रोहित वेमुला दलित नव्हताच, खोट्या दाखल्यामुळे केली आत्महत्या…

हैदराबाद, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तेलंगणा पोलिसांनी आज रोहीत वेमुला मृत्यू प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करत ही केस बंद केली आहे. रोहीत दलित नव्हता.त्यांची खरी जात उघड होईल या भीतीने त्याने आत्महत्या केली होती असा दावा तेलंगणा पोलिसांनी केला आहे. पोलिसांचा हा दावा हास्यास्पद असल्याची टिका रोहीतच्या भावाने केली आहे.
रोहीत वेमुलाचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा दावा पोलिसांनी केला असून पुराव्याअभावी खटला बंद करण्यात आला आहे. सिकंदराबादचे तत्कालीन खासदार बंडारू दत्तात्रेय, एमएलसी एन. रामचंदर राव आणि हैदराबाद विद्यापीठाचे कुलगुरू अप्पा राव, केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नेत्यांसह आरोपींनाही पोलिसांनी क्लीन चिट दिली. दरम्यान तेलंगणा उच्च न्यायालयाने आता वेमुला कुटुंबाला निषेध याचिकेच्या स्वरूपात कनिष्ठ न्यायालयात दाद मागण्यास सांगितले आहे.
रोहित वेमुला या हैदराबाद विद्यापीठ, तेलंगणा येथे पीएचडीचे करणाऱ्या विद्यार्थ्यांने 17 जानेवारी 2016 रोजी आत्महत्या केली होती. रोहीत हा दलित विद्यार्ती होता. विद्यापीठाने २०१५ पासून त्याचे मासिक शिष्यवृत्ती वेतन देणे बंद केले होते. त्याच्या मित्रांनी आरोप केला की, त्याला आंबेडकरी चळवळीतील विद्यार्थ्यांच्या बॅनरखाली कॅम्पसमध्ये समस्या मांडण्यासाठी लक्ष्य करण्यात आले होते.
SL/ML/SL
3 May 2024