पाकिस्तानातील 3 कोटी नागरिकांवर ओढवणार जलसंकट

पहलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार निलंबित करण्याचा निर्णय घेतला आणि पाकिस्तानकडे जाणारे चिनाब नदीचे पाणी रोखले आहे. भारताने बगलीहार धरणातून चिनाब नदीचे पाणी थांबवल्याचा मोठा परिणाम पाकिस्तानच्या जलपुरवठ्यावर दिसू लागला असून सियालकोटमध्ये चिनाब नदीची पाण्याची पातळी सोमवारी १५ फूटांपर्यंत खाली गेली, जी मागील दिवसाच्या तुलनेत ७ फूटांनी कमी आहे.
पंजाबमधील २४ महत्त्वाच्या शहरांमध्ये पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता असून पुढील काही दिवसांत ३ कोटीहून अधिक नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा तुटवडा जाणवू शकतो. फैसलाबाद आणि हाफिजाबादसारख्या मोठ्या शहरांमधील ८०% लोकसंख्या चिनाब नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे, त्यामुळे या निर्णयाचा गंभीर परिणाम या भागातील नागरिकांवर होऊ शकतो.
भारताच्या या निर्णयामुळे पाकिस्तानच्या कृषी क्षेत्रावरही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. सिंधू जल प्राधिकरणाच्या अंदाजानुसार खरीप हंगामासाठी २१% पाणी तुडवडा होईल. ज्यामुळे अन्नधान्य उत्पादन घटू शकते. पाकिस्तानच्या संसदेने भारताच्या या कृतीला ‘युद्ध पुकारण्यासारखे कृत्य’ म्हणून घोषित केले आहे आणि या निर्णयावर आंतरराष्ट्रीय पातळीवर चिंता व्यक्त केली जात आहे.
#PakistanWaterCrisis #WaterScarcity #ClimateChangeImpact #IndusRiver #WaterShortage #EnvironmentalCrisis #SaveWater #Drought2025 #WaterManagement #AgricultureCrisis #IndiaPakistanConflict #GlobalWaterCrisis #WaterConservation #EmergencyResponse #SustainableFuture #EcoAwareness