चला अरबी समुद्रातील शिवस्मारक शोधायला…

 चला अरबी समुद्रातील शिवस्मारक शोधायला…

मुंबई दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  २०१४ नंतर राज्यात आलेल्या भाजपा – शिवसेना महायुती सरकारच्या काळात राज्यभरात झालेल्या मराठा क्रांती मोर्चानंतर मराठा समाजाची मागणी लक्षात घेता शिवस्मारक उभारणी बाबत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पुढाकार घेतला. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २४ डिसेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय शिवस्मारक कामाचे जलपूजन करण्यात आले. या जलपूजन सोहळ्याला कोट्यवधी रुपयांच्या खर्च करण्यात आला.

मात्र आज तब्बल ८ वर्षानंतर देखील या आंतरराष्ट्रीय शिवस्मारकाचे काम सुरू देखील झालेले नाहीत. सुरू न झालेल्या कामावर देखील काही कोटी रुपये खर्च झालेले आहेत. मुंबई महानगरपालिके
सारख्या निवडणुकीतील यशासाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने शिवभक्तांच्या भावनेशी खेळ केला. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहे, त्यांच्या नावावर राजकारण करणे हे कोणत्याही शिवभक्ताला कधीही मान्य होणार नाही.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमचा सांगणे आहे की आपण देशाचे पंतप्रधान आहात, आपला पदाची गरिमा खूप मोठी आहे. एखाद्या महापालिकेच्या निवडणुकीत यश मिळावे म्हणून आपल्या हातून महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांची फसवणूक करून भारतासारख्या महान देशाच्या पंतप्रधान पदाची गरिमा घालविण्याचे काम आपण करू नये. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सारख्या दैवताचे स्मारक उभारणी करण्याचे खोटे – खोटे नाटक करून शिवभक्तांच्या भावनेशी पंतप्रधान पदावर बसलेल्या व्यक्तीने करणे हा राजद्रोह आहे अशी भूमिका महाराष्ट्र स्वराज्य पक्षाने घेतली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने २०१६ मध्ये आंतरराष्ट्रीय स्मारकाचे जलपूजन करण्यात आले होते. यानंतर ८ वर्षांच्या या कार्यकाळात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील , शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीचे सरकार देखील सत्तेवर होते. मात्र या सरकारच्या अडीच वर्षांच्या कालावधीत देखील आंतरराष्ट्रीय शिवस्मारकाच्या कामात काहीही प्रगती झाली नाही. २०२२ मध्ये राज्यात आलेल्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये देखील आंतरराष्ट्रीय शिवस्मारकाच्या कामात काहीही प्रगती झाली नाही.
हा संपूर्ण घटनाक्रम पहिला तर लक्षात येते की भारतीय जनता पक्ष, शिवसेना (दोन्ही गट), राष्ट्रवादी काँग्रेस (दोन्ही गट) आणि काँग्रेस अशा सर्वच पक्षांनी आंतरराष्ट्रीय शिवस्मारक प्रकल्प पुढे नेण्यासाठी काहीही पाऊल टाकलेले नाही. हे सर्वच राजकीय पक्ष फक्त शिवभक्तांच्या भावनेशी खेळतात, यांना फक्त शिवभक्तांची मते पाहिजे असे पक्षाने म्हटले आहे.

या सर्वांचे खरे रूप पुढे आणणे तसेच महाराष्ट्रातील सर्व शिवभक्तांची भावना म्हणजे मुंबई मध्ये अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभा रहावे या मुद्याकडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न म्हणून स्वराज्य पक्षाचे प्रमुख युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील शिवभक्त अरबी समुद्रात शिवस्मारक शोधायला जाणार आहेत. ६ ऑक्टोबर २०२४ रोजीचा वेळापत्रक खालीलप्रमाणे :

सकाळी ६.३० वा.
स्वराज्य भवन, शिवाजीनगर पुणे येथून स्वराज्य पक्षप्रमुख छत्रपती संभाजीराजे सर्व शिवभक्तांसह चार चाकी वाहन रॅलीने मुंबई च्या दिशेने रवाना

सकाळी ८.३० वा.
डी. वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई येथे पुणे, नाशिक, मुंबई तथा महाराष्ट्रातील सर्व शिवभक्तांसह एकत्रित मुंबई च्या दिशेने रवाना

सकाळी ९ वा.
चेंबूर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण

सकाळी १० वा.
गेट वे ऑफ इंडिया येथे आगमन आणि सर्व शिवभक्तांसह शिवस्मारकाचा शोध घेण्यासाठी अरबी समुद्रात बोटीने रवाना

रॅली मार्ग :
स्वराज्य भवन, पुणे – विद्यापीठ चौक – मुकाई चौक, रावेत, नवीन एक्स्प्रेसवे मार्गे लोणावळा – नवी मुंबई – चेंबूर – इस्टर्न फ्री वे मार्गे मुंबई – गेट वे ऑफ इंडिया

ML/ML/SL

5 Oct. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *