विश्वविजेता भारतीय क्रिकेट संघ उद्या परतोय मायदेशी, जाणून घ्या ग्रॅण्ड सेलिब्रेशनचे वेळापत्रक

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : द.आफ्रिकेला हरवून विश्वकप क्रिकेट T 20 कप जिंकणारी टिम इंडीया उद्या भारतात दाखल होत आहे. बार्बारोसामध्ये आलेल्या वादळामुळे भारतीय संघाला तिथे तीन दिवस थांबावे लागले होते. उद्या परतणाऱ्या क्रिकेट संघाच्या स्वागतासाठी जंगी तयारी करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंदी मोदी टीम इंडीयाची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन करणार आहेत.
भारताचा संघ गुरुवारी पहाटे नवी दिल्लीत उतरेल. त्यानंतर थोडा काळ ते हॉटेलमध्ये आराम करतील. त्यानंतर ते सकाळी ११ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटतील. पंतप्रधानांची भेट घेतल्यावर भारतीय संध दिल्लीच्या विमानतळावर जाईल आणि तिथून ते मुंबईला निघतील. भारतीय संघ मुंबईला साधारण दुपारी ४.०० वाजता उतरेल. त्यानंतर भारतीय संघाला थेट नरिमन पॉइंट येथे नेण्यात येणार आहे. तिथून मुंबईतीलि सेलिब्रेशनला सुरुवात होणार आहे.
भारतीय संघ साधारण संध्याकाळी ५.०० वाजता नरिमन पॉइंटला पोहोचेल. तिथे एक ओपन बस त्यांचे स्वागत करत असेल. २००७ साली जेव्हा भारताने टी २० वर्ल्ड कप जिंकला होता तेव्हा निलांबरी नावाची बस खेळाडूंसाठी देण्यात आली होती. त्यामुळे आता अशीच एक खास बस भारतीय संघाला देण्यात येईल. या बसवर भारताच्या खेळाडूंची चित्रं असतील. ही बस नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम इथपर्यंत जाणार आहे. हे अंतर १ किलो मीटर एवढे आहे. पण चाहत्यांची गर्दी पाहता साधारण एक ते दीड तास या बसला नरिमन पॉइंटहून वानखेडे स्टेडियमला जायला लागेल. वानखेडे स्टेडियमपर्यंत बसने प्रवास केल्यावर भारतीय खेळाडू थोडी विश्रांती घेतील. त्यानंतर वानखेडे स्टेडियममध्ये खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
वानखेडे स्टेडियमवर एक भव्य व्यासपीठ उभारले जाईल. त्या व्यासपीठासमोर भारताचे वर्ल्ड कप विजेते खेळाडू यांना बसवले जाईल. त्याचबरोबर भारताचे माजी खेळाडू आणि बीसीसीआयचे अधिकारीही यावेळी तिथे असतील. त्यानंतर या कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि खेळाडूंचा सत्कार यावेळी केला जाईल.
SL/ML/SL
3 July 2024