बीडच्या शेतकऱ्याची केळी इराणला पोहोचली

बीड, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शेतकऱ्यांनी ठरवले तर काय करू शकतात हे या यशोगथेतून समजते. दुष्काळी ओळख असलेल्या बीड जिल्ह्यातील शेतकरी नवनवीन उपक्रम राबवत आहेत. त्यातून त्यांना भरघोस उत्पन्नाची हमी मिळत आहे. आष्टी तालुक्यातील भातोडी येथील युवा शेतकरी शंकर रामदास गिते यांनी कमी कालावधीचे असलेले केळी हे पीक घेऊन थेट इराणला पाठवले आहे.
आष्टी तालुक्यातील भातोडी येथील शेतकरी शंकर रामदास गिते यांनी पारंपरिक शेतीला फाटा देऊन आणि कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेत आपल्या पाच एकर क्षेत्रावर केळीची बाग फुलवली. या पाच एकर क्षेत्रावर सात हजार दोनशे पन्नास केळीच्या झाडाची लागवड केली आहे. यासाठी त्यांनी शासकीय योजनांचा लाभ घेतला आहे.
अवघ्या नऊ महिन्याचे हे पीक असून यासाठी त्यांनी एकूण 30 टक्के पाण्यावर हे पिक घेतले आहे आहे. यासाठी त्यांना आतापर्यंत पाच लाख खर्च आला आहे. यातून त्यांनी 25 लाख अधिक रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. पाण्याच्या नियोजनासाठी त्यांनी शेत तलाव केला आहे. यातून ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाणी देण्याचे नियोजन केले. या साठी शासनाच्या सोलर योजनेचा त्यांना फायदा झाला. पहिल्याच वर्षी अवघ्या नउ महिन्यात 25 लाख रुपये नफा त्यांना झाला.
गीते यांनी फळबाग योजनासह सोलर विजेचा फायदा झाला.
शासनाच्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना झाल्यास शेतकऱ्यांची प्रगती होऊ शकते हे यातून दिसून येत आहे. गीते यांना यामधून सरासरी 175 टन केळीचे उत्पादन मिळाले आहे. G9 जातीची ही केळी असून त्याची लागवड योग्य पद्धतीने केल्यामुळे त्याची थेट इराण देशात विक्री केली जात आहे. निर्यात क्षम केळी असल्याने त्यांना चांगली मागणी होत आहे.
ML/ML/SL
24 Jan. 2025