नवी मुंबई पनवेलमधील अनेक कुटुंबे जादूटोणा करणाऱ्या टोळीची शिकार; गुन्हेगारांवर नेमकी कधी होणार कायदेशीर कारवाइ?
मुंबई, दि २५
जादूटोणा आणि तंत्र-मंत्राच्या नावाखाली लूटमार करणाऱ्या टोळीचे एक मोठे प्रकरण समोर आले आहे. नवी मुंबईतील पनवेल परिसरातील अनेक कुटुंबांना या जादूटोणा करणाऱ्या टोळीने आपले सावज बनवले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या तंत्र-मंत्र टोळीमध्ये मिना धुर्वे, लक्ष्मी ईगले, काजूर मारग आणि इतर गुन्हेगारांचा समावेश आहे.
हे बदमाश कोणतीही रेकी करत नाहीत किंवा त्यांचा कोणताही ठराविक भाग (एरिया) निश्चित नसतो. जेव्हा एखादे पीडित कुटुंब यांच्या संपर्कात येते, तेव्हा तंत्र-मंत्राच्या बहाण्याने त्यांना आपल्या जाळ्यात ओढले जाते. त्यानंतर हाताची सफाई दाखवून समोरच्या व्यक्तीला चमत्काराच्या शक्तीची जाणीव करून दिली जाते आणि त्यांना संमोहित (Hypnotize) करून त्यांच्याकडून पैसे उकळले जातात. डोळ्याची पापणी लवते न लवते तोच पैसे गायब करून हे गुन्हेगार पसार होतात.
नवी मुंबई आणि पनवेलसह राज्यातील अनेक जिल्ह्यांत या जादूटोणा करणाऱ्या टोळीविरुद्ध लूटमारीचे गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल आहेत. आता महाराष्ट्राचा नागरिक हाच सवाल विचारत आहे की, मिना धुर्वे, लक्ष्मी ईगले, काजूर मारग आणि त्यांच्या साथीदारांवर नेमकी कधी कायदेशीर कारवाई होणार असा प्रश्न नवी मुंबई मधील अनेक पीडित रहिवासी विचारत आहेत.KK/ML/MS