सरन्यायाधीशानी सुनावले राज्यपालांना खडे बोल

 सरन्यायाधीशानी सुनावले राज्यपालांना खडे बोल

दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या सुनावणी दरम्यान आज सरन्यायाधीस न्या. चंद्रचूड यांनी तत्कालिन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतलेल्या भूमिके बद्दल कठोर ताशेरे ओढले.

पावसाळी अधिवेशन तोंडावर असताना बहुमत चाचणीसाठी अधिवेशन बोलावणं म्हणजे सरकार पाडण्यात वाटा उचलणं किंबहुना पक्ष फोडण्यात मदत करणं. राज्यपालांनी अशा कृतीपासून दूर राहावं किंबहुना राज्यपालांनी आपल्या मर्यादेत राहावं, अशा शब्दात सरन्यायाधीशांनी कोश्यारी यांचा परखड शब्दांत समाचार घेतला. राजकीय दृष्ट्या सुसंस्कृत असलेल्या महाराष्ट्रात या घटनाक्रमामुळे कलंक लागत आहे, अशी खंतही यावेळी सरन्यायाधिशांनी व्यक्त केली.

राज्यपालांच्या वतीने बाजू मांडणाऱ्या सॉलिसिटर जनरल तुषार मेहतांवर प्रश्नांचा वर्षाव करत घटनापीठाने राज्यपालांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

दरम्यान तुषार मेहता यांची बाजू मांडून झाल्यावर ठाकरे गटाते वकिल कपिल सिंबल यांनी रिज़ॉईंडर सादर केले. उद्या देखील त्यांचा युक्तीवाद सुरू राहणार आहे. उद्याच ही सुनावणी पूर्ण होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

SL/KA/SL

15 March 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *