७० बंधारे पाण्याखाली, दोनशेहून अधिक गावांचा थेट संपर्क तुटला

 ७० बंधारे पाण्याखाली, दोनशेहून अधिक गावांचा थेट संपर्क तुटला

कोल्हापूर, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात काल दिवसभर पावसाचा जोर काहीसा कमी झाला होता मात्र रात्रीपासून आज सकाळपर्यंत संततधार सुरू आहे . गगनबावडा चंदगड आजरा तालुक्यात अजून मधून जोरदार सरी कोसळत असल्यानं नद्यांच्या पाणी पातळीत वाढच होत आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे.

शिरोळ तालुक्यातील श्री क्षेत्र नृसिंह वाडी इथलं दत्त मंदिर ही पाण्याखाली गेलं आहे. पंचगंगेचं पाणी कोल्हापुरातील गंगावेस- शिवाजी पूल रस्त्याजवळ आलं आहे. तिची पातळी आज ३५.११ मीटर वर पोहोचली असून इशारा पातळीच्या दिशेने वाढते आहे, ही पातळी ३९ मीटर आहे तर धोका पातळी शिरोली जवळ वीट भट्ट्या पाण्यात गेल्या आहेत.

पंचगंगेची पाणी पातळी 36 फुटांवर गेली असून तिने इशारा पातळीकडे वाटचाल सुरू ठेवली आहे. इशारा पातळी 39 फूट आहे तर धोका पातळी ४३ मीटर इतकी आहे.

जिल्ह्यातील तब्बल ७० बंधारे पाण्याखाली गेले असून २०० हून अधिक गावांचा संपर्क थेट संपर्क तुटला असून पर्यायी मार्गानं वाहतूक वळविण्यात आली आहे. आठ मार्गांवरील वाहतूक पूर्णतः बंद आहे. उद्यापासून कोल्हापूर जिल्ह्याला तीन दिवस ऑरेंज अलर्ट दिला आहे. आज गेलो अलर्ट आहे. धरण क्षेत्रात जोरदार पाऊस कोसळत असून सरासरी 130 मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस झाला.

कोल्हापूर जिल्ह्यातील 15 धरणांपैकी तेरा धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली असून घटप्रभा परिसरात 292 मिलिमीटर, पाटगाव परिसरात 290, चित्री 178, कोदे परिसरात 176 कासारीत 167, राधानगरीत 157, जांबरे 150, कुंभी आणि चिकोत्रा प्रत्येकी 135, जंगमहट्टीत 125, तुळशी 104, आंबेओहोळ मध्ये 92 तर दुधगंगेत 75 मिलिमीटर इतका पाऊस झाला.

राधानगरी धरणात गेल्या 24 तासात पाणीसाठ्यात एक टीएमसी वाढ झाली आहे धरण 71 टक्के भरले असून वीज निर्मितीसाठी त्यातून प्रति सेकंद 1370 क्यूसेक्स विसर्ग सुरू आहे तर वारणा धरण 61 टक्के भरल्यानं 922 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

ML/KA/SL

22 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *