मालवणमध्ये राबवण्यात आली समुद्रतळ स्वच्छता मोहीम

सिंधुदुर्ग, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातली पहिली समुद्रतळ स्वच्छता मोहीम असल्याचा दावा करण्यात येत असलेली समुद्रतळ स्वच्छता मोहीम मालवणच्या किनाऱ्यावर राबविण्यात आली आहे.यात सुमारे २५० किलो कचरा बाहेर काढण्यात यश आले आहे, यात वनशक्तीसह इतर संस्थांचा सहभाग होता
सागरी परिसंस्थेचे जतन करण्याच्या हेतूने वनशक्ती संस्थेतर्फे सिंधुदुर्ग जिल्हयात मालवण मध्ये बुधवारी समुद्रतळ स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. अशा प्रकारची भारतातली पहिली मोहीम असल्याचा दावा वनशक्ती संस्थेचे संचालक पर्यावरणतज्ज्ञ डॉ. स्टॅलिन दयानंद यांनी केला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, भारतीय मत्स्य सर्वेक्षण, मुंबई, नीलक्रांती संस्था आणि युथ बीट फॉर एनव्हारमेंट यांच्या सहकार्यान हि मोहीम राबविण्यात आली.
स्थानिक स्वयंसेवक, पर्यावरणवादी आणि सागरी तज्ज्ञांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे समुद्रतळातून २५० किलोग्रॅमपेक्षा जास्त जैवविघटनशील नसलेला कचरा काढण्यात आला. सागरी परिसंस्थांच्या आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या प्लास्टिक प्रदूषण आणि इतर कचरा सामग्रीच्या वाढत्या धोक्याचा सामना करण्यावर या मोहिमेन लक्ष केंद्रित केल. स्कुबा डायव्हर्सच्या पथकांनी पाण्याच्या पृष्ठभागाखालील प्लास्टिक, मासेमारीच्या जाळ्या, बाटल्या आणि कालांतराने जमा झालेले इतर हानिकारक अवशेष गोळा केले.
म्हणूनच समृद्ध जैवविविधता आणि स्वच्छ किनाऱ्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या सिंधुदुर्गातल्या या सागरी परिसंस्थेच संरक्षण करण्याच्या उपक्रमांमध्ये ही स्वच्छ्ता मोहीम अत्यंत महत्वाची ठरली आहे. सागरी अधिवासांचे जतन करण आणि प्लास्टिक प्रदूषणाच्या धोक्यांविषयी जागरूकता वाढवण या दोन्हींच्या महत्त्वावर या मोहिमे दरम्यान भर देण्यात आला. त्याच बरोबर या मोहिमेमुळे यामुळे देशभरातील अनेक संस्थांना आणि संघटनांना प्रेरणा मिळेल असं यावेळी वनशक्तीचे दयानंद स्टॅलिन यांनी यावेळी बोलताना सांगितले.
या मोहिमेत वरिष्ठ शास्त्रज्ञ अशोक कदम, रविंद्र मालवणकर, यूएनइपी चे को ऑर्डिनेटर रोहित सावंत, MPCB चे आर ओ जयवंत हजारे, एसआरओ प्रमोद माने, नीलक्रांती संस्थेचे रविकिरण तोरसकर, रुपेश प्रभू आदी सहभागी झाले होते.
ML/ML/SL
28 Nov. 2024