राधानगरी धरणातून 1300 क्युसेक विसर्ग , २७ बंधारे पाण्याखाली

राधानगरी धरणातून 1300 क्युसेक विसर्ग , २७ बंधारे पाण्याखाली
कोल्हापूर, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 4.21 टीएमसी पाणीसाठा आहे. राधानगरी धरणातून 1300 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड आणि रुकडी, ताम्रपर्णी नदीवरील- कुर्तनवाडी, चंदगड तसेच हल्लारवाडी, वेदगंगा नदीवरील- कुरणी, बस्तवडे तसेच चिखली, हिरण्यकेशी नदीवरील – साळगांव, दुधगंगा नदीवरील- दत्तवाड, कासारी नदीवरील- येवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे आणि वालोली, वारणा नदीवरील -चिंचोली असे एकूण 27 बंधारे पाण्याखाली आहेत.
सध्या जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. राधानगरी 4.21 टीएमसी, तुळशी 1.86 टीएमसी, वारणा 18.23 टीएमसी, दूधगंगा 9.88 टीएमसी, कासारी 1.50 टीएमसी, कडवी 1.77 टीएमसी, कुंभी 1.22 टीएमसी, पाटगाव 2.55 टीएमसी, चिकोत्रा 0.59 टीएमसी, चित्री 1.20 टीएमसी, जंगमहट्टी 1.06 टीएमसी, घटप्रभा 1.56 टीएमसी, जांबरे 0.82 टीएमसी, आंबेआहोळ 1.03 टीएमसी, सर्फनाला 0.25 टीएमसी आणि कोदे लघु प्रकल्प 0.21 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.
तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 18.1 फूट, सुर्वे 19.6 फूट, रुई 45.9 फूट, इचलकरंजी 42 फूट, तेरवाड 40 फूट, शिरोळ 31.6 फूट, नृसिंहवाडी 25 फूट, राजापूर 13.6 फूट तर नजीकच्या सांगली 7.9 फूट व अंकली 8.5 फूट अशी आहे. 1300 cusec discharge from Radhanagari dam, 27 dams under water
ML/ML/PGB
14 July 2024