध्य रेल्वेवरील मुंब्रा स्थानकाजवळ आज (9 जून) सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास भयंकर रेल्वे दुर्घटना (mumbai local train accident) घडली. दोन लोकल गाड्या एकमेकांजवळून जाताना लटकलेले प्रवासी घासले गेले. यामुळे 8 प्रवाशी रेल्वे ट्रॅकवर पडले. या घटनेत आतापर्यंत 8 प्रवाशांचा मृ्त्यू झाल्याची माहिती मिळत आहे. परंतु मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. जखमी प्रवाशांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. सदर अपघात झाला तेव्हा सुरुवातीला पुष्पक एक्सप्रेसमधून प्रवाशी खाली पडल्याची माहिती सांगण्यात येत होती. मात्र पुष्पक एक्सप्रेसचा काहीही संबंध नसल्याची माहिती मध्य रेल्वेचे माहिती अधिकारी स्वप्नील निला यांनी दिली.

रेल्वेचे काही महत्त्वाचे निर्णय

मुंबई उपनगरासाठी उत्पादन सुरू असलेल्या सर्व रेकमध्ये ऑटोमॅटिक डोअर क्लोजर सुविधा असतील. मुंबई उपनगरातील या रेकमध्ये सेवेत असलेल्या सर्व रेकची पुनर्रचना केली जाईल आणि दरवाजे बंद करण्याची सुविधा दिली जाईल, असं मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. कार्यालयांना देखील विनंती केली होती की, वेळेचे फरक केले तर चांगलं होईल. काहींना आपण स्टॅगर्ट टाइमिंगसाठी कार्यालयांची विनंती आपण केली होती. ज्यात सकाळी १०, १०:३०, ११ अशी कार्यालयीन वेळ केली तर अडचण येणार नाही.

*ठाणे महानगरपालिका, ठाणे**छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा**एकूण दाखल रुग्ण – १०* (८ पुरुष, २ महिला)*मृत – ०१* (पुरुष)*गंभीर जखमी – ०२* (पुरुष), ( मेंदूशी निगडित तातडीची शस्त्रक्रिया आवश्यक असल्याने तत्काळ जुपिटर हॉस्पिटल येथे हलवण्यात येत आहे.)*प्रकृती स्थिर – ०७* ( ०५ पुरुष, २ महिला)(सर्व सातही रुग्ण स्थिर असून अतिदक्षता कक्ष येथे दाखल करण्यात येत आहे.)ही माहिती डॉ. राकेश बारोट, डीन, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा यांनी दिली आहे.रुग्णालयात, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव आणि इतर वरिष्ठ अधिकारी रुग्ण व्यवस्थेवर लक्ष ठेवून आहेत.-

*माहिती व जनसंपर्क विभाग*

दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान लोकलमधून एकूण 8 प्रवासी खाली पडून झालेल्या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.जखमींना तातडीने शिवाजी हॉस्पिटल आणि ठाणे सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. स्थानिक प्रशासन समन्वय साधून आहे. जखमींना लवकर आराम मिळावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.ही घटना नेमकी कशामुळे घडली, याची चौकशी रेल्वे विभागाने सुरू केली आहे.- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Mumbai #Maharashtra

“मध्य रेल्वेमार्गावर कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या उपनगरी रेल्वेगाडीतून पडून प्रवाशांचा झालेला मृत्यू दूर्दैवी, क्लेशदायक आहे. रेल्वे प्रवाशांच्या मृत्यूनं उपनगरी रेल्वेवरील गर्दी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्याकडे अधिक गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज अधोरेखीत झाली आहे. उपनगरीय रेल्वेसेवा अधिक प्रभावी आणि सुरक्षित करण्यासाठी रेल्वे प्रशासन लवकरात लवकर ठोस पावलं उचलेल, असा विश्वास आहे. अपघातात जखमी प्रवाशांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना करतो. मृत्यू पावलेल्या प्रवाशांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असून दिवंगत प्रवाशांना दु:खद अंतकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मध्यरेल्वेवर कोपर ते दिवा स्थानकादरम्यान झालेल्या रेल्वे अपघाताबद्दल दु:ख व्यक्त करुन दिवंगत प्रवाशांना श्रद्धांजली वाहिली आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *